विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.25 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विकिस्रोत:चावडी/तांत्रिक प्रश्न 4 2561 155860 155832 2022-08-21T15:15:15Z QueerEcofeminist 918 /* मोठ्या प्रमाणात ओसीआर करण्याची आवश्यकता requirements for mass ocr tool */ bhar wikitext text/x-wiki == आंतरविकि आयात सुविधा कार्यान्वित करणे प्रस्ताव == {{Discussion top}} नमस्कार, मराठी विकिपीडियावर [[:w:mr:वर्ग:Transferable to Marathi Wikisource]] तसेच मराठी विकिबूक्सवर या वर्गीकरणाने वर्गीकृत होणारी मराठी विकिस्रोत प्रकल्पात स्थानांतरण योग्य लेखपाने वेळच्या वेळी इतिहासासहीत स्थानांतरीत (आयात) करता यावीत, तसेच साहाय्यपाने आणि साचे आयात करता यावीत तसेच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी विकिस्रोत, प्रकल्पातील लेखपाने वेळोवेळी गरजेनुसार अनुवादासाठी सहजपणे आयात करणे प्रचालकांना सुलभ जावे म्हणून आंतरविकि आयात सुविधा कार्यान्वित करण्याबाबत प्रस्ताव मांडत आहे. [[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २२:२९, १ जुलै २०१५ (IST){{Discussion bottom}} ==मराठी विकिस्रोतवर आयात== {{Discussion top}}मी मराठी विकिस्रोतवर इंग्लिश विकिपीडिया व विकिमीडिया कॉमन्स वरून पाने आयात करण्यास [https://phabricator.wikimedia.org/T188486 प्रस्ताव] मांडला आहे. कृपा आपले मत खाली नोंदवे --[[User:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]]<sup>[[User talk:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १४:३९, २८ फेब्रुवारी २०१८ (IST) {{Discussion bottom}} ==Wikisource Pagelist Widget== {{Discussion top}} {{ping|QueerEcofeminist}}, Could you please install the Wikisource Pagelist Widget to Marathi Wikisource as you now interface admin. It will help community works better to creating Pagelist OOUI widget without input any code. The [https://www.mediawiki.org/wiki/Help:Extension:ProofreadPage/Pagelist_widget technical documentation here] for ready reference. Most of all Wikisource installed it already. * https://meta.wikimedia.org/wiki/Wikisource_Pagelist_Widget [[सदस्य:Jayantanth|Jayantanth]] ([[सदस्य चर्चा:Jayantanth|चर्चा]]) २१:४८, १२ जुलै २०२१ (IST) :{{done}}, Please check once and let me know, if anything else is needed. Thanks a ton for helping us, you have been a great help to mrwikisource community. [[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] ([[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|चर्चा]]) ००:३७, १३ जुलै २०२१ (IST) :: Thanks, let me check. [[सदस्य:Jayanta (CIS-A2K)|Jayanta (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Jayanta (CIS-A2K)|चर्चा]]) १०:१६, १३ जुलै २०२१ (IST) {{Discussion bottom}} ==मराठी विकिस्त्रोतावर घाऊक ओसीआर अवजार आणण्यासाठी मतदान == === मोठ्या प्रमाणात ओसीआर करण्याची आवश्यकता requirements for mass ocr tool === * सध्या आपल्याकडे स्केन केलेल्या पुस्तकांचा ओघ खुप मोठा आहे, शिवाय त्यावर काम करणारे कुशल सदस्य कमी आहेत. * ओसीआर तयार मिळाल्यास पुढील काम खुप सोपे होते आणि त्यामुले नवी पुस्तके लवकर तयार व्हायला मदत होईल. * आपण या आधी [[https://github.com/tshrinivasan/OCR4wikisource|OCR4wikisoruce]] हे अवजार वापरत होतो पण ते बंद पडल्याने आता आपले काम रखडले आहे. * ही विनंती पुढे फेब्रिकेटरवर टाकून याबद्दल पुढे आवश्यक प्रयत्न केले जातील. ===प्रस्तावित अवजार === * This tool should be able to OCR a whole book in one go. So that we have saved OCR pages as a product. * Use of tool should be limited to bot accounts. * As a input we will give name of the index to be ocred, range of pages and the tool will produced OCRed Pages. ===आपली मते प्रश्न/सुचना येथे मांडा === [[वर्ग:विकिस्रोत व्यवस्थापन]] jyqyfb5a7z5ugzh7m6787uw2odpd83j पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५२ 104 71041 155845 2022-08-21T12:54:10Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 52 |bSize = 390 |cWidth = 318 |cHeight = 203 |oTop = 41 |oLeft = 30 |Location = center |Description = }}  {{gap}}चार्वाकाचे नाव नववीत असतांना जोशी सरांकडून ऐकले. ते आम्हाला संस्कृत शिकवीत. रोज एक नवा श्लोक म्हणवून घेत आणि त्यावर त्यांची मल्लीनाथी. संस्कृत श्लोक घटवून घेतल्यामुळे वर्गातील सर्व मुलींची वाणी मात्र शुद्ध झाली.<br>{{gap}}'ज्ञान प्राप्त करून घेणे हा सर्वांचा हक्क आहे. मात्र तो अधिकार कष्ट साध्य असतो. केवळ ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन तो मिळत नाही. फार तर पूजाअर्चा सांगता येते. ती सांगणे म्हणजे ज्ञान नाही. ती एक दुय्यम दर्जाची कारागिरी आहे.' असे ते म्हणत आणि 'बेकंबे'चा पाढा पूजा सांगण्याच्या अविर्भावात आणि स्वरात म्हणून दाखवित. अख्खा वर्ग पोट धरून हसे.<br>{{gap}}'हं आता दक्षणा द्या' असे म्हणत मोठ्यांदा खोऽ खोऽ हसत. नंतर डोक्यावरची काळी टोपी काढून धोतराच्या सोग्याने शेंडी राखलेल्या टकलावरचा घाम पुशित. तो एक मोहक संस्कार होता हे आज जाणवते.<br>{{gap}}ज्ञान म्हणजे परमेश्वराचा घेतलेला शोध, जीवाशिवाचा सिद्धान्त. तो त्यांचा लाडका. रिकाम्या मडक्यातही हवा असते आणि बाहेर सर्वत्र हवा असते. मडके फुटले की त्यातील हवा बाहेरच्या हवेत मिसळून जाते. तसेच शरीर मृत होणे म्हणजे जीव ...<noinclude>{{rh|३८ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> k0b47pc3oca2x1dec5danchgsj8oull पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५३ 104 71042 155846 2022-08-21T13:00:11Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आत्मा, परमात्म्याशी एकरुप होणे वगैरे. ते रंगून सांगत. काही नास्तिकांनी मात्र परमेश्वरच नाकारला असे सांगत त्यांनी चार्वाकाचा श्लोक तेव्हा सांगितला होता.{{center|'''यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणंकृत्वा घृतं पिबेत् ।<br>भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कृतः।।'''}}{{gap}}जीव आहे तोवर मौज मजा करा. भस्म झालेला देह पुन्हा येत नसतो. म्हणून खा ..प्या. रिण काढून सण साजरा करा. हा श्लोक सांगतांना चार्वाक् कसा अनीतीमान होता. नास्तिक होता हे भरभरून सांगत.<br>{{gap}}चार्वाकाच्या तत्वज्ञानाचे नेमकेपण लोकसाहित्याचा शोध घेतांना हाती आले. चार्वाक दर्शनाला 'लोकायत' म्हणतात. 'लोक' म्हणजे इहलोक. पंचेन्द्रियांनी जे प्रत्यक्ष अनुभवतो ते सत्य. 'आयात' म्हणजे आधारित. इहलोकावर आधारलेली, सर्व सामान्यांना मान्य असणारी विचारधारा. एक इहवादी, जीवनवादी तत्वज्ञान. मानवाला स्वत:च्या माणूसपणाची, निसर्गाने त्याला दिलेल्या दोन शक्तींची, ... कार्यकारण भावाचा शोध घेण्याची (विचार करण्याची), तो वाचे द्वारे व्यक्त करण्याची... जाणीव झाली आणि तो स्वत:ला 'मी कोण? मला कोणी निर्माण केले? मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय?' असे प्रश्न विचारू लागला. त्यातून तत्वज्ञानाच्या अनेक विचार धारा निर्माण झाल्या. त्यालाच आपण 'दर्शने' असे म्हणतो. एकूण नऊ दर्शने आहेत. सहा आस्तिक दर्शने आहेत. तर तीन नास्तिक दर्शने आहेत. ईश्वराचे अस्तित्व, परलोक, पापपुण्य, वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिक.<br>{{gap}}हा नास्तिक शब्दही लहानपणीच भेटला. नास्तिक म्हणजे दुराचारी, परमेश्वर न मानणारा, वागण्यात ताळतंत्र नसलेला, नीतीहीन, जेजे चांगले ते नाकारणारा समाजद्रोही माणूस ...व्यक्ती. हा अर्थ मनात स्थिर झाला.<br>{{gap}}माझी आजी म्हणायची. "बेबीचा नवरा पक्का नास्तिक आहे. घरात देव नाहीत. पण वागायला किती चांगला. बेबीला फुलासारखा सांभाळतो. नाहीतर प्रेमाचा. विंजिनेर आहे. पण किती धाक. मोटार चालवायला शिकलीच पाहिजे म्हणून धाक आणि कोणाकडे हळदीकुंकवाला जायचं तरी धाक. जळला मेला तो धाक ...पण बेबीच्या नवऱ्यानं मला आंब्याच्या योगेश्वरीचं दर्शन मोटारीतून नेऊन घडिवलं. पण जावईबापू मंदिरात मात्र आले नाहीत हो." आणि 'नास्तिक' हा शब्द फारसा वाईट नसतो असा बारिकसा बिंदूही मेंदूत नोंदला गेला.<br>{{gap}}लोकसाहित्याच्या शोधात देवीप्रसाद चटोपाध्याय यांचे 'लोकायत', स. रा. गाडगिळांचे मराठी भाषेतून सुलभपणे अंतरंगात पोचलेले 'लोकायत' हे महत्वाचे थांबे,<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ३९ }}</noinclude> mhm8v7iw06gw1c39jzs0l5skz87eyh8 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५४ 104 71043 155847 2022-08-21T13:11:31Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>टप्पे होते. शोधन कधी पूर्ण होत नाही. चिमुटभर ओंजळीत येते असे वाटते तोवर नवी दिशा खुणावू लागते. आणि तसेच झाले. दिशा उजळत गेल्या. 'हिंदु' ही जीवनदृष्टी आहे. गुरुवर्य मांडेसरांची लाडकी भूमिका. त्यादृष्टीने विविध विचारधारांना या नऊ दर्शनांना विकसित होण्यास अवकाश दिला. इरावतीबाई कर्व्यांनी Theory of Agglomeration मांडली. स्वीकार आणि समन्वयाचा सिद्धांत मांडला. आणि ती भूमिका हिंदू जीवनदृष्टीचा मध्यबिंदु आहे. या दृष्टीने चार्वाक दर्शनालाही अवकाश प्राप्त करून दिला. परंतु नंतरच्या वैदिक हिंदू धर्माची मांडणी करणाऱ्यांनी चार्वाक दर्शन नष्ट केले. चार्वाकास जाळून टाकले.{{center|'''चार्वाक दर्शनाने सांगितले-<br>स्वातंत्र्यं मोक्षः, पारतंत्र्यं बन्धः'''}}{{gap}}सर्वश्रेष्ठ ईप्सित म्हणजे मोक्ष असेल तर स्वातंत्र्य हा मोक्ष आहे. आणि पारतंत्र्य हे बंधन आहे.{{center|'''कृषिगोरक्ष्यवणिज्यदण्डनित्यादिभिर्बुधैः।<br>एवैरेव सदोपार्येर्भॊगान् अनुभवेद् भुविः।।'''}}{{gap}}... शेती, गोपालन, व्यापार, नोकरी इत्यादी सदुपायांनी अर्थार्जन करून शहाण्यांनी सुख उपभोगावे.<br>{{gap}}मुख आदि अवयवांचेक शरीरात सारखेच महत्व असते. मग वर्णभेद मानणे अयोग्यच.{{center|'''वर्णक्रमः कीदृशः।<br>इतकेच नाही तर, <br>पतिव्रत्यादिसङकेतः बुद्धिदुबलैः कृतः।।'''}}{{gap}}पतिव्रत्यादि संकेत हे अत्यंत बुद्धिहीन पुरूषांनी निर्माण केले आहेत.<br>{{gap}}मानवी मूल्यांची कदर, सामाजिक न्यायावरचा विश्वास चार्वाकांनी आम्हाला दिला.<br>{{gap}}डेल रीप या अभ्यासकाने 'द नॅचरॅलिस्टिक ट्रॅडिशन इन इंडिया' या ग्रंथात म्हटले आहे.<br>{{gap}}'It may be said from the available material that Charvaka holds truth, integrity, consistency and freedom of thought in the highest esteem.'<br><noinclude>{{rh|४० / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> snl1utsrlq65awstsvu3a4ecnk6hakr पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५५ 104 71044 155848 2022-08-21T13:13:47Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून असे म्हणता येते की चार्वाकांना सत्य, एकता, सुसूत्रता आणि वैचारिक स्वातंत्र्य या तत्वांबद्दल पराकोटीचा आदर होता.<br>{{gap}}आ. ह. साळुंखेंनी चार्वाकाला 'आस्तिक शिरोमणी' असे का म्हटले तेही पटते; नव्हे तर 'आस्तिक' या शब्दाचे नेमकेपणही लक्षात येते.<br>{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ४१ }}</noinclude> t3iqkn615nd768mhkhgh6897mdlu08u पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५६ 104 71045 155849 2022-08-21T13:18:02Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 56 |bSize = 389 |cWidth = 326 |cHeight = 210 |oTop = 35 |oLeft = 33 |Location = center |Description = }} {{gap}}'धर्म या शब्दाचा पगडा आणि धास्ती सर्वसामान्य माणसाच्या मनावर असतेच. अगदी आजही. मग तो धर्म कोणताही असो. परंपरागत धर्म अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेला असतो. या अपरिवर्तनीय नियमांचा ऐहिक जगण्याच्या संदर्भात सखोल शोध घेऊन, आजवर काही शोधकांनी धाडसाने नव्या दिशा शोधल्या. त्यांना मानणारे, त्या दिशांनी जाणारे अनुसरक मिळाले.<br>{{gap}}इ.स. पूर्व सुमारे ६०० ते ५५० वर्षापूर्वी हिंदुधर्मातील चातुर्वर्ण्य आणि धर्मसुत्रे यांनी सर्वसामान्य माणसाचे जगणे कंटकमय केलेले होते. जखडून टाकले होते. धर्माच्या नावाने मुली देवाला अर्पण केल्या जातात, विधवा स्त्रीस जाळले जाते. हिंदू धर्माने तर स्त्री ही सर्वार्थाने दुय्यम, दासीसमान मानली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीत जन्मलेल्या स्त्रियांनाही ज्ञानाचा अधिकार नव्हता. चातुर्वर्ण्याची नियमांनी बांधलेली धर्मव्यवस्था आणि निसर्गाने माणसाला बहाल केलेल्या चार गरजा - आहार, निद्रा, भय, मैथुन! त्यांच्या झटापटीतून जातींची भेंडोळी निर्माण झाली. दलितांप्रमाणे शूद्रत्वाचा शिक्का स्त्रियांच्या कपाळावर मारला. त्यांच्या ताटातही दारिद्रय, शिवाशीव टाकलेलीच होती. स्त्रियांच्या अब्रूला सतत धोका होता. ८००-१००० वर्षांपूर्वी त्यांचा महत्वाचा भाकरीसाठीचा व्यवसाय 'दासी' होणे हाच होता. रूपवती स्त्रिया संगीत, नृत्य, मनोरंजन करणारे संवाद याचे शिक्षण घेऊन वारयोशिता... स्वतःच्या इच्छेनुरूप प्रियकर निवडून त्याच्याकडून धन गोळा करणाऱ्या स्त्रिया... होत. काही नर्तिका, काही<noinclude>{{rh|४२ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> npyfzcw4ka30qrg07rgbl31tqchbs4d पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५७ 104 71046 155850 2022-08-21T13:25:04Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>गायिका वगैरे. लाखात एखादीच बुद्धीमत्तेच्या बळावर विद्यावाचस्पती, योगिनी होत असे. कुंठित झालेल्या सर्वसामान्य विशाल बहुजनांना, गौतमबुद्धाच्या 'धम्मा' ने जगण्याची नवी दिशा दाखवली. 'धम्म' सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत माणसामाणसांतील व्यवहार उचित ठेवावेत. असावेत. ते एकमेकांवर कुरघोडी वा अन्याय करणार नसावेत. असा 'धम्म' शासनाने साधन म्हणून स्वीकारला तर समाजात अराजक, स्वैराचार, हुकूमशाही माजणार नाही. एखाद्याने धम्माचे उल्लंघन केले तर त्याला शासन देणारा हुकूमशहा नसेल तर न्यायाधीश असेल. आणि अशा समाजात सर्वच स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतील. बुद्धाच्या धम्माच्या दोन कोनशिला आहेत. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. खुळया, अंधश्रद्धांना तेथे थारा नाही. आणि करूणा म्हणजे प्रेम, करूणेशिवाय माणूस जगू शकणार नाही. स्वत:ची उन्नतीही करू शकणार नाही. आणि म्हणूनच या धम्माने सामान्य माणूस उपेक्षित, निराधार, एकाकी स्त्रिया, चुका उमजलेले पश्चातापदग्ध स्त्री पुरूष यांच्या जगण्याला आधार दिला. जगण्याची... धम्मानुसार जीवन उज्ज्वल करण्याचीच ऊर्जा दिली.<br>{{gap}}नेपाळ, थायलंड, चीन येथे मला जाण्याचा योग आला. तेथे आजही बौद्ध धर्माची पूजास्थाने... पॅगोडे... विशिष्ट शैलीत बांधलेली, आढळतात. बोधिसत्वाचे विविध आकाराचे पुतळे आहेत. ओठावरचे एक निरंकारी स्मित, जे पूर्ण चेहेरा शून्यात्मक तृप्तीने उजळून टाकते, ते पहाणाऱ्यालाही धम्माचे वेगळेपण सांगून जाते.<br>{{gap}}गौतमाने त्याला पडणाऱ्या दोन प्रश्नांनी सतत सतावले. त्यांचा शोध घेण्यास उद्युक्त केले. व्यक्तीला होणाऱ्या दुःखाची कारणे कोणती? आणि हे दुःख नाहीसे कसे होईल? हा शोध घेतांना स्वत:तले दोष काढण्यासाठी त्यावर लक्ष केन्द्रित केले. सोनार चांदीतले कीटण काढून ती शुद्ध करतो तसे मनातील अशुद्ध विचार, वासना, द्वेष, खुशामत करण्याची वृत्ती यांचा त्याग केला. दहा स्थित्यंतरे झाल्यावर तो 'स्व' पासूनही दूर गेला. अनंतस्वरूप झाला. बोधिसत्व न रहाता बुद्ध झाला. 'धम्म'चे आगळेवेगळेपण शब्दांतून व्यक्त करण्याचे सामर्थ्य आले. लाखोंची जीवने उजळून गेली.<br>{{gap}}गेल्या तीन/चारशे वर्षात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. गळ्यात धुंकण्यासाठी मडके, रस्त्याच्या कडेने काट्याकुट्यातून चालण्याची जबरदस्ती, स्त्रियांनी पोटऱ्या उघड्याटाकून लुगडे नेसणे... शिक्षण नाही. एक अंधार यात्राच. या अंधारयात्रेत ज्ञान आणि करूणेचा प्रकाश निर्माण करणारे महापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हा नवा प्रकाश अंधारयात्रींच्या जीवनात निर्माण<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ४३ }}</noinclude> n8y62w02k5lo3qvo19wexjynu27psg4 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५८ 104 71047 155851 2022-08-21T13:32:44Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>करण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करून 'धम्म'वरही नवा प्रकाश टाकला. त्यांना या निमित्ताने प्रमाण करण्याऐवजी त्यांनी सांगितलेल्या धम्माचा शोध घेणे प्रकाश देणारे आहे.<br>'''<big>धम्मावर नवा प्रकाश</big>'''<br>{{gap}}६ डिसेंबर १९५६ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. महात्मा गौतम बुद्धांचा 'धम्म' १४ ऑक्टोबर १९५६ दसऱ्याच्या दिवशी स्वीकारल्यानंतर अवघ्या ४३ दिवसांनी त्यांचे परिनिर्वाण झाले. अर्थात त्या आधी अनेकवर्षे त्यांचे चितंन सुरू होते. बाबासाहेबांनी दलित समाजातल्या सामान्य व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचे धाडस दिले. निसर्गाने वर्ण व्यवस्था निर्माण केली नाही. ती आपमतलबी माणसाने स्वार्थासाठी निर्माण केली असल्याचा एहेसास... ठाम विश्वास त्यांनी दिला. परंतु त्याही पूर्वी सवर्ण मानल्या जाणाऱ्या अनेकांना ही समज महात्मा गांधीजींनी दिली. त्यांनी दलितांना परमेश्वराला प्रिय असणारी माणसे ...'हरिजन' असे संबोधले. अर्थात ज्यांना परमेश्वर वा ईश्वर ही संकल्पनाच मान्य नाही अशांना ..नव बौद्धांना ते आवडले नाही. पण अनेक कुटुंबे गांधीजींच्या विचारांनी भारावलेली होती. मला पहाटे चरख्याच्या लयबद्ध आवाजाने जाग येई. आई पप्पा चरख्यावर सूत कातीत असत. त्याच सुताने विणलेल्या खादीचे ते कपडे वापरीत. वयोमान व कामाच्या व्यापामुळे चरखा खुंटीला टांगला गेला. पण अखेरपर्यन्त त्यांच्या अंगावर खादीच होती. आईला जुन्या रीती नुसार अहेवमरण आले. एका गृहस्थांनी हिरवी साडी त्या सामानात आणली. ती पाहून पपांनी मला खूण केली. मी तात्काळ विनंती करून ती साडी परत केली. केवळ त्यांच्या समाधानासाठी हिरव्या काठांची शुभ्रसाडी आणली. तिच्या इच्छेनुसार मंत्रविधी न करता भडाग्नी दिला.<br>{{gap}}राष्ट्र सेवा दल, पू. सानेगुरूजी, एस.एम.जोशी, डॉ. राम मनोहर लोहिया, बॅ. नाथ पै, जयप्रकाशजी अशा अनेकांचा प्रत्यक्ष सहवास ही माझी माहेरची मिळकत... समृद्धी. घरच अ किंवा न जातीय होते. आई हरिजन सेवा संघाची २५ वर्षे अध्यक्षा होती. मुलींच्या वसतीगृहातील होतकरू मुलींना पपा कोर्टातून आल्यावर इंग्रजी व गणित शिकवीत. पाण्यापर्यन्त सर्वांचा वावर. पण 'बाईंच्या' म्हणजे आईच्या घरात 'हात स्वच्छ धुणे' हेच सोवळे.<br>{{gap}}त्यावेळी अनेक सवर्ण... ब्राह्मण घरांतील धुरिणांनी जातीयता नाकारली होती. हरिजन सेवा संघाचे संस्थापक काकासाहेब बर्वे हे त्यापैकी एक. त्यावेळच्या धुळे जिल्ह्यात राष्ट्र सेवा दलाच्या अनेक शाखा, जातपात न माननारी... खुले, समतोल<noinclude>{{rh|४४ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 7t2lclqd2c0wj691insx84i9ww1rl0r पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५९ 104 71048 155852 2022-08-21T13:39:26Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>जीवन जगणारी अनेक तरुण मंडळी होती. त्यात कोणताही अभिनिवेष नव्हता किंवा 'दलित सेवक' अशी शासकीय 'डिग्री' ... पदवी मिळवण्याचा अट्टहास नव्हता.<br>{{gap}}डॉ. बाबासाहेब एका जातीचे नव्हे तर सर्वांचेच आधारस्तंभ होते. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष, ... सर्वधर्म, सर्वजाती, सर्व वर्ग समभाव हा घटनेचा 'प्राणबिंदू' ठेवणारे महात्मा. पाश्चात्य देशातील स्त्रियांना समतेच्या निकषावर मतदानाचा अधिकार मागण्यासाठी चळवळ करावी लागली. बाबांनी तो अधिकार आम्हाला स्त्रियांना घटनेद्वारा दिला. हिंदू कोड बिलात योग्य ते बदल होत नाहीत हे पाहून घटना समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.<br>{{gap}}धर्म मग कोणताही असो त्याच्या चौकटी दुधारी... न तोडता येण्यासारख्या कठोर बनवण्याचे काम धर्मातले धुरिणच करतात. मुळात सर्व सामान्य माणसांना संघटितपणे सुखकर, एकमेकांसह जगता यावे म्हणून 'धर्म' निर्माण झाले. सर्वांना सोयीस्कर असे नियम केले गेले. मूलत: धर्म माणसाने माणसांच्या सोयीसाठी निर्माण केला. माणुसकी, परस्पर प्रेम त्याचा पाया होता.<br>{{gap}}हिंदू धर्मात चातुर्वर्ण्य आला त्या आधारे शेकडो जातींचे जाळे निर्माण झाले. कठोरता आली.<br>{{gap}}"संगच्छंध्वं, संवदध्वं, संवो मनासि जानताम्..." एकमेकांची मने जाणून घेऊ आणि सामूहिकपणे उजेडाच्या... सुखसमृद्धीच्या दिशेने सुसह्य जीवन जगू अशी प्रार्थना वेदात होती. वेद अपौरूषेय म्हणजे ईश्वर निर्मित नाहीत असे सांख्य, वैशेषिक मानीत. आद्य शंकरार्चांनी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करून सामान्य माणसाला काचणारे नियम काढून नवीन रचना केली. 'ब्रहम सत्य जगन् मिथ्या' अशी मांडणी केली ती गौतम बुद्धाच्या 'जगत् शून्यं' च्या जवळ जाणारी आहे. ती करतांना त्यांनी तत्कालीन सर्वच धर्मांचा अभ्यास केला. नव्या रचनेवर बौद्धाच्या 'धम्माचा' प्रभाव होता. म्हणूनच त्यांना 'प्रच्छन्न बौद्ध' असे म्हणत.<br>{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ४५ }}</noinclude> 4rye2ppns5o76y4a73whbprh6fsgxdl पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६० 104 71049 155853 2022-08-21T13:45:24Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 60 |bSize = 389 |cWidth = 302 |cHeight = 201 |oTop = 47 |oLeft = 47 |Location = center |Description = }}  {{gap}}"खारोड्या, पापड्या कांही आहे का घरात? या तापलेल्या दुपारी भाजलेले शेंगदाणे, गूळ नि खारोड्या हव्याच!" मराठवाडा नाहीतर खानदेश वा कोल्हापूरचे मुंबईत स्थायिक झालेले पुरूष पावसाने जोरदार हजेरी दिली की हा प्रश्न विचारणारच!<br>{{gap}}ग्रामीण भागातून शहरात गेलेल्या कुटुंबातील पुरूषांना हा खास मेवा हवाच असतो. भलेही मग ते मुंबई पुण्यात स्थायिक झालेले असोत. राजस्थानी घरातून जेवणाच्या शेवटी पापड हवाच. त्याशिवाय जेवण झालंय, पोट भरलंय असं वाटतच नाही. तर कोकणात ज्यांच्या पूर्वजांची नाळ पुरली होती ते देशावर येऊन राहिल्याला शंभरवर्षे झाली तरी जेवणाच्या शेवटी सुपारी एवढा का होईना दही, दूधभात खाल्ल्याशिवाय मन तृप्त होत नाही.<br>{{gap}}फेब्रुवारीच्या मध्यातच ऊन चढू लागते. उन्हाळ्याची चाहूल लागते. लहानपणी पपांचे पक्षकार मोराण्याचे जिभाऊ, भलामोठा कोहळा घरात आणून देत. नि सांगत 'बाई, आबईनं कोहळा दिलाय' पापडासाठी. कोहळ्याच्या पाण्यात केलेले पापाड निके म्हणजे पवित्र असतात. वैधव्य आलेल्या, पूर्वी लाल लुगड्यात असणाऱ्या बायांनी लाटले तरी सोवळ्यातल्या स्वयंपाकासाठी ते चालंत. मरेस्तो कष्टाशिवाय त्यांच्या जगण्यात होते काय? ज्या शेतकऱ्याच्या शेतात कोहळ्याचा वेल असे तो आवर्जुन कोहळा ओळखीच्या घरांतून देई. कोहळा विकत नसत. आमच्या घरात<noinclude>{{rh|४६ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 05q9rhdri53bwo793i6nsbjluw1bfvy पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६१ 104 71050 155854 2022-08-21T14:00:56Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>सोवळ्याओवळ्याची भानगड नव्हती. उलट कोहळा आला की पापडापेक्षा आग्र्याचा पारदर्शी पेठा तयार करण्यासाठी मी नि पपा आईजवळ भुणभुण लावीत असू.<br>{{gap}}त्या काळात शेजारपाजारच्या मैतरणी दुपारच्या चहाला एकीच्या घरी जमत. नि मग हातावरच्या शेवया कधी आणि कुणाकडे करायला जमायचे याची आखणी होई. घाणेकरकाकूंना प्रचंड डिमांड असे. गहू ओलवून त्याचे मऊसुत पीठ काढून वळलेल्या, मुठीच्या अंदाजाने त्यात मीठ घालून शेवयांचे पीठ भिजवण्यात त्यांच्याइतके तज्ज्ञ कोणीच नसे. नऊलाच काकू हजर होत पीठ भिजवून, पांढरीशुभ्र फडकी तयार ठेवून एका फडक्यात ती भिजवलेली कणिक गुंडाळून डब्यात ठेवून काकू जाई. पुन्हा बारा वाजता नऊवारीतली, रूंद हाडाबांध्याची, कोसांच्या वेण्यांचे रेखीव चक्कर बांधून, त्यावर गजरा माळून काकू हजर.<br>{{gap}}तो कृती-व्यवहाराच देखणा, पहाण्या सारखा. आधी जाड दोरा काढून त्याची वेटोळी केळीच्या पानावर ठेवून त्यावर शुभ्र ओला मलमली कपडा घालायचा. थोड्या वेळाने ते दोरे लांबवत जायचे. आम्हा पोरासोरांचे काम काठ्या स्वच्छ धुवून आणायच्या आणि उंच डबे एकावर एक ठेवून त्यावर आडव्या ठेवायच्या. खाली धुतलेली पातळ साडी. त्यावर त्या सुतासारख्या बारिक शेवया बायका टाकत. त्या लांबत जात. अचानक घड्याळाकडे पहात काकू फर्मान सोडत. बाई चहा करा लवकर. स्वयंपाक उरकून सहा वाजता नाटकाची तालीम सुरू होणारेय. पन्नाशी ओलांडलेली ही बाई धुळ्याच्या मनोरंजन संस्थेच्या 'देवाच्या काठीला आवाज नाही' या नाटकात ठसक्यात काम करी.<br>{{gap}}उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरातून पापड लाटणाऱ्यांचे अड्डे जमत. एकीकडे हात सरासरा चालत तर दुसरीकडे उखाळ्यापाखाळ्यांसह गप्पांना ऊत येई. गटातली प्रत्येकजण हजर राहीच; न गेलो तर आजचा नारळ आपल्याच नावाने फुटणार या भितीने!<br>{{gap}}मी या घरी आले. पापडांची रित बदलली. तरी अड्डे नि गप्पा त्याच. मूग उडदाचे पीठ एकत्र करून, हिंग, मिरी घालून पीठ भिजवायचे. पापड पोळपाट भरून मोठ्ठा आणि पातळ लाटायचा. लाटणे रेघाळ असते. प्रत्येक महिला आपले लाटणे घेऊन येई.<br>{{gap}}कुर्डया पापड्यांची धांदलही याच काळातली. गहू सुद्धा ठराविक प्रतीचे हवेत. मग ते चार दिवस पाण्यात घालून भिजवा. पाचव्या दिवशी गहू दळून चिक काढा. दुसऱ्या दिवशी तो शिजवायचा. नि सोऱ्याने स्वच्छ धुतलेल्या लुगड्यावर गोल आकाराच्या सुरेख कुर्डया घालायच्या.<br><noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ४७ }}</noinclude> lbb72s30yyo2kiseko8vwubsnxvpaif पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६२ 104 71051 155855 2022-08-21T14:08:21Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}ज्वारी, तांदुळ, गव्हाच्या पापड्या मिश्र डाळींचे सांडगे, पोह्याचे, तांदुळाचे, नागलीचे पापड, राजस्थानी पापंडं चवींचे अनेक प्रकार. खायला चटकदार. पण करण्यासाठी लागणारे श्रम, मनाची एकाग्रता याचे मोजमाप कोणी काढलेय का? अन्न निर्मितीसाठी स्त्रीला घ्यावे लागणारे कष्ट, श्रम हे नेहमीच अदृष्य राहिले आहेत. त्यांची दखलही आजवर घेतली गेली नाही. तिला 'अन्नपूर्णा' म्हटले की संपले.<br>{{gap}}पुणे तेथे काय उणे? असा वाक्प्रचार आहे. तो खराच आहे. मी फर्ग्युसनच्या होस्टेलला असतांना एक मावशी सायकलवरून गरम साबुदाणा वडा, बटाटेवडा विकायला येई. हा हा म्हणता डबा संपे. तीन रूपयाला मोठे दोन वडे नि चटणी मिळे. त्याच पुण्यात गेल्या ३०/३५ वर्षापासून पापड कुर्डयांची पॅकबंद पाकिटे मिळू लागली. पण अजून छोट्या गावात हे लोण पोचलेले नाही. उलट औरंगाबाद, अकोला सारख्या शहरातल्या काही स्वयंसेवी संस्था गरजू महिलांना कच्चा माल पुरवून हे उन्हाळी पदार्थ करवून घेतात. स्वतःचे नाव देऊन पॅकींग करून त्यांना मार्केट मिळवून देतात. महिलांना चांगला रोजगार मिळतो. आमच्या सावित्री महिला उद्योगाने हे काम सुरू केले. मी कुठेही गेले तरी दोन मोठ्या पिशव्यात पापड, शेवया, बोटवे, खारोड्या, मसाला यांची पाकिटे असत. माझी मुंबईची मैत्रिण त्यावरून मला छेडत असे.<br>{{gap}}'काय ग शेवटी बायकांना मसाले पापडांत बुडवून हातावर दोन टिकल्या देणार तू?'<br>{{gap}}'बाई ग बिन शिकलेल्या बाईला परंपरेने, आई सासूकडून मिळालेले कौशल्य तिला दोन दिडक्या नाही, स्वत:ची कमाई देते. ती नवऱ्याच्या नजरेपासून बिन मिळवती बेकार बाई या टोमण्यापासून झाकली रहाते. पण तिला आम्ही जरूर सांगतो. बाई ग पोरीला मात्र शिक्षण दे. काहीतरी नवे कौशल्य शिकव.'<br>{{gap}}स्त्रीला आर्थिक सबलते सोबतच स्वतःचे निर्णय घेण्याचे धाडसही यायला हवे. अलिकडे काही बचत गट पापड मसाल्याच्या उद्योगातून महिलांना आर्थिक सबळते बरोबरच निर्भयही बनवतात. काळ बदलला तरी जिभेची चटक तीच रहाते. शेवटी पिझ्झाला खमंग थालीपीठाची चव कशी येणार?<br>{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|४८ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 07q6x3g56f8cxcsxnl0kbl410r4zgfp पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६३ 104 71052 155856 2022-08-21T14:14:01Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 63 |bSize = 387 |cWidth = 314 |cHeight = 209 |oTop = 36 |oLeft = 26 |Location = center |Description = }} {{gap}}...२८ जानेवारी १९९५ च्या सकाळी बंगलोर येथील टाटा विज्ञान भवनात 'जनसुनवाईला, ...लोकन्यायसभेला सुरवात झाली. आशिया पॅसिफिक परिसरातील स्त्रियांचे ज्वलंत प्रश्न त्यात मांडले गेले. उद्घाटनासाठी ना मंत्र्यांचा सुळसुळाट ना त्यांच्या आगेमागे फिरणाऱ्या पुढारी अधिकाऱ्यांची पळापळ, स्त्रीप्रश्नांवर कृतीशील कार्यक्रम राबवणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी, मध्यात ठेवलेल्या समयीची एकेक वात पेटवली. ती पेटवतांना एका वाक्यात त्या त्या देशातल्या महत्वाच्या स्त्री प्रश्नांनी ओळख करून दिली. सर्व प्रश्न एकत्र येऊन सोडविण्याचा सांघिक-निर्णय. एकीमेकींनी हातात हात घेऊन, हातांची पकड घट्ट करून निश्चय केला.<br>{{gap}}व्यक्त होणाऱ्या व्यथा वेदनांची गाथा सुजाणपणे ऐकून, त्यांना न्याय व लढण्याचे बळ देण्यासाठी पंच म्हणून, विविध देशातील मान्यवर कृतीशील व्यक्तीं 'हाजीर' होत्या. सामाजिक न्यायाची बांधिलकी ज्यांच्या कृतीतून सतत जाणवली ते भारताच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. कृष्णा अय्यर, स्त्रियांच्याच नव्हे तर सामान्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या झुंजार वकील ॲड. इंदिरा जयसिंग, दिल्लीचे प्रा. आशिष नंदी, या भारतीयांसोबत फिलिपिनच्या सुप्रसिद्ध ग्रॅब्रियेला स्त्री संघटनेच्या रचनाकार निलिआ सॅचो, चीनच्या महिला संघटनेच्या प्रमुख बाई विलान होत्या. व्यवसायाने<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ४९ }}</noinclude> 0ias64pc9ijsfiy3goipv32gur0ix3o पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६४ 104 71053 155857 2022-08-21T14:24:56Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>इंजिनिअर पण आफ्रिकन नॅशनल कॉन्फरन्सच्या महिला विभागाच्या संघटक थेंबोसिली माजीला, आणि इंडोनेशियातील न्यू साऊथ वॅर्लस विद्यापीठात काम करणाऱ्या डॉ. ऐलिन पिहावे आणि अरबस्तानातील स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या, ट्यूनिस विद्यापीठातील खादिजा शेरिफ याही ज्यूरी म्हणून रंगमंचावर होत्या.<br>{{gap}}लोकसाक्षीचा कार्यक्रम ५ सत्रांतून झाला. स्त्री ही निसर्गाचे रूप आहे. निर्मितीसाठी लागणारा काळ... वेदना... भावबंध यांचा प्रत्यक्ष अनुभव ती घेत असते. म्हणूनच स्त्री आई असते. अग्नीत जणू ती उभी. म्हणून ती अग्निघटिका. ते पचवून ती सर्वांना फुलवणारी चैतन्यमयी 'आई' होते. आपण नदीला लोकमाता म्हणतो म्हणून ती जलघटिका... पाण वेळ माती, दशदिशा यांतील सुगंध जगभर पसरवणारी लोकमातात नदी असते. जगभर सुगंध पसरवणारी वाऱ्याची लहर असते. सुख... दुःख, चांगले वाईट, जे जे कवेत येईल ते ते उरात सामावून घेणारी, सारे भलेबुरे हिरव्या अंकुरातून जन्माला घालणारी 'भूमाता' असते. दहा दिशातून येणाऱ्या अनुभवांना पचवून ठामपणे उभी राहणारी साक्षात् 'ज्ञानदा' असते. तिच्या या पंचरूपाचे प्रतीक जणू ही पाच सत्रे होती. प्रत्येक सत्रापूर्वी २ ते ४ मिनिटांच्या संगीतबद्ध चित्रफितींच्या दृश्यसाक्षी झाल्या. भोपाळ गॅसपीडित, पुरांत वाहणारी गांवे, दुष्काळाने दुभंगलेली घरे... निसर्गाचे सौंदर्य, त्याचा सुखद आस्वाद घेणाऱ्या जमाती... अशा हजारो संदर्भ देणाऱ्या चलचित्रांचे ते 'कॉकटेल', पाहणाऱ्याला अस्वस्थ करणारे होते.<br>{{gap}}पहिल्या सत्राचे नाव होते अग्निघटिका. त्यांत हुंडाबळी, परित्यक्ता बुद्धिमान स्त्रिया, चेटकिणी ठरवून मारण्याची प्रथा, देवदासी प्रथा, मुली जन्मत:च मारण्याची प्रथा आणि पर्यटन व्यवसायातून वाढलेला वेशाव्यवसाय या प्रश्नांवर, त्या प्रश्नांना प्रत्यक्ष तोंड देणाऱ्या... त्या आगीत होरपळणाऱ्या, महिलांनी साक्षी दिल्या.<br>{{gap}}तामिळनाडूच्या उसलामपट्टी जिल्ह्यात आजही, मुलगी जन्मताच तिला मारून टाकण्याची रित आहे. या भागातील काही जमातीतील आयांना फक्त एकच मुलगी जिवंत ठेवता येते. तिने विरोध केला तर नवरा बायकोला टाकून देतो. मुलगा व्हावा म्हणून नाजूक अंगाला सुई टोचण्याचा विधी बायकांना करवून घ्यावा लागतो. या भयानक परंपरेला इंडियाटुडेने १९८६ साली वाचा फोडली. परंतु कल्लार समाजातील ही विषारी प्रथा केवळ शासकीय प्रयत्नांनी कशी जाईल. त्यासाठी शासनाने गेल्या १३ वर्षांत काही केलेय का? काय केले? आणि परिणाम?<br>{{gap}}स्त्रियांना चेटकी ठरवून मारण्याची प्रथा युरोपातही होती. या प्रथेचा धागा 'स्त्री' च्या बुद्धिमत्तेशी जोडलेला आहे. झारखंडात अशा अनेक स्त्रिया मारल्या गेल्या.<noinclude>{{rh|५० / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> s886ji1pt3dbk8pmjmlikfkcybz68ai पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६५ 104 71054 155858 2022-08-21T14:31:36Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>अजूनही कधीतरी असे घडू शकते. समाजाला नको असलेल्या अडचणीच्या वाटणाऱ्या स्त्रियांना 'चेटकीण' ठरविले जाते. प्रश्न विचारणाऱ्या वा प्रश्न निर्माण करणाऱ्या स्त्रिया समाजाला कुठे परवडतात? हल्यानी ही महिला चेटकीण नव्हती. नवऱ्याचाही तिच्यावर विश्वास होता. पण शेजाऱ्यांपासून ते गावातल्या ओझापर्यंत सर्वांनी तिला चेटकीण ठरवले. महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे ती वाचली.<br>{{gap}}बेकारीचे संकट स्त्रियांवर अधिक. मग नोकरीकरता पर्यटन व्यवसायात शिरकाव झाला पण तिथे वेगळेच वाढून ठेवलेले होते आणि आहे. आशियायी देशातील थोडेफार शिकलेल्या मुलींना 'मदतनीस' म्हणून अरबदेशात पाठवले जाते. भरपूर पगार आणि परदेशगमनाचे आकर्षण. मुली या जाळ्यांत सहजपणे अडकतात. तिथे गेल्यावर एकाकी होतात. ना भाषा येत ना जनसंपर्क, त्यामुळे लैंगिक शोषण होते. विकसनशील आशियायी देशातील वाढते दारिद्रय, वाढती लोकसंख्या, कुटुंबात व समाजात स्त्रियांना नसलेली किंमत, यांचा फायदा उठवला जातो. दहा बारा वर्षांच्या कोवळ्या कळ्या लैंगिक व्यवसायात गुंतवून अकाली खुरडल्या जातात. या प्रश्नावर अनेक संघटना आशियायी देशांत काम करीत आहेत. नेपाळच्या संध्या श्रेष्ठ व मीना या दोघींनी हे प्रश्न मांडले.<br>{{gap}}देवदासींच्या व्यथा मीना सेशूने दुर्गाच्या रूपाने मांडल्या. सांगली परिसरात मीना, उज्ज्वला या स्त्रियांच्या प्रश्नांवर अत्यंत धडाडीने काम करतात.<br>{{gap}}"ताई, तुमच्यापाशी बुद्धी आहे. डोकं आहे ते इकून तुमी चार पैशे कमावता. आमाला शिक्षन मिळालं न्हाई. हयेच शिक्षन मिळालं. माज्यापाशी... सुंदर...डौलदार शरीर हाये. पुरुषांना आवडतं तसं वागण्याची कला आहे. ते इकून मी चार पैशे कमावते. मग तुमच्या माझ्यात फरक का?" दुर्गाने समोर टाकलेला प्रश्न. सर्वांना अस्वस्थ करणारा अंगावरचे संस्कृती... रित... शक्ती वगैरेचे रेशमी, बांधीव कपडे झरकन फेडणारा प्रश्न. अगीनवेळ असे कपडे सोलणारी आणि ऐकणाऱ्यालाही होरपळवणारी. माझ्या मनात मात्र प्रश्नांचे शोभादर्शक गरगरत होते.<br>{{gap}}शरीर विकण्यातून शरीराच्या आरोग्यावर, नैसर्गिक सुदृढतेवर होणाऱ्या परिणामांचे काय? दुर्गाला श्रम करून चार पैसे सन्मानाने मिळाले असते. तर तिने हा 'व्यवसाय' स्वीकारला असता का? की शॉर्टकट मनीला महत्त्व? इंग्रजी कवितेतील गवळण म्हणायची की, 'माय फेस इज माय फॉरच्यून ... माझं भाग्य म्हणजे माझा चेहरा. तो सुंदर तर माझं नशीब सुंदर!" हे खरंच का? या व्यवसायातील स्त्रियांत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे. त्यांना समाजात मोकळेपणाने जगता<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ५१ }}</noinclude> ev5t5rn5a62nerhf14k9ui9mn362ixw पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६६ 104 71055 155859 2022-08-21T14:32:17Z अश्विनीलेले 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ आले पाहिजे. परंतु हाही एक व्यवसाय आहे. त्यांत आरोग्य सांभाळून पारंगतता मिळवायला काय हरकत आहे? तो व्यवसाय का निवडू नये?" अशी भूमिका विशाल मानवतेच्या दृष्टीतून योग्य होईल? ए..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="अश्विनीलेले" /></noinclude>________________ आले पाहिजे. परंतु हाही एक व्यवसाय आहे. त्यांत आरोग्य सांभाळून पारंगतता मिळवायला काय हरकत आहे? तो व्यवसाय का निवडू नये?" अशी भूमिका विशाल मानवतेच्या दृष्टीतून योग्य होईल? एका परिषदेत एका कार्यकर्तीने अशी भूमिका मांडली. खेड्यातील महिला तिथे होत्या. त्यातील एकीने प्रश्न विचारला, "ताई, तुमची लेक ह्यो वेवसाय मला करायचा असं म्हनली तर तुमी काय सांगाल तिला?" डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी बहिष्कृत भारतात नोंदवले आहे की, 'जेथे स्त्रीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:चे शरीर... शील विकावे लागते, तिथे लोकशाही निर्माणच होऊ शकत नाही. दुसऱ्या सत्राचे नांव होते 'पाण-वेळ' नर्मदा विस्थापितांचे दुःख बुडीबेन आणि लताने मांडले. मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यात राहणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न आणि फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांच्या भयानक जिण्याचे वास्तव चित्र मांडले कौसल्या आणि नसरीनने. तसेच चन्द्रा आणि रूथ मनोरमा या कर्नाटकातल्या झुंजार महिला कार्यकर्तीने, परदेशी नोकरीच्या लोभाने स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांचे प्रश्न मांडले. जकार्ताच्या सुप्रहातीन आणि ताती कृष्णवती यांनी सांगितले की, स्थलांतराचा लोभ दाखवून तरूण मुलींना, स्त्रियांना फसवणाऱ्या अनेक एजन्सीज आशियाई देशात वाढत आहेत. आपल्या घराला पैसा पुरविण्यासाठी देहाचे हाल सोसणारी स्त्री स्वत:च्या शब्दात दुःख सांगू लागते तेव्हा क्षणभर काळाचा प्रवाहसुद्धा गोठून जातो. ती मैत्रिण सांगत होती. ज्या काम करणाऱ्या स्त्रिया निघृण प्रकारांना विरोध करतात. अशांची नांवे काळ्या यादीत जमा होतात. काम करणाऱ्या स्त्रियांची काळीयादी हाँगकाँगमध्ये तयार होते पण वाईट वागवणाऱ्या, लैंगिक शोषण करणाऱ्या, कामासाठी मारहाण करणाऱ्या मालकांची काळीयादी का केली जात नाही? अलिकडे सर्वच देशांत विविध प्रकारच्या अणुसाधनांचा, शस्त्रांचा वापर होतो. त्यासाठी सतत प्रयोग सुरू असतात. अतिरिक्त रसायनांचा वापर सुरू आहे. या साऱ्यामुळे 'बंजरभूमी'चे वेगवेगळे प्रकार वाढू लागले आहेत. केरळमध्ये दक्षिण भागात युरेनियम खूप सापडते. १९५७ साली 'युनो'ने या भागात लोकवस्ती करू नये असे बजावले होते. पण... वाढती लोकसंख्या वगैरे. या सर्वांचा परिणाम तेथील लोकांच्या जननशक्तीवर झाला आहे. चल्लम्माला ९ मुले झाली पण एकही सर्वसामान्य (नॉर्मल) नव्हते. आज एकही जिवंत नाही. अमेरिकेने केलेल्या संशोधनातून लक्षात येत आहे की याचा वाईट परिणाम पुरूषांच्या स्पर्मवर... वीर्यावर झाला आहे. ५२/रुणझुणत्या पाखरा<noinclude></noinclude> bmisx1ohv6b6mhrm42pdvvgeu5ri9gd 155867 155859 2022-08-22T07:23:00Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आले पाहिजे. परंतु हाही एक व्यवसाय आहे. त्यांत आरोग्य सांभाळून पारंगतता मिळवायला काय हरकत आहे? तो व्यवसाय का निवडू नये?" अशी भूमिका विशाल मानवतेच्या दृष्टीतून योग्य होईल? एका परिषदेत एका कार्यकर्तीने अशी भूमिका मांडली. खेड्यातील महिला तिथे होत्या. त्यातील एकीने प्रश्न विचारला, "ताई, तुमची लेक ह्यो वेवसाय मला करायचा असं म्हनली तर तुमी काय सांगाल तिला?"<br>{{gap}}डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी बहिष्कृत भारतात नोंदवले आहे की, 'जेथे स्त्रीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:चे शरीर... शील विकावे लागते, तिथे लोकशाही निर्माणच होऊ शकत नाही.<br>{{gap}}दुसऱ्या सत्राचे नांव होते 'पाण-वेळ' नर्मदा विस्थापितांचे दुःख बुडीबेन आणि लताने मांडले. मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यात राहणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न आणि फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांच्या भयानक जिण्याचे वास्तव चित्र मांडले कौसल्या आणि नसरीनने. तसेच चन्द्रा आणि रूथ मनोरमा या कर्नाटकातल्या झुंजार महिला कार्यकर्तीने, परदेशी नोकरीच्या लोभाने स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांचे प्रश्न मांडले. जकार्ताच्या सुप्रहातीन आणि ताती कृष्णवती यांनी सांगितले की, स्थलांतराचा लोभ दाखवून तरूण मुलींना, स्त्रियांना फसवणाऱ्या अनेक एजन्सीज आशियाई देशात वाढत आहेत. आपल्या घराला पैसा पुरविण्यासाठी देहाचे हाल सोसणारी स्त्री स्वत:च्या शब्दात दुःख सांगू लागते तेव्हा क्षणभर काळाचा प्रवाहसुद्धा गोठून जातो. ती मैत्रिण सांगत होती. ज्या काम करणाऱ्या स्त्रिया निर्घृण प्रकारांना विरोध करतात. अशांची नांवे काळ्या यादीत जमा होतात. काम करणाऱ्या स्त्रियांची काळीयादी हाँगकाँगमध्ये तयार होते पण वाईट वागवणाऱ्या, लैंगिक शोषण करणाऱ्या, कामासाठी मारहाण करणाऱ्या मालकांची काळीयादी का केली जात नाही?<br>{{gap}}अलिकडे सर्वच देशांत विविध प्रकारच्या अणुसाधनांचा, शस्त्रांचा वापर होतो. त्यासाठी सतत प्रयोग सुरू असतात. अतिरिक्त रसायनांचा वापर सुरू आहे. या साऱ्यामुळे 'बंजरभूमी'चे वेगवेगळे प्रकार वाढू लागले आहेत. केरळमध्ये दक्षिण भागात युरेनियम खूप सापडते. १९५७ साली 'युनो'ने या भागात लोकवस्ती करू नये असे बजावले होते. पण... वाढती लोकसंख्या वगैरे. या सर्वांचा परिणाम तेथील लोकांच्या जननशक्तीवर झाला आहे. चल्लम्माला ९ मुले झाली पण एकही सर्वसामान्य (नॉर्मल) नव्हते. आज एकही जिवंत नाही. अमेरिकेने केलेल्या संशोधनातून लक्षात येत आहे की याचा वाईट परिणाम पुरूषांच्या स्पर्मवर... वीर्यावर झाला आहे.<br><noinclude>{{rh|५२ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> pnrcecuvnu1yb3xpwwjhzn1rt4mj7ln अनुक्रमणिका:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf 106 71056 155861 2022-08-22T05:34:37Z Pooja Ramesh Kadam 4303 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष |Language=mr |Volume= |Author=पुरुषोत्तम सखारामशास्त्री हिर्लेकर |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=यज्ञेश्वर गोपाळ दीक्षित |Address=पुणे |Year=1925 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} qr3pyfpjx8q5ylndq0hv8r0ww4vzn7c अनुक्रमणिका:धर्म.pdf 106 71057 155862 2022-08-22T05:47:49Z Pooja Ramesh Kadam 4303 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=धर्म |Language=mr |Volume= |Author=दिनकर सीताराम सांखळकर |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=शंकर विष्णु कावतकर |Address=मुंबई |Year=1923 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 1o20y4q9j5hxac90yoikp0qhhb47bes अनुक्रमणिका:धेनुकथासंग्रह.pdf 106 71058 155863 2022-08-22T05:56:40Z Pooja Ramesh Kadam 4303 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=धेनुकथासंग्रह |Language=mr |Volume= |Author=शंकर सखाराम उर्फ धेनुदास डोळे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=श्रीगोवर्धनसंस्था |Address=पुणे |Year=1929 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} f5igjcxs4cputp1t4lcv1hcezfskeiy अनुक्रमणिका:लोकमान्य टिळक यांचा पोवाडा.pdf 106 71059 155864 2022-08-22T06:06:04Z Pooja Ramesh Kadam 4303 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=लोकमान्य टिळक यांचा पोवाडा |Language=mr |Volume= |Author=रंगनाथ विष्णु खानविलकर |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=दामोदर लक्ष्मण लेले |Address=वाई |Year=1924 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} dy2gcm3k79lw6hwnez8zgh1vcspqdn1 अनुक्रमणिका:श्रीरामायण महाकाव्यांतर्गत रणविहार.pdf 106 71060 155865 2022-08-22T06:17:25Z Pooja Ramesh Kadam 4303 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=श्रीरामायण महाकाव्यांतर्गत रणविहार |Language=mr |Volume= |Author=साधुदास |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोपाळ गोविंद मुजुमदार |Address=पुणे |Year=1916 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} csz5zmtkml2omz2ygp7rqrdgistrbig अनुक्रमणिका:टिळक-जन्म-रहस्य.pdf 106 71061 155866 2022-08-22T07:08:42Z Tushar Kailas Bari 4351 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=टिळक-जन्म-रहस्य |Language=mr |Volume= |Author=कृष्णाजी मोरेश्वर फाटक |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=कृष्णाजी मोरेश्वर फाटक |Address=पुणे |Year=1921 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} erutcerjgh1bq97obvpgcl2tqb5p0a6 अनुक्रमणिका:महाराष्ट्र संस्कृत अमरटिप्पणिका.pdf 106 71062 155868 2022-08-22T07:26:48Z Tushar Kailas Bari 4351 नवीन पान "" proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=महाराष्ट्र संस्कृत अमरटिप्पणिका |Language=mr |Volume= |Author=कृष्णदीक्षित उर्फ बाबादीक्षित बिन्न नारायणदीक्षित वाटवे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=कृष्ण दीक्षित वाटवे |Address=कुरुंदवाड |Year=1891 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=_empty_ |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} beuux6bw5cp5izefhcmxsq2zd1ivf30 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६७ 104 71063 155869 2022-08-22T07:30:19Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}भोपाळची शोकान्तिका तर आजही अस्वस्थ करते. गॅस घटनेत मृत्यू पावलेल्या २००० विधवा, एकाकी महिलांना शिलाईकाम पुरवणारे केंद्र शासनाने अशात बंद केले. रझियांबीचा सांगताना गळा दाटतो पण डोळ्यातून संघर्षाच्या ठिणग्या चेतत असतात. या कहाण्या होत्या, 'कातरवाऱ्याची वेळ' या सत्रातल्या.<br>{{gap}}चौथे सत्र 'भूमी'चे. 'सीतावेळ' म्हणायचे का? झारखंडातल्या आदिवासी स्त्रियांचे प्रश्न म्हणजे 'विकासा'च्या कृतीतून निर्माण झालेल्या समस्या. बिहार म्हणजे दारिद्रयाचे भयानक दर्शन. बिहारमधून अनेक कार्यकर्त्या आल्या होत्या. विकासाची मांडणी करताना त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा विचार केलाच गेला नाही. त्यातून भरडले गेले दोन गट. स्त्रिया आणि मूले त्यांचे माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व लक्षात घेतले नाही. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांचे प्रश्न मांडले गेले.<br>{{gap}}दुपारी विविध क्षेत्रात झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. या सत्राचे नाव होते 'ज्ञानवेळ' गडवालच्या चिपको आंदोलनाच्या वंदना शिवांनी स्त्री आणि पर्यावरण यांतील घट्ट अनुबंध उकलून दाखवला. हाँगकाँगच्या मायाम बिलेवानी आशियातील स्थलांतरित महिलांचे प्रश्न मांडले. मलेशियाच्या इव्लेलिन हॉगने, मोठमोठी धरणे बांधल्यामुळे आदिवासी, परिसरातील लोक, जंगल, प्राणी यांच्या जीवनावर होणाऱ्या आघातांचे चित्र रेखाटले. शेवटी हे सारे ऐकताना काष्ठवत् झालेल्या ज्यूरींच्या प्रतिक्रिया. कृष्णा अय्यरांनी बजावले, "पुरुषी आश्वासनांवर कणभरही विश्वास ठेवू नका. संघटित व्हा (हुंडाबंदी कायदा मृत झाला आहे. पण हुंडा मात्र जिवंत आहे. हुंडाबळींची संख्या वाढते आहे.) स्त्रियांनो, समाजाला हलवा... थोड्या अतिरेकी झालात तरी चालेल. ही प्रचंड धरणे कोणासाठी बांधायची? कंत्राटदारांसाठी? न्याय म्हणजे काय? अन्यायाला कायदेशीर करणे म्हणजे न्याय? आम्ही पुरुषांनी आता स्त्रियांच्यासाठी उभे राहिले पाहिजे. त्यांच्यासाठी... त्यांच्या प्रश्नासाठी बरोबरीने लढले पाहिजे त्या पुढ्यात रहातील आम्ही त्यांना अनुसरु. संपूर्ण आशियाने एकत्र येऊन आपल्या विकासाची विनाशकारी दिशा बदलण्यासाठी संघर्ष दिला पाहिजे.<br>{{gap}}ट्यूनिशियाच्या खालिदा शेरीफ आपल्या कणखर आवाजात बजावत होत्या. विकास केवळ आर्थिक बाबींशी निगडित नसतो. विकासाच्या कल्पनेतून आम्हा स्त्रियांना आणि आमच्या भावी पिढीला... मुलांना वगळले आहे. मुलांच्या विकासाच्या कल्पनेचे स्वप्न पाहणारे... त्यासाठी कष्टणारे 'बाप' आज हरवले आहेत. आपण 'विकासा'च्या कल्पनेला माणूस केंद्री बनवूया. इंदिरा जयसिंगाकडून भोपाळ गॅस प्रकरणातील निवेदन ऐकण्याची इच्छा सर्वांनी प्रदर्शित केली. त्या त्यावर बोलल्या.<br><noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ५३ }}</noinclude> jwqvkp93szxc2vx7famp8mu3jbwgpev पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६८ 104 71064 155870 2022-08-22T07:34:17Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}जनसुनवाईचा कार्यक्रम संपला होता. आता प्रत्येकींच्या देहात 'मनसुनवाई' सुरू होती.<br>{{gap}}२७,२८,२९ जानेवारी १९९५ विमोचना... आशिया महिला मानवी हक्क अभियान. बंगलोर. आयुष्यभर चेतवीत राहणारे दिवस, मैत्रिणी, संस्था आणि आठवणी...<br>{{gap}}आज १३ वर्षांनी मनात येतेय. आज ती चेतना, प्रेरणा देणारी माध्यमे, घनतमात क्षितीजावर तळपणारी शुक्राची चांदणी जपण्यासाठी किमान महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील स्वयंसेवी संघटना एकत्र येणार ना? हा निश्चय निर्धार करूया.<br>{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|५४ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 7q2hnlzq5lvc9ak6g8ghd7yr74m5m2n अनुक्रमणिका:रसवैद्य.pdf 106 71065 155871 2022-08-22T07:37:08Z Tushar Kailas Bari 4351 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=रसवैद्य |Language=mr |Volume= |Author=शंकर दाजी पदे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=यज्ञेश्वर गोपाळ दीक्षित बुकसेलर |Address=पुणे |Year=1924 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} pmtng6a5erdayfad74387g5z6dc90n0 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६९ 104 71066 155872 2022-08-22T07:44:42Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 69 |bSize = 384 |cWidth = 314 |cHeight = 210 |oTop = 36 |oLeft = 29 |Location = center |Description = }} {{gap}}आईचा 'अवकाश... स्पॅन इतका विशाल असतो की शब्दांचे घुमारे नेहमीच नव्या उन्मेषाने मोहरत जातात. तरी परिपूर्ती होत नाही. अधुरेपणा सलत रहातो. त्या दोघींना जाणवले की आई विषयी विविध क्षेत्रातील नामवंतांना बोलते करायचे. त्यातून 'आई' या पुस्तिकेची निर्मिती. जणू या आजच्या आयांनी त्यांच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या आईला वाहिलेली ती स्मरणांजली.<br>{{gap}}इवल्या डोळ्यांना अवघा निसर्ग, गंध...रंग... स्पर्श यांतून उलगडून दाखवणारी आई. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देणारी, निर्भय रहा असे स्पर्शातून सांगत धाडस देणारी आई वात्सल्याचा निरंतर झरा, संकटांना झेलतांना 'आधारवड' होऊन पाठीशी राहणारी, बुद्धी एवढेच गुणार्जनाला महत्व देणारी, दारिद्रय... विषम परिस्थिती या सर्वांशी हसत जुळवून घेणारी महामना आईच!<br>{{gap}}तिचा स्पर्श विलक्षण गारवा आणि ताजवा देणार. म्हणूनच कांदिवलीच्या अनघा धाडी म्हणतात,{{center|'''...पहिल्या पावसात भिजतांना, माय तुझी आठवण येते किंवा.<br>जेव्हा आला पाऊस पहिला<br>भिजतांना जाणवली तुझ्या हातांची ऊब.'''}}{{gap}}ती साक्षर नसली तर निरक्षर कसे म्हणावे तिला? कारण त्याही पलिकडचे शहाणपण... सुजाणत्व तिच्यात असतेच. चैत्रगौरीचं भिंतीवरचं 'लिवणं', अंगणात<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ५५ }}</noinclude> fhdc5thbd17sgylixnbiqnaa9kfb2s3 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७० 104 71067 155873 2022-08-22T07:58:18Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>शेणसडा घालून त्यावर रांगोळी रेखणं, गवरण्यांचा देखणा मांड मांडण हे जमणार तिलाच. भलेही तिने कलेचा... सौंदर्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला नसेल. वयाच्या सुरकुत्यांना निसर्गाची देणगी म्हणून स्विकारत, मनातली उत्सुकता सुकू न देता कंम्प्युटरवर काम करणाऱ्या मुलाशेजारी बसून जिज्ञासेने प्रश्न विचारणारीही आईच. आई म्हणजे साक्षात् उर्जेचा चिरंतन झरा.{{center|'''दासू वैद्य यांचे शब्द. त्यांचे असले तरी प्रत्येकाच्या तनामनातले.<br>प्रत्येक आईचा मुलगा <br>कवी असूच शकत नाही <br>पण प्रत्येक मुलाची आई <br>त्यांच्यासाठी एक कविता असते<br>न विसरणारी...'''}}{{gap}}प्रत्येक स्त्री जेव्हा 'आई' होते किंवा निर्मितीच्या प्रलयंकारी वेदना जवळून अनुभवते तेव्हा 'आई' झाल्यावर तिलाही आईवर कविता लिहाविशी वाटतेच. भलेही ती कवी नसेल. अशीच एक कविता अनामिकेची {{center|'''...अंधाराला हिरमसून पाने मिटून घ्यावीशी वाटतात<br>तेव्हा ...?<br>क्षणात<br>काही क्षण असे येतात <br>पूर्वी इतकेच सजून धजून <br>विझू विझू पहाणाऱ्या<br>आठवणींना<br>नवी पावले<br>जोडून. <br>आई तुझ्या आठवणींना<br>लगटून...'''}}{{gap}}'आई' ही पुस्तिका चाळतांना मलाही माझी आई आठवली. कणखर मनाची, आतल्या आत अश्रूंना बांध घालणारी. १९५५ चा प्रसंग. माझे पपा... शंकररावांनी गोवामुक्ती संग्रामात जाण्याचे ठरवले होते. त्यांना निरोप देण्यासाठी धुळ्याच्या स्टेशनवर गर्दी लोटली होती. माझ्या डोळ्यांचा बांध फुटला होता. मी असेन १४/१५ ची. "शैला, तुझे एकटीचेच पपा सत्याग्रहात चालले नाहीत. अनेकांचे आईवडिल सामिल झाले आहेत. अभिमानाने हसत निरोप दे". आईने कडक शब्दात मऊपणे डोक्यावरून हात फिरवत बजावले.<br><noinclude>{{rh|५६ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> q8aw7m6z8hlcs35aym2b7pgt88hltrj अनुक्रमणिका:महायुद्धाचें सचित्र वर्णन.pdf 106 71068 155874 2022-08-22T07:58:58Z Gokule Vanita 4228 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=महायुद्धाचें सचित्र वर्णन.pdf |Language=mr |Volume= |Author=एक इतिहासभक्त |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=दामोदर सांवळाराम आणि मंडळी |Address=मुंबई |Year=1915 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 9vrjv1k9z7whpm2z5kfmm61eyvtz9oy अनुक्रमणिका:श्रीपंचीकरण.pdf 106 71069 155875 2022-08-22T08:02:08Z Gokule Vanita 4228 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=श्रीपंचीकरण.pdf |Language=mr |Volume= |Author=सद्गुरू श्रीराम |Translator=विष्णु गणेश नेने |Editor= |Illustrator= |School= |Publisher=विष्णुनाथ प्रभुराम वैद्य |Address=मुंबई |Year=1925 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=_empty_ |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} qlht04lqtrbn7uc4to3qir1sblstju7 अनुक्रमणिका:सुबोधवैद्यक भाग २ रा.pdf 106 71070 155876 2022-08-22T08:03:51Z Gokule Vanita 4228 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सुबोधवैद्यक भाग २ रा.pdf |Language=mr |Volume= |Author=शंकर दाजी शास्त्री पदे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=यज्ञेश्वर गोपाळ दीक्षित |Address=पुणे |Year=1924 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} htslvf6zkyiq4si29j1arloj6zljjr0 अनुक्रमणिका:स्वातिधारा श्री ज्ञानेश्वरीतील १०८ वेच्यांची स्मरणी.pdf 106 71071 155877 2022-08-22T08:05:23Z Gokule Vanita 4228 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=स्वातिधारा श्री ज्ञानेश्वरीतील १०८ वेच्यांची स्मरणी.pdf |Language=mr |Volume= |Author=नारायण विष्णु आठवले |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=नारायण विष्णु आठवले |Address=पुणे |Year=1925 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=_empty_ |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} lk1f30wcvs54idsjemtitoq1p39542g पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७१ 104 71072 155878 2022-08-22T08:07:31Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}आईला लिव्हरचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तिचे श्रद्धास्थान असलेली तिची ज्येष्ठ भगिनीसमान असलेली मैत्रिण, ती व इतर काही मैत्रिणींनी महिलांचे आरोग्य व शिक्षणासाठी एक संस्था काढली होती. त्या संस्थेनेही पंचविशी पार केली होती. तेथे काम करणारा सहाय्यक, हिशेब तपासनीस व मैत्रिण यांनी संगनमताने एका महत्वाच्या निर्णयात्मक बैठकीस आई हजर नसतांना तिची 'सही' कुणाकडून तरी करवून घेतली. शासकीय ऑडीट तपासणीत ते उघडकीस आले. मृत्यूशय्येवर दिवस मोजणाऱ्या कनिष्ठेला 'तू लेखी खोटी साक्ष दे' असे सांगायला ज्येष्ठा आली. पण कनिष्ठा ठाम होती. अवघ्या पाच दिवसानंतर आईने चिरविश्रांती घेतली.<br>{{gap}}शेवटच्या क्षणी तिच्या ओठावर सून, कन्या आणि तिला संकटातून बाहेर काढून तिचे जाज्वल्य व्यक्तिमत्व फुलवले अशा मानसकन्यचे नाव होते. आई, संध्याकाळी नातवंडांची दृष्ट काढत असे. 'इडापिडा टळो, आल्यागेल्यांच्या मनात चांगले विचार येवोत आणि सगळ्यांच्या लेकराबाळांचे आयुष्य शतायुषी होवो' ही तिची प्रार्थना असे.{{center|''' 'ती आई होती म्हणूनी<br>घन व्याकूळ मीही रडलो...' '''}}{{gap}}या कवी ग्रेसच्या शब्दातली 'व्याकुळता', घन शब्दातले 'चिरंतन भारलेपण' आणि नसण्याच्या वेदनेची लय मला आजही अस्वस्थ करते.<br>{{gap}}आई अवघ्या अवकाशाला व्यापून उरत असते. ती शब्दात न मावणारी असते. कशी असते ती?{{center|'''शिकेकाईचा सुगंध <br>भरून राहिलाय आसमंतात<br>तिने केव्हाच मोकळा <br>सोडलाय गैरसमजांचा आंबाडा <br>फिरतोय तिच्या मुक्त केसांतून <br>समजुतदार वारा <br>आणि त्याला सापडलेत <br>आईचे हरवलेले डोळे <br>तिच्याच पापणीत<br>(दासू वैद्य)'''}}<br>{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ५७ }}</noinclude> 41s6hc3659bip07pxt1muzwigndd3pp अनुक्रमणिका:शास्त्रीय ताल प्रकाश भाग पहिला.pdf 106 71073 155879 2022-08-22T08:25:04Z Tushar Kailas Bari 4351 नवीन पान "" proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=शास्त्रीय ताल प्रकाश भाग पहिला |Language=mr |Volume= |Author=सीताराम गोविंद ब्रम्हनाळकर |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher= |Address= |Year=1924 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 1kv6gfco7zf3o3l1b3l74a8xca5bfed 155880 155879 2022-08-22T08:25:52Z Tushar Kailas Bari 4351 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=शास्त्रीय ताल प्रकाश भाग पहिला |Language=mr |Volume= |Author=सीताराम गोविंद ब्रम्हनाळकर |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=सीताराम गोविंद ब्रम्हनाळकर |Address=सांगली |Year=1924 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 5wt90k5w2fozug4ean5v1949jdxgi2q अनुक्रमणिका:सृष्टिशास्त्र (भूगोल-खगोल).pdf 106 71074 155881 2022-08-22T08:32:05Z Gokule Vanita 4228 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सृष्टिशास्त्र (भूगोल-खगोल).pdf |Language=mr |Volume= |Author=बाळकृष्ण श्रीधर कोलटकर |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=बाळकृष्ण श्रीधर कोलटकर |Address=पुणे |Year=1925 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} rsbbjz74z8sv87ibg4ln5sm85mskfr1 अनुक्रमणिका:हिंदुधर्म शिक्षण पुस्तक पहिले.pdf 106 71075 155882 2022-08-22T08:38:25Z Tushar Kailas Bari 4351 नवीन पान proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=हिंदुधर्म शिक्षण पुस्तक पहिले |Language=mr |Volume= |Author=महादेवशास्त्री दिवेकर |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=टिळक महाराष्ट्र विद्यापीठ |Address=पुणे |Year=1925 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} twf4tpe321j0h9jzjztorykcznizhh9