विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय पहिला 0 23565 155731 155718 2022-08-16T13:11:13Z QueerEcofeminist 918 Reverted 1 edit by [[Special:Contributions/2409:4042:2D86:BED9:0:0:A2CB:6F01|2409:4042:2D86:BED9:0:0:A2CB:6F01]] ([[User talk:2409:4042:2D86:BED9:0:0:A2CB:6F01|talk]]): Rv([[m:User:Xiplus/TwinkleGlobal|TwinkleGlobal]]) wikitext text/x-wiki आयोध्याकांड <br /> [[वर्ग:भावार्थ रामायण बालकांड]] 65abp7pqu7c1dinranm1qol1126c0xx पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/64 104 63334 155760 108229 2022-08-17T06:58:27Z अरुणा केळकर. 3805 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अरुणा केळकर." />३४ {{center|{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}}}</noinclude> रोधी अशी वचनें एकाच ग्रंथांत आढळतात. 'स्वर्ग तुमच्या हृदयांतच आहे' असें ख्रिस्ताने एके ठिकाणी सांगितले आहे, तर दुसरे ठिकाणी 'आपला पिता जो अकाशांत आहे,' असें तो ह्मणतो! ही वचनें परस्पर अगदी विरोधी दिसतात. यांची एकवाक्यता होणे शक्य आहे काय ? ही वाक्ये तो कोणत्या निरनिराळ्या प्रसंगी वोलला याचा विचार केला पाहिजे. ज्यांना धर्मज्ञान मुळीच नाहीं, धर्माची सामान्य मूलभूत तत्वे ज्यांच्या कधी कानांवरूनहि गेली नाहीत, अशा मनुष्यांस 'परमेश्वर अंतराळांत आहे ' असेंच सांगणे इष्ट आहे. आपणापुढे असलेल्या श्रोत्यांचा अधिकार बरोबर ओळखून त्यांस समजेल अशा भाषेनें उपदेश करणे हे सद्गुरूचे कामच आहे. सामान्य मनुष्याला प्रत्यक्ष पदार्थांच्या साहाय्यानेच उपदेश केला पाहिजे. अतींद्रिय ज्ञान त्याच्या डोक्यांत शिरणेच शक्य नाही. एखादा मनुष्य लौकिकदृष्टीने मोठा पंडित असेल, पण त्याचे धर्मज्ञान पाहिले तर एखाद्या लहान मुलास शोभण्यासारखे असण्याचा संभव आहे. इंद्रियजन्य सुखाचा अभिलाष सुटतां सुटतां जो मनुष्य इंद्रियांच्या पलीकडे पोहोचला आहे, त्याला 'आकाशाचें राज्य स्वतःच्या अंतःकरणांतच आहे' ही गोष्ट बरोबर पटेल. स्वतःचे अत्यंत पवित्र अंतःकरण ह्मणजे 'आकाशाचें राज्य ' ही गोष्ट तो अनुभवाने समजण्याच्या स्थितीत असतो. याकरितां एकाच धर्मपुस्तकांत परस्परविरोधि वचनें आढळली तर ती निरनिराळ्या अधिकाराच्या व्यक्तीकरतां असतात, असे समजावे. तसेच प्रत्येक मनुष्य आपापल्या धर्माप्रमाणे वागतो ह्मणून त्यास दोष देणेहि वाजवी नाही. अधिकारपरत्वे कित्येकांस मूर्ति अथवा दुसरी कांहीं चिन्हें यांचा उपयोग करावा लागेल. मनुष्याच्या अंतरंगाशी बोलण्याची ती एकप्रकारची भाषाच आहे.<br> {{gap}}आतां दुसरी एक गोष्ट विशेषेकरून तुमच्या चित्तावर ठसली पाहिजे ती ही की, अमुक मते आपण स्वीकारली किंवा एखाद्या धर्मपुस्तकांत सांगितलेल्या कवाइती आपण बरोबर केल्या तर तेवढ्यानेच आपण धार्मिक झालों असें होत नाही. तुह्मीं कोणती धर्मपुस्तकें वाचितां अथवा कोणत्या मतांवर विश्वास ठेवतां ही बाब यत्किचिहि महत्वाची नसून तुह्मी वाचतां त्यांतले स्वत:च्या ठिकाणी तुम्ही काय अनुभविले आहे, हे पाहणे महत्वाचे आहे. 'ज्यांचे अंतःकरण पवित्र आहे ते धन्य होत; कारण ते परमेश्वरास पाहतील.' असें जें बायबलांत ह्मटलें तें सर्वथैव खरे आहे. होय, याच जन्मांत त्यांस परमेश्वर खचित भेटेल. यालाच मुक्तस्थिति असें ह्मणतात. काही विशिष्ट मंत्र म्हटले अथवा<noinclude></noinclude> 0d72ivf4hy20izc32enwrivv8igra3m पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/65 104 63335 155761 108230 2022-08-17T07:06:14Z अरुणा केळकर. 3805 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अरुणा केळकर." />{{center|{{x-larger|प्रथम खंड.}}}} {{right|३५}}</noinclude> तोंडाने नुसती काही विशेष प्रकारची बडबड केली ह्मणजे मुक्ति मिळेल असें कोणी ह्मणतात; परंतु नुसत्या बाह्य कृतीने परमश्वेर मिळेल असे कोणत्याहि महात्म्याने आजपर्यंत केव्हांहि सांगितले नाही. मुक्ति मिळण्यासाठी बाहेरून कोणतीहि साधने आणावी लागत नाहीत. ती आपल्याच अंतरंगांत आपणास शोधिली पाहिजेत. अंतर्बाह्य परमेश्वरच भरून राहिला आहे, ही गोष्ट आपणास अनुभवानें पटावी लागते. बाह्य आचार अगदीच निरुपयोगी आहेत असें माझें ह्मणणे नाही; परंतु त्यांचा उपयोग केवळ आरंभी असून पुढे लवकरच ते निरुपयोगी होतात. धर्म हे पुस्तकांमुळे अस्तित्वात आलेले नसून धर्मानंतर पुस्तकें झाली आहेत, हे आपण विसरता कामा नये. कोणत्याहि पुस्तकानें परमेश्वरास उत्पन्न केलें नसून सर्व मोठे ग्रंथ परमेश्वराच्या प्रेरणेने झाले आहेत. तसेंच आमच्या जीवात्म्याचे अस्तित्वहि पुस्तकांवर अवलंबून नाही, ही गोष्ट प्रत्येक मुमुक्षुने नेहमी लक्षात ठेविली पाहिजे. जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य स्वतः अनुभविणे हे सर्व धर्माचे ध्येय आहे. हाच विश्वधर्म होय. कल्पना आणि मार्ग निरनिराळे झाले तरी शेवटी त्या सर्वांची भेट होण्याचे ठिकाण एकच आहे. सर्व धर्माचा एकच पाया कोणता ह्मणून कोणी विचारिलें तर परमेश्वराशी ऐक्य' या शब्दांनी त्या प्रश्नाचें मी उत्तर देईन. एखाद्या वर्तुळाच्या परिघापासून मध्यबिंदूपर्यंत काढिलेल्या रेषा जशा मध्यबिंदूंत एकत्र व एकजीव होतात तसेंच सर्व धर्मानी सांगितलेले निरनिराळे मार्ग परमेश्वरस्वरूपांत एकत्र व एकरूप होतात. इंद्रियांनी अनुभवास येणाऱ्या व खऱ्या दृष्टीने केवळ छायेसारख्या असणाऱ्या या जगापलीकडे असलेल्या परमात्म्याचा अनुभव आला ह्मणजे आपण कोणत्या उपायांनी हे साध्य केले हा प्रश्न महत्वाचा नाही. तुम्ही कोणतीहि विशिष्ट मते मान्य करा अथवा करूं नका; एखाद्या पुस्तकानें आंखून दिलेल्या मर्यादेत राहा, अथवा राहूं नका; एखाद्या विशिष्टपंथाचे ह्मणवा अथवा ह्मणवू नका, परंतु कोणत्याहि मार्गाने परमेश्वराचे अस्तित्व स्वतःच्या ठिकाणी तुह्मी अनुभविलें ह्मणजे तुमचे काम झाले. एखादा मनुष्य, जगांत अस्तित्वांत असणाऱ्या सर्व धर्मावर मी विश्वास ठेवितों असें ह्मणेल, जगांतील सर्व धर्मग्रंथ त्यास मुखोद्गत असतील, जगांतील सर्व तीर्थात त्याने स्नान केले असेल, आणि इतके करून परमेश्वराबद्दल अगदी पुसट कल्पनाहि त्यास न होणे संभवनीय आहे. तसंच साऱ्या जन्मांत एखादें देऊळ नजरेनेंहि न पाहतां किंवा धर्मपुस्तकांत सांगितलेला एखादाहि विधि न करतां परमेश्वराचा अंतरंगांत अनुभव होणे<noinclude></noinclude> ctgoul2ooyznj05o7d5mi0h8b8f74mf पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/66 104 63336 155766 108231 2022-08-17T07:18:12Z अरुणा केळकर. 3805 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अरुणा केळकर." /> ३८ {{center|{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}}}</noinclude> छाती पिटण्यांत कांही फायदा नाही. मुकाट्याने एक काडी ओढली म्हणजे अंधार कोठे शोधूनहि सांपडत नाही. आपल्या चैतन्यास चालन द्या, अंतःकरण पवित्र करा म्हणजे पाप कोठेच नव्हतें असें तुम्ही म्हणूं लागाल. पापी, पापी, म्हणून कंठशोष न करतां आपण ज्या मूळस्वरूपाचे आहों त्या स्वरूपाचें चिंतन करा.<br> <br> {{center|[व्याख्यान संपल्यानंतर पुढील प्रश्नोत्तरे झाली.]}} <br> '''एक श्रोताः-''' स्वामी, नरकयातनांचे वर्णन करून मनुष्याच्या चित्तांत भय उत्पन्न झाल्याशिवाय तो सन्मार्गवर्ति राहणार नाही. उपदेशकाचा आपल्या श्रोत्यांवर दाब राहिला पाहिजे.<br> '''स्वामीः'''- अशा रीतीने खोटी भीति दाखवून धर्मप्रेम उत्पन्न करण्यापेक्षा परमेश्वरस्वरूपाची ओळख श्रोत्यास करून देणे आधिक चांगलें. कारण, केवळ भीतीमुळे जो मनुष्य सदाचरणी बनलेला असतो तो केवळ ढोंगी असतो. भीतीचें कारण संपल्याबरोबर तो अधिक उच्छृखल होण्याचा संभव असतो.<br> '''श्रोता:'''- 'आकाशाचे राज्य या लोकी नाही' असें भगवान् ख्रिस्त ह्मणाला त्याचा अर्थ काय ?<br> '''स्वामीः-''' स्वर्गाचे राज्य आपल्याच अंतरंगांत आहे असें भगवानाने सांगितले. या पृथ्वीवर आपणांस स्वर्गातले भोग प्राप्त होतील अशी यहूदी लोकांची कल्पना होती ती खोटी असें भगवानाने सुचविले आहे.<br> '''श्रोता:-''' उत्क्रांतीने आपण चतुष्पादांचे मनुष्यप्राणी झालों असें ह्मणतात. आपला या मतावर विश्वास आहे काय ?<br> '''स्वामीः-''' उत्क्रांतीनें चतुष्पादांतून मनुष्यस्थितीपर्यंत येतां येईल, असे माझे मत आहे. <br> '''श्रोताः'''- ज्याला स्वतःचे पूर्वजन्म समजतात असा कोणी सत्पुरुष आपण पाहिला आहे काय ?<br> '''स्वामीः-''' होय. इतक्या प्रतीची इच्छाशक्तीची वाढ झालेले लोक माझ्या अवलोकनांत आले आहेत.<br> '''श्रोता:-''' क्रुसावर खिळून यहुद्यांनी ख्रिस्ताचा जीव घेतला, यावर आपला विश्वास आहे काय?<noinclude></noinclude> pjz0us94vx6brxbsj8povwxpemts82r पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/67 104 63337 155770 108232 2022-08-17T07:27:06Z अरुणा केळकर. 3805 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अरुणा केळकर." />{{center|{{x-larger|प्रथम खंड.}}}} {{right|३९}}</noinclude> '''स्वामीः-''' भगवान् येशुख्रिस्त परमेश्वराचा प्रत्यक्ष अवतारच होता. त्यास मारणे शक्य नव्हते. आपण ख्रिस्ताला क्रुसावर खिळून मारले असा यहुदीलोकांस दृष्टिभ्रम झाला.<br> '''श्रोता:-''' असे दोन तीन येशुख्रिस्त प्रभूनें निर्माण करून दाखविले असते तर तो मोठाच चमत्कार झाला असता. नाही ? .<br> '''स्वामीः'''- सत्याच्या मार्गात चमत्कार मोठाच अडथळा आणितात. भगवान् बुद्धाला त्याच्या शिष्यांनी एकदां एक मनुष्य चमत्कार करतो ह्मणून सांगितले. शिष्य ह्मणाले, 'लोट्याला हात लावल्याशिवाय अमक्या मनुष्याने तो बराच उंच उचलिला.' त्यावर भगवानांनी सांगितले की चमत्कारांच्या मागे न लागतां सत्यशोधनाच्या मागे लागा. आपली बुद्धि तीव्र करून तिच्या प्रकाशाने चालण्याची संवय करा. चमत्कारांच्या मागे गेल्यास केव्हां खड्डयांत पडाल याचा भरंवसा नाही.<br> '''श्रोता:-''' येशुनिस्ताने पर्वतावर आपल्या शिष्यांस उपदेश केला यावर आपला विश्वास आहे काय ?<br> '''स्वामीः-''' होय. पुस्तकांत असे लिहिले आहे त्या अर्थी इतरांप्रमाणेच मलाहि त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. परंतु खऱ्याखोट्याचा हा प्रश्न बाजूस ठेविला तरी त्यांतील विचार आपणा सर्वोस सारखेच ग्राह्य होण्याजोगे आहेत. भगवान् बुद्धाने निस्तापूर्वी पांचशे वर्षे धर्मज्ञान सांगितले. त्यांतील सारांश आपण पाहावा. खऱ्याखोटयाचा निवाडा करण्यांत फायदा नाही. ख्रिस्त काय, जरदुष्ट काय अथवा कन्फ्यूशस काय ? या सर्वांची वचनें नेहमी कल्याणप्रदच असतात.<br> '''हिंदु धर्म.'''<br> '''[ब्रुक्लिन स्टँडर्ड पत्रावरून.]''' <br> {{gap}}ता. ३० डिसेंबर १८९४ रोजी परमहंस स्वामी विवेकानंद यांनी ब्रुक्लिन एथिकल सोसायटीच्या विनंतीस मान देऊन वरील विषयावर एक व्याख्यान दिले. व्याख्यानास हजारों स्त्रीपुरुषांची गर्दी झाली होती. स्वामीजींचे व्याख्यान चालू असतां सर्व श्रोतृगण चित्राप्रमाणे तटस्थ झाला होता. हिंदुस्थानांतील पुरातन ऋषिमंडळ जणूं काय स्वामीजींच्या मुखाने बोलत होते असे वाटले. <br> {{gap}}अत्यंत पुरातन धर्मतत्वांचे प्रतिनिधि या नात्याने स्वामींची कीर्ति अगोदरच सर्वतोमुखी झाली असल्यामुळे व्याख्यानश्रवणास सर्व प्रकारच्या धंद्यांच्या<noinclude></noinclude> kum8kg6sagncgm1erekrqzohzp65bvn पान:आलेख.pdf/75 104 65235 155734 121213 2022-08-16T13:46:55Z Sunita prakash gambhir 4297 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br> <br> <br> <br> {{gap}}तरी संशोधनाचा हेतू, प्रक्रिया आणि फलित यात विशेष फरक नसतो.{{nop}} संशोधनात नवीन तत्त्वांचे संशोधन उपलब्ध सिद्धान्ताचे नव्या स्वरूपात प्रतिपादन{{nop}} आणि योग्य त्या निष्कर्षांपर्यंत पोहचण्याची जिद्द हवी. स्वीकृत अभ्यास विषयाला{{nop}} आपण किती व काय हातभार लावला हे त्यातून स्पष्ट व्हायला पाहिजे. आपल्या{{nop}} विषयाच्या अनुषंगाने त्या संदर्भातील ज्ञानकक्षा विस्तृत करता आल्या पाहिजेत.{{nop}} त्यासाठी चांगली प्रतिपादन शैली आत्मसात केली पाहिजे. त्यासाठी निरीक्षण व{{nop}} परीक्षण केले पाहिजे त्यातून प्रतिभेला गवसलेले सत्य केलेले तत्त्वशोधन साकार{{nop}} करता आले पाहिजे. आपण केलेल्या संशोधनाकडे भावी संशोधक मार्गदर्शनासाठी{{nop}} पाहणार आहेत याची जाणीव ठेवूनच हे सारे संशोधन व्हायला पाहिजे.{{nop}} <br> {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}}xxx <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> <br> आलेख {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}}६८<noinclude></noinclude> fbkj06rb595kiq86fm3o27y55cjl83d पान:आलेख.pdf/82 104 65242 155728 155598 2022-08-16T12:29:51Z Sunita prakash gambhir 4297 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br> <br> <br> <br> <br> <br> {{x-larger|'''तोन'''}}{{gap}}{{gap}}{{x-larger|'''टिपा अकरा'''}}{{nop}} <br> <br> <br> '''एक:''' '''मराठी साहित्यातील कर्ण'''{{nop}} <br> {{gap}}प्रा. सुशीला पाटील यांनी २६ मे १९७३ ते १६ ऑक्टोंबर १९७३ या{{nop}} कालावधीत 'औज' साप्ताहिकातून प्रकाशित केलेली महाभारतातील कर्ण विषयक{{nop}} साहित्यावरील लेखमाला म्हणजे 'मराठी साहित्यातील कर्णं' हे पुस्तक होय. १९५१{{nop}} पासून १९७१ या वीस वर्षाच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या कर्ण विषयक संशोध-{{nop}} नात्मक, ललित गद्यात्मक, चरित्रपर, कादंबरी, नाटक, सामाजिक भौतिक दृष्टीतून{{nop}} लिहिलेले, चिंतनपर अशा विविध स्वरूपी साहित्याचा विशिष्ट दृष्टिकोणातून{{nop}} मूल्यमापनाचा प्रयत्न केला आहे. प्रा.सुशीला पाटील यांनी स्वीकारलेला दृष्टिकोण{{nop}} हा परंपरागत शुद्ध महाभारतीय आहे असे म्हणता येईल.{{nop}} {{gap}}प्राचार्य अ. दा. आठवले, डॉ. रा. शं. वाळिंबे, बाळशास्त्री हरदास यांच्याशी{{nop}} मिळताजुळताच लेखिकेचा दृष्टिकोण आहे. एकदा स्वीकारलेल्या गृहितांशी, दृष्टि{{nop}} कोणाशी इमान राखून त्यांनी आपले मूल्यमापन सादर केले आहे हे लेखिकेचे{{nop}} अभिनंदनीय यश आहे.{{nop}} {{gap}}पण त्यांनी स्वीकारलेला दृष्टिकोण हा कर्णविषयक सर्वच साहित्यकृतींना{{nop}} एकाच मापाने मोजणारा असल्यामुळे त्यांचे गृहीत सर्व साहित्यकृतींना न्याय देऊ{{nop}} शकले असे वाटत नाही.{{nop}} {{gap}}अललित किंवा वैचारिक चिंतनपर समीक्षणात्मक जन्माला आलेल्या साहि-{{nop}} त्याचा- उदा० बाळशास्त्री हरदास यांचा व्याख्यान ग्रंथ, आनंद सांधले यांचा 'हा{{nop}} <br> <br> आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७५<noinclude></noinclude> a7g65ql21wbs7n6qut3cn6faoqa1p5f पान:आलेख.pdf/84 104 65244 155729 121222 2022-08-16T13:01:24Z Sunita prakash gambhir 4297 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br> <br> <br> <br> पद्धती असते. या पद्धतीने पाहाणी करून प्रत्येक कर्णविषयक साहित्यकृतीला साभि.{{nop}} प्राय, अर्थपूर्ण अशा शीर्षकात गोवण्याचा, पकडण्याचा प्रयत्न सुशीला पाटील यांनी{{nop}} केला आहे. या त्यांच्या भूमिकेने श्री. हरदास आठवले, डॉ. वाळिंबे यांचे (काही{{nop}} अंशी गो. नी. दांडेकर, अल्पांशाने शिवाजी सावंत यांचे) कर्ण महाभारतानुसारी{{nop}} असल्याचा निर्णय दिला आहे तर अन्य ललित लेखन प्रासंगिक, काल्पनिक, विविध{{nop}} दृष्टींतून रेखाटलेली कर्णाची कल्पनाचित्रे आहेत असा निर्वाळा त्यांनी दिला आहे.{{nop}} शेवटी त्यांनी उपसंहारात गुणदोषांची परिसीमा गाठणारा स्वतःच्या दृष्टिकोनातून{{nop}} कर्णं टिपला आहे<br>. {{gap}}या पुस्तकाची सगळयात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रा.नरहर कुरुंदरकर{{nop}} यांची त्यांच्या अनेक प्रस्तावनांप्रमाणेच याही पुस्तकाची प्रस्तावना ! तो अनेक{{nop}} दृष्टींनी अभ्यासनीय व चिंतनीय आहे. महाभारताकडे पाहाण्याचा दृष्टिकोण कर्ण-{{nop}} विषयक चिंतन, व्यासंगपूर्ण अधिकाराने तीमधून साकार झालेला आहे. या विचार-{{nop}} परिप्लुत संयुक्त प्रस्तावनेचा स्वतंत्रपणे परामर्श घ्यावा लागेल.<br> {{x-larger|'''दोन :''' }} {{x-larger|'''वनवासी फूल''' }}<br> {{gap}}'वनवासी फूल' हे रेव्हरंड टिळकांचे प्रसिद्ध काव्य खंडकाव्य, दीर्घकविता,{{nop}} चितनिका या नावाने ते मराठी साहित्यात उल्लेखिले जाते. 'बनवासी फूलाची{{nop}} मूळ प्रकृती खंडकाव्याची आहे हे आदर्श खंडकाव्य कल्पनेतूनच सूचित होते.<br> {{gap}}या काव्यात व्यक्तीच्या अंतरंग दर्शनाला, मनोविश्लेषणाला विशेष प्राधान्य{{nop}} दिले आहे. त्यात कथा निवेदनापेक्षा मानवी भावनाविष्काराला महत्त्व प्राप्त झाले{{nop}} आहे. विचार आणि भावसत्य; कविमनातील भावमधूर स्पंदन येथे साकार झाले{{nop}} आहे.<br> {{gap}}कवि रुपातील 'मी' या काव्यात सर्वत्र संचार करतो. या कवीचा पुष्पाशी{{nop}} सुसंवाद प्रस्थापित होतो. कविसृष्टीतील हे वनवासी फूल बोलते. फूल आणि कषी{{nop}} या दोन व्यक्ती स्वतःच्या जीवनविषयक कल्पना आपसातील संभाषणातून क्रिया{{nop}} प्रतिक्रियेच्या स्वरूपात व्यक्त करतात. अखेरपर्यंत फूल अट्टहासाने आपले म्हणणे{{nop}} पटवून देण्याचा प्रयत्न करीत राहते. शेवटी कवीच्या अश्रूचे मोल त्याला उगमते.{{nop}} त्यातच ते फूल स्वतःला झोकून देते.<br> आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७७<noinclude></noinclude> no007b92erzlxcalemdjrimluoi65ap 155730 155729 2022-08-16T13:04:44Z Sunita prakash gambhir 4297 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br> <br> <br> <br> पद्धती असते. या पद्धतीने पाहाणी करून प्रत्येक कर्णविषयक साहित्यकृतीला साभि.{{nop}} प्राय, अर्थपूर्ण अशा शीर्षकात गोवण्याचा, पकडण्याचा प्रयत्न सुशीला पाटील यांनी{{nop}} केला आहे. या त्यांच्या भूमिकेने श्री. हरदास आठवले, डॉ. वाळिंबे यांचे (काही{{nop}} अंशी गो. नी. दांडेकर, अल्पांशाने शिवाजी सावंत यांचे) कर्ण महाभारतानुसारी{{nop}} असल्याचा निर्णय दिला आहे तर अन्य ललित लेखन प्रासंगिक, काल्पनिक, विविध{{nop}} दृष्टींतून रेखाटलेली कर्णाची कल्पनाचित्रे आहेत असा निर्वाळा त्यांनी दिला आहे.{{nop}} शेवटी त्यांनी उपसंहारात गुणदोषांची परिसीमा गाठणारा स्वतःच्या दृष्टिकोनातून{{nop}} कर्णं टिपला आहे<br>. {{gap}}या पुस्तकाची सगळयात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रा.नरहर कुरुंदरकर{{nop}} यांची त्यांच्या अनेक प्रस्तावनांप्रमाणेच याही पुस्तकाची प्रस्तावना ! तो अनेक{{nop}} दृष्टींनी अभ्यासनीय व चिंतनीय आहे. महाभारताकडे पाहाण्याचा दृष्टिकोण कर्ण-{{nop}} विषयक चिंतन, व्यासंगपूर्ण अधिकाराने तीमधून साकार झालेला आहे. या विचार-{{nop}} परिप्लुत संयुक्त प्रस्तावनेचा स्वतंत्रपणे परामर्श घ्यावा लागेल.<br> <br> <br> {{x-larger|'''दोन :''' }} {{x-larger|'''वनवासी फूल''' }}<br> <br> <br> {{gap}}'वनवासी फूल' हे रेव्हरंड टिळकांचे प्रसिद्ध काव्य खंडकाव्य, दीर्घकविता,{{nop}} चितनिका या नावाने ते मराठी साहित्यात उल्लेखिले जाते. 'बनवासी फूलाची{{nop}} मूळ प्रकृती खंडकाव्याची आहे हे आदर्श खंडकाव्य कल्पनेतूनच सूचित होते.<br> {{gap}}या काव्यात व्यक्तीच्या अंतरंग दर्शनाला, मनोविश्लेषणाला विशेष प्राधान्य{{nop}} दिले आहे. त्यात कथा निवेदनापेक्षा मानवी भावनाविष्काराला महत्त्व प्राप्त झाले{{nop}} आहे. विचार आणि भावसत्य; कविमनातील भावमधूर स्पंदन येथे साकार झाले{{nop}} आहे.<br> {{gap}}कवि रुपातील 'मी' या काव्यात सर्वत्र संचार करतो. या कवीचा पुष्पाशी{{nop}} सुसंवाद प्रस्थापित होतो. कविसृष्टीतील हे वनवासी फूल बोलते. फूल आणि कषी{{nop}} या दोन व्यक्ती स्वतःच्या जीवनविषयक कल्पना आपसातील संभाषणातून क्रिया{{nop}} प्रतिक्रियेच्या स्वरूपात व्यक्त करतात. अखेरपर्यंत फूल अट्टहासाने आपले म्हणणे{{nop}} पटवून देण्याचा प्रयत्न करीत राहते. शेवटी कवीच्या अश्रूचे मोल त्याला उगमते.{{nop}} त्यातच ते फूल स्वतःला झोकून देते.<br> आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७७<noinclude></noinclude> 3dksdpz2g76l7gnnod7xet3cdrypowc पान:आलेख.pdf/85 104 65245 155732 121223 2022-08-16T13:28:33Z Sunita prakash gambhir 4297 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br> <br> <br> <br> {{gap}}वस्तुत: 'कळीचे फूल होते फूलाचे निर्माल्य बनते ही निसर्गातील एक रुढ{{nop}} किमया. या नैसर्गिक सत्याचा अप्रतिम विनियोग रे. टिळकांनी या काव्यात केला{{nop}} आहे. इसापनीतीच्या कथेतील प्राण्यांचे परस्पर संवाद जसे त्या कथेने निर्मिलेले{{nop}} एक वास्तव समजून आपण त्यातून सूचित होणाऱ्या चिंतनावर, तत्त्वावर आपले{{nop}} लक्ष केंद्रित करतो तीच स्थिती या काव्यातही आहे.<br> {{gap}}'वनवासी फूल'मध्ये कवी आणि फूल ही जणूकाही दोन पाने बनली. त्यामुळे{{nop}} खंडकाव्यात अभिप्रेत असलेली कथात्मकता येथे अवतरली आहे. खंडकाव्यात प्रत्येक{{nop}} वेळी माधव ज्यूलियनांच्या सुधारका सारखी घटना प्रसंग आणि व्यक्तिचित्रणांची{{nop}} गुंफण असावी असे म्हणता येणार नाही. अनिलांच्या भग्नमूर्तीत हो भग्नमूर्तीशी एका{{nop}} कविमनाच्या भावनोत्कट व प्रक्षोभक पण एकतर्फी संवाद झालेला आहे म्हणून{{nop}} त्याचे ही स्वरूप वेगळे बनले आहे. पण कालिदासाच्या 'मेघदूता'ला खंडकाव्याच्या{{nop}} आदर्श मानदंड म्हणून आपण स्वीकारल्यानंतर त्या वस्तूपाठानुसार भग्नमूर्ती, वन-{{nop}} बासी फूल या दीर्घ चितनपर काव्याचाही विचार करावा लागेल. मेघदूताशी वनवासी{{nop}} फूलाचे साम्य भग्नमूर्तीपेक्षाही अधिक जाणवते. शापित यक्ष मेघाशी संवाद प्रस्था-{{nop}} पित करतो त्याच प्रमाणे द्विधा मनःस्थितीतील कवी येथे फूलाशी संवाद प्रस्थापित{{nop}} करतो. आपले मनोगत या निमित्ताने प्रगट करतो.<br> {{gap}}विचारांना येथे भावनेचे अंकूर फुटतात. विचारांना कार्य प्रवण करणारे एक{{nop}} तत्त्व यातून कवीने सांगितले आहे. म्हणून या काव्यातील कबीने बनवासी फूलाला{{nop}} हळूवारपणे जनसेवेचा सन्मार्ग दाखाविला आहे.<br> {{gap}}'अर्वाचीन मराठीतील खंडकाव्ये या प्रबंधात डॉ. ह. कि. तोडमल यांनी{{nop}} नमूद केल्याप्रमागे रे. ना. वा. टिळक ख्रिस्ती धर्मातील निष्पाप प्रेम व सेवाभाव{{nop}} या उदात तत्वाकडे झुकले होते. वैयक्तिक निःश्रेयस् निवृत्तिवादी परंपरेतील{{nop}} भारतीय तत्त्वज्ञान की प्रेम आणि सेवाभाव यावर आधारित प्रवृत्तीवादी (ख्रिस्ती){{nop}} धर्माचार हा संघर्ष त्याच्या मनात ख्रिस्ती होण्यापूर्वीपासून चालू असावा, या{{nop}} याच्या अध्यात्मिक आंतरिक संघर्षाचे उत्कट प्रत्यंतर या काव्यात येते.<br> {{gap}}टिळक ख्रिस्ती होण्यापूर्वीच सन्याशी झाले होते आणि पुनश्च संसारातही{{nop}} आले होते. ख्रिस्ती झाल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस ख्रिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट{{nop}} पंथांना संमत नसलेला सन्यासही त्यांनी घेतला. 'देवाचा दरबार ' ही संस्था{{nop}} १९१७ साताऱ्याला स्थापना केली यावरून वनवासी फूल काव्यात व्यक्त झालेली{{nop}} आंतरिक संघर्ष टिळकांच्या आयुष्याखेरिसही चालू होता. बनवांसी फूलाच्या{{nop}} आकलनास उपयोग होऊ शकेल अशी ही माहिती वस्तुस्थिती आहे.<br> <br> <br> आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७८<noinclude></noinclude> 4af5c738v3fiuvq6laz0mie7r0vgw49 155733 155732 2022-08-16T13:37:41Z Sunita prakash gambhir 4297 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br> <br> <br> <br> {{gap}}वस्तुत: 'कळीचे फूल होते फूलाचे निर्माल्य बनते' ही निसर्गातील एक रुढ{{nop}} किमया. या नैसर्गिक सत्याचा अप्रतिम विनियोग रे. टिळकांनी या काव्यात केला{{nop}} आहे. इसापनीतीच्या कथेतील प्राण्यांचे परस्पर संवाद जसे त्या कथेने निर्मिलेले{{nop}} एक वास्तव समजून आपण त्यातून सूचित होणाऱ्या चिंतनावर, तत्त्वावर आपले{{nop}} लक्ष केंद्रित करतो तीच स्थिती या काव्यातही आहे.<br> {{gap}}'वनवासी फूल'मध्ये कवी आणि फूल ही जणूकाही दोन पाने बनली. त्यामुळे{{nop}} खंडकाव्यात अभिप्रेत असलेली कथात्मकता येथे अवतरली आहे. खंडकाव्यात प्रत्येक{{nop}} वेळी माधव ज्यूलियनांच्या सुधारका सारखी घटना प्रसंग आणि व्यक्तिचित्रणांची{{nop}} गुंफण असावी असे म्हणता येणार नाही. अनिलांच्या भग्नमूर्तीत हो भग्नमूर्तीशी एका{{nop}} कविमनाच्या भावनोत्कट व प्रक्षोभक पण एकतर्फी संवाद झालेला आहे म्हणून{{nop}} त्याचे ही स्वरूप वेगळे बनले आहे. पण कालिदासाच्या 'मेघदूता'ला खंडकाव्याच्या{{nop}} आदर्श मानदंड म्हणून आपण स्वीकारल्यानंतर त्या वस्तूपाठानुसार भग्नमूर्ती, वन-{{nop}} बासी फूल या दीर्घ चिंतनपर काव्याचाही विचार करावा लागेल. मेघदूताशी वनवासी{{nop}} फूलाचे साम्य भग्नमूर्तीपेक्षाही अधिक जाणवते. शापित यक्ष मेघाशी संवाद प्रस्था-{{nop}} पित करतो त्याच प्रमाणे द्विधा मनःस्थितीतील कवी येथे फूलाशी संवाद प्रस्थापित{{nop}} करतो. आपले मनोगत या निमित्ताने प्रगट करतो.<br> {{gap}}विचारांना येथे भावनेचे अंकूर फुटतात. विचारांना कार्य प्रवण करणारे एक{{nop}} तत्त्व यातून कवीने सांगितले आहे. म्हणून या काव्यातील कवीने बनवासी फूलाला{{nop}} हळूवारपणे जनसेवेचा सन्मार्ग दाखाविला आहे.<br> {{gap}}'अर्वाचीन मराठीतील खंडकाव्ये या प्रबंधात डॉ. ह. कि. तोडमल यांनी{{nop}} नमूद केल्याप्रमागे रे. ना. वा. टिळक ख्रिस्ती धर्मातील निष्पाप प्रेम व सेवाभाव{{nop}} या उदात तत्वाकडे झुकले होते. वैयक्तिक निःश्रेयस् निवृत्तिवादी परंपरेतील{{nop}} भारतीय तत्त्वज्ञान की प्रेम आणि सेवाभाव यावर आधारित प्रवृत्तीवादी (ख्रिस्ती){{nop}} धर्माचार हा संघर्ष त्याच्या मनात ख्रिस्ती होण्यापूर्वीपासून चालू असावा, या{{nop}} याच्या अध्यात्मिक आंतरिक संघर्षाचे उत्कट प्रत्यंतर या काव्यात येते.<br> {{gap}}टिळक ख्रिस्ती होण्यापूर्वीच सन्याशी झाले होते आणि पुनश्च संसारातही{{nop}} आले होते. ख्रिस्ती झाल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस ख्रिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट{{nop}} पंथांना संमत नसलेला सन्यासही त्यांनी घेतला. 'देवाचा दरबार ' ही संस्था{{nop}} १९१७ साताऱ्याला स्थापना केली यावरून वनवासी फूल काव्यात व्यक्त झालेली{{nop}} आंतरिक संघर्ष टिळकांच्या आयुष्याखेरिसही चालू होता. बनवांसी फूलाच्या{{nop}} आकलनास उपयोग होऊ शकेल अशी ही माहिती वस्तुस्थिती आहे.<br> <br> <br> आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७८<noinclude></noinclude> llc1tju1xksl3n57szdi9kh1lm6jm28 अनुक्रमणिका:शोध अकराव्या दिशेचा.pdf 106 67054 155754 132590 2022-08-17T06:36:08Z अश्विनीलेले 3813 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[शोध अकराव्या दिशेचा]] |Language=mr |Volume= |Author=[[Shaila Lohiya]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher= |Address= |Year=2013 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 4="चार शब्द" 8="ऋणनिर्देश" 9="१. " /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} fbam3doratobxriw9rsutdjetxmm2ye पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२७ 104 70950 155735 2022-08-16T15:49:19Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{x-larger|'''११.'''}}}}<br> {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}<br> {{gap}}मृग नक्षत्र लागून आठ दिवस झाले तरी आभाळ निरभ्रच होते. गेले सालही पाऊस बेताचाच झाला होता. हस्त मात्र रपाकवून बरसला होता. त्यामुळे रबीची सुगी थोडीफार हाती आली होती. डोंगर भागातले प्रमुख पीक म्हणजे पिवळी ज्वारी, हायब्रीड बाजरी, थोडफार तीळ, मूग, उडिद. ही पिके आगातात-आषाढ सुगीत येतात. पण आगाताची सुगी बहरलीच नाही. डोंगरात गहू, मोठी जवार लावण्यासारखी सपाट राने कमीच. त्यातून विहिरी गेल्या बारा तेरा सालापासून कोरड्या ठण्ण पडल्या आहेत. पाण्याचे फुटवे मोकळे व्हावेत असा पाऊस नाहीच. हजारो कुटुंबे गेल्या बारा तेरा वर्षांपासून मुंबई पुण्याकडे, कोकणात, गुजरातेत जात आहेत. तो ओघ सुरुच आहे. त्यातील काही कुटुंबे काही काळापुरती, उसतोडीच्या हंगामात सांगली साताऱ्याकडे जात तर काही मुंबईकडे बांधकामासाठी जात. पण उन्हाळा सुरु झाला की गावाकडे येत. पण गेल्या सात आठ वर्षात अनेक जण तिकडचेच झाले आहेत.<br>{{gap}}पुलावरून बरेच पाणी वाहून गेलेय. १९८० मध्ये श्रीनाथ, डॉक्टर मोहन, अण्ण्या, पक्या... अशक्या... अमन्या, बप्पा यांनी मिळून डोंगर विकास समितीला आणि बदलाव संघटनेला पुन्हा ताजवा दीला होता. प्रकाश आणि श्रीनाथ यांनी देवठाण, दगडवाडी, यल्डा, साकूड, भावठाण, ममदापूर इत्यादी तीन खेडयातून भेटी दिल्या होत्या. डोंगरातलं ममदापूर, खापरठाण, आरळ इत्यादी गावात जायचे तर देवठाणात नाही तर यलड्यात गाड्या लावून चार कोस पायी जावे लागे. सातमाळाचे बुटके डोंगर. नुस्त्या दगडांनी भरलेले मधून वाहणाऱ्या दोन नद्या. एक जयवंती आणि दुसरी वाणा म्हणजेच वैनगंगा. जयवंती बुटेनाथाच्या डोंगराच्या पायथ्याशी मिळत असे. वाणाचा ओघ गेल्या दहा बारा वर्षांत रोडवला आहे. पण जुनी जाणती<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १२७ </small>}}</noinclude> 74yudq1be9hs60dtbtitpjwet9pod11 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२८ 104 70951 155736 2022-08-16T16:01:09Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>खोडं सांगतात की पूर्वी ही वैनगंगा घोडदऱ्यावरून उडी घेत मुकुंराजाच्या दरीत कोसळायची आणि स्वतःच्या नादात फुंफाटात बुट्टेनाथाच्या पायाशी लोळण घ्यायची. तिथे जयवंतीशी गट्टी झाली की दोघी डोंगरातून हातात हात घालून निघत. मग वाटे निळाई भेटे. डोंगरातले अनेक नाले येऊन मिळत. नागापूरच्या भागात तिला तिनही बाजूंनी डोंगरानी वेढले होते. त्याचा फायदा घेऊन तिथे शासनाने बंधारा घातला होता. नागापूरच्या या धरणाचे पाणी परळी वैजनाथ गावाला पिण्यासाठी दिले जाई. परळी हे वैद्यनाथाचे... शिवाचे महत्त्वाचे ठाणे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. योगेश्वरीचे आंबे म्हणजे अंबाजोगाई हे डोंगरावर तर वैद्यनाथाचे ठाणे डोंगराच्या पायथ्याशी. परळी येथे. डोंगरातील गांवाना भेटी देतांना अनूच्या महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख पद्माकर कुलकर्णी यांच्या सोबत श्रीनाथ आणि दोस्तांनी मुकुंदराजाचा डोंगर उतरून थेट परळीपर्यंतचा पायी प्रवास केला होता. सरांना डोंगर चढण्या उतरण्याचा, नवे काही शोधण्याचा अपार छंद. आंब्याची योगेश्वरी ही योगिनी आहे. कुमारी आहे. जगन्माता आहे. तिने शिवशंकराशी विवाह करण्यास नकार दिला होता. बुट्टेनाथाचा डोंगर पार करतांना श्रीनाथला नानीची आठवण येई. श्रीनाथने अनूशी विवाह केला तेव्हा आडून मागून विचारणाऱ्यांना नाहीतर टोमणे मारणाऱ्यांना ती ठणकावून सांगे.<br>{{gap}}'अरं आपल्या योगसरी मायने तरी काय केलं वो? तवाच्या बाया लई हुशार. सोवताचं खरं करनाऱ्या. संकरबापानी मागल्या जलम भिल्लीणीसंग संग क्येला. मंग हिनं बी फुडच्या जलमात लगणाचा मूर्त टाळला. बसली येणीफणी करीत. सावकास. अन् मंग काय? सूर्व्याचं पैल किरन धरणीवर पोचलं नि मूरत टळला. ती ऱ्हाइली हितं आंब्यात. नि शिवाबाब ऱ्हाइले वाट पहात परलीत. आन ती दमयंती. तिने बी तिच्या मनाला पटलेल्या नळालाच माळ घातली. पन हे कलीयुग हाय. या युगात ज्यानं त्यानं जाती परमान व्हावं. जाऊंद्या. आपलं झालं नि पवितर झालं...' हे म्हणत नानी नाकात नस... तपकिरीची चिमुट कोंबून गप्प बसत असे. श्रीनाथला नासिकला नेण्याआधीच नानी गेली. ते एक बरेच म्हणायचे.<br>{{gap}}पंधरा दिवस डोंगरात फिरून तेथील लोकांशी चर्चा करून 'बदलाव' संघटनेला कायमस्वरूपी स्थिरता कशी द्यावी याचाही विचार सुरु होता.<br>{{gap}}कोणतेही काम सुरु करायचे तर प्रवेश करण्याची, लोकांच्या प्रश्नाला हात घालणारी 'कळ'... किल्ली शोधावी लागते. त्या दृष्टीने सर्वेक्षण करायचे ठरले.<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १२८ </small>}}</noinclude> joof7r65f7ynz1b8fuvxal296u2oe3a पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२९ 104 70952 155737 2022-08-16T16:07:00Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>अण्णाची मैत्रिण सुलक्षणाने मुंबईच्या निर्मला निकेतून मधूने 'समाज विज्ञान... सामाजिक कार्य' या विषयाची पदवी घेतली होती. ती दोन दिवस येऊन राहिली. सर्वेक्षणाच्या पत्रिकेचा नमुना तयार करून दिला. तो प्रत्येक घरापर्यंत पोचून. माहिती घेऊन भरायचा होता.<br>{{gap}}सत्याहत्तरच्या निवडणूकीतून तयार झालेला तरूणांचा गट. त्यातील अनेक जण विविध क्षेत्रात काम करीत आहेत. मनोहर, सविता, उषा वकील झाले आहेत. अण्ण्या, यशंवत, दिनेश काँग्रेस व भाजपात हिरीरीने काम करीत आहेत. वैचारिक मतभेदांनी कौटूंबिक आत्मीयतेवर किंवा मैत्रीवर हल्लाबोल केलेला नव्हता. विज्ञान निष्ठा, स्त्रीपुरुष समता, सर्वधर्म समभाव, जाती विहीन समाज व राष्ट्रप्रेम ही सेवादलाची मूलभूत तत्वे असली तरी 'ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास' हेच या तरूणांचे लक्ष्य होते. प्रत्यक्ष राजकारण करण्याऐवजी विकासाच्या राजकारणासाठी रचनात्मक संघर्षाची तयारी ठेवण्याचे त्या साठी विविध मार्ग शोधण्याचे लोकार्थने ठरवले आहे. त्यासाठी प्रकाश, अशोक, श्रीनाथ वेळ देत.<br>{{gap}}देवठाण, येल्डा, दगडवाडी, सोनवळा, मोरफळी ही पाच गावे निवडून सुरवात म्हणून लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे काम डॉ. मोहनच्या सहकार्याने सुरू केले. अनेक मुलांच्या गालावर पांढरे डाग, रातांधळेपणा, नारू, मुडदूस हे आजार हजरच होते. वैनगंगा जयवंतीच्या संगमावर बुट्टेनाथापाशी पूल बांधायला मंजूरी आणीबाणी पूर्वीच आली होती. पण अद्यापही मुहूर्त लाभलेला नव्हता. मंजूरीचे घोंगडे भिजत पडले होते. आंब्याच्या मोठ्या क्षयरोग दवाखान्याचे रूपांतर आता आशियातल्या पहिल्या ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालयात झाले होते. माध्यमिक शाळांची संख्या विसावर आली होती. प्रत्येक जातीचे, धर्माचे त्यावर शिक्के होते. बी.एड., डी.एड. महाविद्यालये आली होती. एका ऐवजी पाच महाविद्यालये झाली होती, पण अनूजही भावठाण देवठाणच्या बाइचे मूल आडवे आले नि रूकमा दाईच्यानी सुटका झाली नाही तर बाई बाजेवर घालून आंब्याच्या मोठया देवाखान्यात आणावी लागते आणि कधी कधी ती बाज चितेवर चढवावी लागते. यात काही बदल नाही. डोंगरातले जीवन अनूजही अंधारलेले. गेल्या तीन चार वर्षात लेकरांना डॉक्टराकडून गोळा केलेल्या व्हिटॅमिन च्या गोळया, दूध दर रविवारी शिजवलेल्या कडधान्याची उसळ, दर गुरुवारी शेंगदाणे, डाळवं नि गूळ यांचा खुराक देण्याची सोय लोकार्थाने केली<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १२९ </small>}}</noinclude> huvcu7mqz37pfdapv15wmkd3bp2xq86 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३० 104 70953 155738 2022-08-16T16:11:13Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>होती. देवठाण, दगडवाडी, सोनवळा, मोरफळी वगैर पाच गावातील पोरांच्या तोंडावरचे पांढरे डाग मावळू तर लागलेच होते. रोज सायंकाळी मुले शाळेच्या पटांगणात खेळायला जमा होत. मटकी मुगाची उसळ शिजवून प्रेमाने लेकरांना खाऊ घालणाऱ्या शेवंता मावशीचा मलुगा गणू पोरांना खो खो, कबड्डी शिकवत असे. पाचही गावात सातवी आठवी झलेल्या मुलांना खेळ, गाणी, कवायत शिकवून सायंकाळचे खेळ वर्ग सुरु केले होते. 'लोकार्थ' पहाता पहाता ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांचा दिलासा बनली. अलिकडे राजकारण्यांनाही 'लोकार्थ' आणि डोंगर विकास समितीची भिती वाटू लागली होती. त्या दिवशी अनू साडेदहा वाजता घरी परतली तर धुण्याभांड्याचा ढीग बाथरूम बाहेर तसाच लोळत होता.<br>{{gap}}'अने, सखुबाईच्या पोरी सांगून गेल्यात की आज ती खरकण्याला जाणारेय. नासिकनगरकडच्या भागात. काल मुकादमाने दोन हजार रूपये तिच्या नवऱ्याला इसार म्हणून दिलेत... माझा नाश्ता झालाय. पण साडेबाराला अण्ण्या डोंगरात जायला येणारेय त्यांच्या सोबत जरा चौदा पंधरा दमदार पोळ्या पाठव. जमलं तर झुणका. पण खर्डा पाठवच!... असे सांगत श्रीनाथ घराबाहेर पडला. फटफटी सुरु केल्याचा... नंतर दूरदूर जाणारा आवाज. अनूने वैतागून बैठकितल्या कोचावर बैठक मारली.<br>{{gap}}... पहाटे साडेपाचपासून दिवस सुरू होतो. तरी ती रात्रीच डाळभाताच्या कुकरची तयारी करून ठवेते. भाजी चिरून ठेवते. कणीकही भिजवून ठेवते. तेव्हा कुठे श्री मुलांचा नाश्ता तयार करून, शाळेचे डबे भरून तिला सात वाजता घराच्या बाहेर पडता येते. धापा टाकीत वर्गात शिरून मुलांना शिकवणे जमत नाही. स्टाफरुममध्ये क्षणभर टेकायचे. पेपरचे मथळे नजरेने चाळायचे नि मग ताज्यामनाने विद्यार्थ्यांना 'शुभप्रभात' च्या शुभेच्छा द्यायला वर्गात जायचे.<br>{{gap}}कपडे धूवून तिने झटकून फटकून दोरीवर वाळायला टाकले. त्याची टोके नीट करून ठेवली नि तिला हसू आले.<br>{{gap}}"अने तू कपडे धून वाळत टाकलेस ना की इस्त्रीची पण गरज भासत नाही' श्रीचे बोलणे आठवले. भांडी घासून जुन्या साडीवर पालथी घातली नि तिने मिर्च्या भाजायला घेतल्या. मन कुठेतरी मलूल झाले होते. मरगळ आली होती. पोळ्या. खुडा.. मिरचीची लसणीचा जाडसर ठेचा आणि झुणक्याची शिदोरी फडक्यात बांधली.<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३० </small>}}</noinclude> o51k1b6rknmlnu7rpyxlz0fdxikzc4n पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३१ 104 70954 155739 2022-08-16T16:15:28Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>पाच सात कांदे त्यात टाकले नि तिने स्वतःचे ताट वाढून घेतले. पहिला घास तोंडात घालणार तेवढ्यात खालून तीन वेळा खुणेची बेल वाजली. ती घास ताटात ठेवून उठली नि अण्ण्याला पोळी खर्ड्याची शिदोरी देवून वर आली.<br>{{gap}}वर्षापूर्वी ठरल्याप्रमाणे अंकुश येऊन गेला. दगडवाडीचा दहा एकराचा तुकडा 'लोकार्थ' ला शेती व पाण्यासंबंधी प्रयोग करण्यासाठी दोन वर्षांसाठी श्रीभैय्या आणि बाप्पांच्या हवाली करून गेला. गेल्या साली सोलापूरचे शहाकाका अचानक आले. आणि श्रीनाथ सोबत दोन दिवस डोंगर भागातच मुक्काम ठोकून राहिले. डोंगरमाथ्यावरच्या ठाणबाई मंदिराचा परिसर अक्षरशः पायाखाली घातला. श्रीनाथ, पक्या, अण्ण्या हा सर्व मंडळी डोंगर विकासाला भिडलेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले.<br>{{gap}}"श्री, तुम्हा मंडळीचे हे काम म्हणजे एक छोटासा 'लाँग मार्च' च आहे. आपल्याकडची माणसं त्याला घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजणं म्हणतील. पण आगे बढो. माझ्या एका मित्राने मला दहा हजार रूपये दिलेत. सामान्य माणसाच्या विकासाठी अशा 'नाहिरे' ना आर्थिक, सामाजिक दृष्ट्या सुदृढ करण्यासाठी झटणाऱ्या संस्थेला ते पैसे द्यावेत असे सुचवलेय. सुधाताई, भाई, सदानंद या कार्यकर्त्यांकडून तुझ्या कामाबद्दल ऐकले आणि इथे आलो. ठणवाईचा परिसर, डोंगर आज जरी बोडखा... उदास दिसला तरी खूप वेगळा वाटला मला. खालून निळाई वाहतेय. आज जरी वाळूचा रूंदपट्टा दिसला तरी नदीचे पात्र केव्हातरी नक्कीच विशाल असणारेय. देवठाण्याच्या देशमुखाच्या मालकीचा आहे म्हणे तो डोंगर नि वरची दोन एकर सखल जमीन. आज थांबातो मी. उद्या त्यांना जाऊन भेटू. तयार झाले तर इसार देऊन टाकू." शहाकाकांचे म्हणणे सर्वानाच भावले. अंकुशाच्या जमिनीपासून जेमतेम कोसावर ठाणवाईचा डोंगर होता.<br>{{gap}}ठाणवाईच्या मंदिरा अलिकडचा आणि डोंगराच्या उताराचा बारा एकराचा पट्टा देवठाणच्या सर्जेराव देशमुखाने दहा हजारात लोकार्थच्या नावाने करून दिला. आणि उत्साहाची एक तरूण लाट सर्वांच्या तनामनात लहरू लागली.<br>{{gap}}"अने, येत्या पाडव्यापासून मी ठरवतोय की दर शुक्रवारी सकाळी दशम्या धपाट्यांची शिदोरी घेऊन मुक्कामाला डोंगरात जायचे. तीन दिवस तिथेच मुक्काम ठोकायचा नि सोमवारी परत आंब्याला यायचे. पण तुझी संमती हवीय आणि तीही बाय हार्ट."<br><noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३१ </small>}}</noinclude> rs4fa1jwnwcqqbxagm5f8yer8qs997v पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३२ 104 70955 155740 2022-08-16T16:19:40Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}'गो टु द पीपल, लीव विथ देम... लोकांपर्यंत म्हणजे त्यांच्या जगण्या, घडण्या वा उमलण्याच्या रीतीपर्यंत पोचा. मग त्यांच्यातले होऊन राहायला हवे.'<br>{{gap}}श्रीनाथ काहीशा आजीजीच्या सुरात अनूशी बोलत होता. त्याचा हा काहीसा अपराधी... निम्नसूर अनूला बोचला. उभयतांमधली विश्वासार्हता तर गढूळ तर नाही? असा भास तिला अलिकडे होई.<br>{{gap}}'श्री, अरे लग्न करतांनाच आपण सर्व ठरवलेय ना? पहाता पहाता आपल्या लग्नाला पंधरावर्षे झालीय. जनक आठवीत गेलायं. इरा सहावीत गेलीयं. आणीबाणी संपून पाचवर्षे झालीत. तू घरात अडकावस असं कसं वाटेल मला? तुझ्या नि लोकार्थच्या प्रत्येक निर्णयात मी आहेच. वण वण केल्याशिवाय जे हवे आहे त्याची दिशा कशी गवसणार? फक्त एकच लक्षात ठेव. आता स्वैपाकालाही यमुना मावशी आहेत. शिदोरी मात्र भरपूर घेऊन जात जा. पोटाचे हाल नको करूस... आणि अशा अजीजीच्या स्वरात पुन्हा मला आळवायचे नाहीस. बी.ए गुड फ्रेंड"... श्रीनाथच्या पाठीवर एक बुक्का घालून अनू जिना उतरून खाली आली... पुन्हा खालून तिने जनकला हाक घातली. श्री व्हरांड्यात आला.<br>{{gap}}"श्री, आज प्लॉटकडे चक्कर मारून मग डोंगरात जा. चार दिवसांनी घरावर स्लॅब पडणारेय... येते मी." असे म्हणत तीने स्कूटर सुरू केली.<br>{{gap}}गेल्या सहा महिन्यांपासून श्रीनाथ आठवड्यातून तीन दिवस डोंगरात जातोय, बरोबर कधी पक्या तर कधी अशक्या. अधून मधून आण्ण्या. या चाळीस गावांतली पांढरी आणि काळी श्रीनाथच्या घनदाट परिचयाची झाली आहे. अंकुशाने हाती सोपवलेला दगडवाडीचा दहा एकराचा तुकडा आणि देवठाणचा ठाणाबाई डोंगरात शहा काकांच्या मदतीने घेतलेला दहा एकराचा तुकडा. प्रयोगासाठी आता हाती जमीन आहे. पण.. पाणी...? ...? श्रीनाथ आणि खरातभाऊ ठाणवाईच्या उंचवट्यावर उभे राहून खालचा पट्टा न्याहाळत होते. मनासमोर नेमके काहीच उभे राहत नव्हते. खरातभाऊंना जुने दिवस आठवले.<br>{{gap}}... रान सिताफळाच्या झुडपांनी झुबरलेलं असायचं. भाद्रपदात ते इवलाल्या सुंगधी फुलांनी असामंत गंधित करीत असे. पळस होते. निंबाची झाडे होती. निंबारा होता. निबाऱ्याची पाने निंबासारखीच पण फुलांचा मोहर जांभुळ पिवळा. उन्हाच्या कहारात शहरात येणाऱ्यांना झाडाची सावली गारवा देई. देवठाणात शाळा नव्हती.<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३२ </small>}}</noinclude> lolgsd02kqo4f01n5lb8u1d3jyw66pt पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३३ 104 70956 155741 2022-08-16T16:23:19Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>जवळच्या यलड्याला चौथी पर्यंत शाळा होती. अर्धा डोंगर उतरून आलं की यलड्याची शाळा लागे. मग गांव. पण शाळेत जायचं तर अंगातली कापड धडूती हवीत. खराताचा सुभान्या आदितवारी डोंगरातील सिताफळं गोळा करायला जाणारच. दिवाळीच्या तोंडाला झाडे सीताफळाच्या झुंबरांनी लखडून जात. सीताफळ पकू लागले की त्याचे डोळे उघडू लागते. सीताफळावर कोवळ्या उनाचा रंग चढे. अशी चेंडूगत मोठी मोठी सीताफळं पोत्यात गोळा करून सुभान्या झोपडीत घेऊन येई. त्यावर पाटलाच्या गाडीतून पडलेला कडबा पांघरी नि वरून एक पोतं अंथरी. मंगळवारी आंब्याचा बाजार असे. आंबं असेल पाच कोस तेवढा डोंगर उतरला की वाणा जयवंताचा संगम लागे. पुन्हा डोंगर चढून गेलं की मुकुंदराज बाप्पांची समाधी. तिथं दर्शन घ्यावं. वरच्या इठोबारखुमाईच्या देवळासमोरच्या वडाच्या झाडाखाली शिदोरी उघडावी. अर्धी चतकोर भाकर खाऊन नामदेव विहीरीचं पाणी पिऊन आंब्याचा रस्ता धरावा. एक डाल सीताफळं विकली की पाच रूपये मिळंत.<br>{{gap}}सुभान्याने सिताफळाच्या मोसमात साठ रूपये मिळवले. मडक्यांच्या उतरंडीच्या तळात मडक्यात दडवून ठेवले. मायला पण पत्ता लागू दिला नाही. जून सुरु झाला. उन्हाळ्याच्या अखेरीस अवेळीचा पाऊस गारवा देऊन गेला. सुभान्याच्या मनाला नवे कोंभ फुटले. मंगळवारच्या बाजारातून एक शर्ट, टोपी आणि विजार खरेदी करून आला. आणि यलड्याच्या शाळेत गावातल्या पवार कुलकर्णी, माळ्याच्या पोरांबरोबर गेला. नाव दाखल केलं. चार वर्षे पाखराच्या पंखावर बसल्यागत उडून गेली. पाचवीत जायचं म्हणजे आंब्याला नायतर परळीला जायला हवं. महिन्याला शंभर रूपये खर्चायची ताकद बप्पाजवळ नव्हती. मेल्या जनावराची कातडी काढणं, त्याची वासलात लावणं, गावात दवंडी देणं, बड्या धरचे परगावचे सांगावे... निरोप थेट दहा कोसांवरच्या गांवात पोचवणं अशी कामं तो करी. मांगोड्यात झोपडी घालून ते रहात. माय झाडलोट, घाण काढण्याची कामे ओल्या कोरड्या भाकरतुकड्यावर करी. झोपडीच्या कुडाच्या छपरावर चिंध्या घालून त्यावर शिळया भाकऱ्या चपात्या वाळवण्याचे काम रूंदा, कळी या बहिणी करीत. ते भाकर तुकडे माय पत्र्याच्या डब्यात धरून ठेवी. महिन्यातले अर्धे दिवस थेबंभर तेलाची फोडणी करून उकळलेल्या पाण्यात उकडलेले तुकडे मीठ कांद्याशी खाऊन ढेकर देण्याचा रिवाज म्हारोड्या मांगोड्यात होता, पण शाळेत गेल्याने सुभान्याला गावात पत आली होती. कुणाकडे कागुद<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३३ </small>}}</noinclude> rllaycewydvimyk1rzz84i4n37evrte पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३४ 104 70957 155742 2022-08-16T16:27:35Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आला की खराताकडे येत. शिवेबाहेर असला तरी शिकलेला म्हणून सगळे इज्जत देत. पण श्रीभैय्या डोंगरात यायला लागल्यापासून सुभान्याला सर्व जण खरात भाऊ म्हणत. श्रीभैय्यांनी खरात वहिनीला पिठाची गिरणी टाकायला मदत केली. स्वतःचे हजार रूपये घातले. बँकेतून कर्ज मिळावे म्हणून जामिनदार राहिले. मात्र गिरणी सुरु झाल्यावर दर महिन्याला परतफेडीची आठवण करून देत. कर्ज केव्हाच फिटले. अण्ण्यादादा, पक्याभाऊ, श्रीभैय्या खराताच्या घरी चहा पितात हे पाहून गावातल्या तरूणांची भीड चेपली. तेही शेळीचा दुधाचा चहा पिऊ लागले.<br>{{gap}}"ओ कुशाक्का अगं धान कोरडं असतंया. त्याला कसलाग बाट? आन् धान पिकवणारा माळी द्येवच की. जा खरात वैनीच्या गिरणीवरून आण दळूण जवारी." "वैनी, वीस पैशाला किलोभर दळण देती. आंब्याला त्येच दळण आठ आने किलोनी देतात. तितं कोनी जात इचारीत न्हाई. अग कष्ट कमी कर. जातीला काय बघायचं?" अशी बायांत चर्चा चाले. गांव वाढत गेलं. दुसरी गिरणी आली. पण खरातवैनीचा स्वभाव, स्वच्छ राहणी, नेकी यामुळे तिची गिरणी जोरात चाले....<br>{{gap}}.... खरात भाऊंना सारे आठवले. त्यांची नजर उघड्या बोडक्या डोंगरावरून फिरली ते विषादाने श्रीनाथला म्हणाले, भैय्या, झाडाला बी मन असतं. दगडाला बी मन असते असं मानणारी मानस आपन. पन दुकाळाच्या फेऱ्यात खाटका सारखी झाडं कापून काढली आमी. भाकर भाजायची तरी लाकडं हवी नि मानसाला शेवटची वाट दावायची तरी लाकडच हवी..<br>{{gap}}"चला खरातभाऊ दिशा सापडली की वाटही सापडत असते." श्रीनाथने खरातच्या पाठीवर आश्वासक थाप दिली आणि ते डोंगर उतरू लागले. उतरता उतरता श्री मध्येच थांबला आणि त्याने उजवीकडे वळून पाहिले. उंचच उंच चढाव होता. ते उभे होते ती थोडी सखल जागा होती. डावीकडे परत खोल उतार. तो उतार थांबत थांबत थेट निळाईच्या किनाऱ्याला टेकला होता. श्रीनाथच्या लक्षात आले की ते थांबले आहेत त्या जागेवरची माती कमी झाली आहे आणि खालच्या कातळाचा चेहेरा उघडा पडू लागलाय. त्याने घाईने परत देवठाणचा रस्ता धरला आणि मुक्काम न करताच दोनच्या बसने तो आंब्याकडे परतला.<br> {{Css image crop |Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf |Page = 134 |bSize = 392 |cWidth = 38 |cHeight = 26 |oTop = 512 |oLeft = 312 |Location = right |Description = }}<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३४ </small>}}</noinclude> ifk1j5qo01kcwl4rczlijgghjqgpc3j पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३५ 104 70958 155743 2022-08-16T16:30:36Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{x-larger|'''१२.'''}}}}<br> {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}<br> {{gap}}.... आज मन खारं झालंय. वाचण्यासाठी लक्ष लागेना. बाहेरच्या आरामखुर्चीवर अंग सैलावून ती बसली आणि डोळे मिटून घेतले. लोकार्थ सुरु होऊन चार वर्ष झाली आहेत. गावतला माणूस गावात रहावा, शेतातले पाणी शेतात मुरावे, शेतकऱ्यांनी दीडदोन एकर जमिनीतले दगडवेचून कडेनी पौळ घालावी, गावात प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालावेत या साठी बदलावची तरूण मंडळी लोकार्थ चे सेवक म्हणून त्या पंधरा खेड्यांतून भिरभिरत होते. दवाखानाही आता रोज दुपारी तीन ते सहा सुरु ठेवतात. या सर्वांच्या उभारीत मी नेमकी कुठे आहे?... माझी भूमिका कोणती? श्रीनाथचे उपांग किंवा पूरक म्हणून? मनी, उषा... अशा अनेकजणी सासरी नांदताहेत. संसारात रमल्या आहेत. आणि मी?...? अनूचे मन तिला विचारात होते. प्रश्नाचे उत्तर...? अशा वेळी उलटून गेलेले लाडके दिवस आठवतात.<br>{{gap}}१९७४ च्या युवकमहोत्सवात तिने बसवलेले नागानृत्य विद्यार्थी विद्यार्थीनींनी सादर केले आणि नृत्य संपताच हजारो विद्यार्थ्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. सांस्कृतिक विभागाने सादर केलेले पु.ल. चे सदू आणि दादू व कुसुमाग्रजाचे अनूने स्वरबध्द केलेले 'किनारा' हे समूह गीत विद्यापीठात श्रेष्ठ ठरले. त्यावर्षी समूहनृत्य, समूहगीत, एकांकीका, सुगमसंगीत, सोलो तबला, भारूड अशा अनेक स्पर्धात विवेक वर्धिनीचा गट श्रेष्ठ ठरला. औरंगाबादहून येताना अनूला स्वतःची बॅग मोकळी करून तिच्यात मुलाची मेडल्स भरावी लागली. शिल्डस साठी वेगळी पिशवी घेतली. प्राचार्यांनी अनूसह सर्वाचे अभिनंदन 'थ्री हॅटस ऑफ' म्हणत व्यक्त केले होते. तिच्या कथा, कविता, स्त्री, किर्लोस्कर, मराठवाडा, मेनकातून प्रकाशित होत असत. मनात नेहमी उगवती स्वप्नं असत. तिच्या वर्गात इतर महाविद्यालयातील विद्यार्थीही खास तिचे धुंद होऊन शिकवणे ऐकण्यासाठी भरभरून येत. पण घरात मात्र हक्काची आई, पतीचा शब्द झेलणारी पतीला सर्वार्थाने पूरक असलेली अनू<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३५ </small>}}</noinclude> rcks6qe9cce5wr1c711c98hbfeh39lw पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३६ 104 70959 155744 2022-08-16T16:34:31Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>होती. पण आता मात्र त्या पलिकडे मला स्वतंत्र अस्तित्व नाही.<br>{{gap}}अनूच्या मनात आज प्रश्नांच्या छटा उगवत होत्या.<br>{{gap}}१९७४ च्या दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना घेऊन अनू बाबा आमटयांच्याकडे सोमनाथच्या शिबीरासाठी गेली होती. तिथला प्रत्येक दिवस काही नवे देणारा. ते सारे पाहून मुलांनाही प्रश्न पडे. सतत काम करणारे, काही ना काही निर्मितीत मग्न असणारे हे झिजणारे हात... पाय. या हसतमुख माणसांना महारोगी म्हणून का हिणवायचे?<br>{{gap}}"अगं अनू, इथे आम्ही ना फक्त चहा आणि कॉफी पावडर विकत घेतो. आणि कधीमधी साखर. सकाळची कांजी, चहा सुध्दा गुळाचा. त्याची चव अधिक टेस्टी." भाजी निवडताना साधनाताई सांगत.<br>{{gap}}संपूर्ण भारतातून अगदी काश्मिर पासून सहाशे तरूणतरूणी शिबीरात आले होते. भवताली घनदाट जंगल. पण सहाच्या आधीच सूर्य पानांच्या दाटीवाटीतून वाट काढून सर्वांगाला बोचायला लागे. साडेसहाच्या कुदळ फावडी टोपल्या घेऊन मुले श्रमदानासाठी बाहेर पडत. युदकाका, शहाकाका, पंडित काका यांच्या सारखी बुजुर्ग मंडळीही तेवढ्याच उत्साहात कुदळ फावडं घेवून पुढे असत.<br>{{gap}}साडेआठला उन्हाचा कहर सुरु झाला की सगळे छावणीत परतत. थंडगार पाण्याने हातपाय तोंड धूवून गर्रम खिचडी नाहीतर सांजाच्या नाश्त्यावर ताव मारीत. हे अन्नही जे महारोगी आता बरे झाले आहेत, जखमा भरून रोगाच्या मर्यादा ओलांडून अलिकडे आलेल्यांनी तयार केलेले असे. पहिल्या दिवशी काही मुलामुलींच्या तोंडात घास घुटमळला. पण त्या अन्नाच्या संपन्न सुगंध, देखणं रूप, आणि भूक वाढवणारी चव अनुभवताच मुले जेवणावर ताव मारू लागली. सकाळी श्रमाने शरीर थके तर जेवणापूर्वी बौध्दिकांनी डोक्यात निर्माण झालेल्या वादळांनीही दमायला होई. मग जेवण म्हणजे साक्षात अमृतानुभव. एक दिवस महाविद्यालयातला अत्यंत व्रात्य, टोमणे मारून मुलींना... प्राध्यापकांना सतत छेडणारा अरविंद जेवता जेवता उभा राहिला नि भरल्या डोळ्यांनी जड आवाजात बोलू लागला.<br>{{gap}}"मॅडम आत पाय झिजवत अपंग करणारा महारोग ज्यांना देवाने दिला त्यांना बाबांनी... एका माणसाने संकटाशी लढून जगण्याला समर्थ करणारे निरोगी हात पाय दिले आणि मन दिले. भलेही ते आम्हाला दिसत नसेल पण ते समर्थ हात... शेती करणारे, अन्न निर्माण करणारे हात आमच्या पोटात गेले आहेत. त्यांनी आम्हाला शक्ती दिलीय...'<br><noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३६ </small>}}</noinclude> eh25116qh884julbsclpf5hidiittqy पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३७ 104 70960 155745 2022-08-16T16:38:31Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}...मॅडम आज माझ्या या हातांची मला लाज वाटते.' वाक्य पूर्ण करताच तो स्फुंदून रडू लागला. मग फक्त अस्वस्थ शांतता.<br>{{gap}}शिबीरात रात्री तरूण मुले गाणी, नृत्य कला सादर करीत. विद्यावर्धिनीच्या तरूणांनी युवकमहोत्सवातले नागा नृत्य सादर केले व कुसुमाग्रजांचे 'कोलंबसाचे गर्वगीत' सादर केले.<br>{{gap}}'किनारा तुला पामराला'... या उंच टीपेतल्या ओळी. काही जण तीच ओळ वेगळ्या स्वरात खर्जात म्हणणारे तर काही द्रुत लयीत तीच ओळ आळवणारे... समुद्राचा आभास निर्माण करणारे स्वर. बाबांनी त्याच्या बौध्दीकातून गीताचे खास कौतुक केले.<br>...<br>{{gap}}अनूला सारे आठवत होते. बौध्दिकाला सुरवात करतांना बाबा 'प्रिय साधना आणि तरूण मित्रांनो' अशीच सुरवात करतात. तेही तिला स्मरले. बाबांच्या प्रत्येक शब्दात, श्वासात, विचारात साधनाताई आहेत. संपूर्ण दैनंदिन उपक्रमांची व्यवस्था, विशेषतः अन्नाचे नियोजन त्या करतात. मग भाजी निवडण्यापासून ते फोडणी घालण्यापर्यत. शिबीरात लेकुरवाळे कार्यकर्ते येत. त्यांच्या लेकरांना सकाळी नऊ वाजता मऊ मेतकुट भातही त्याच जातीने वाढीत. मग त्यांचे तिथे असणे 'दुय्यम' म्हणायचे का? त्यांना उपांग किंवा पूरक म्हणायच का?...? अग्नीला झेलणारी समर्थ समिधा नसेल तर अग्नी अस्तित्वातच कसा येईल...?...?<br>{{gap}}येत्या दहा वर्षात जनक ईराला त्यांच्या भविष्याची क्षितीजे निश्चित करायला मदत मला, त्याची आणि माझी म्हणून करावी लागणार. त्यातून श्री लोकार्थमध्ये गुंतलेला. म्हणजे आता ईरा जनकच्या भवितव्याची जबाबदारी श्री आणि माझी म्हणून मला बघावी लागणार! आणि मग काही वर्षानंतर मलाही श्रीच्या जोडीने काम करता येईल...<br>{{gap}}आणि उत्तर हाती आल्यागत वाटून अनू समाधानाने हसली.<br>{{gap}}मध्यरात्र उलटून गेली होती. झोप तर चोहोबाजूनी आली होती. पण श्रीच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता श्रीनाथ बाहेरच्या गॅलरीत येऊन उभा राहिला समोर फक्त अंधार तो अस्वस्थपणे परत आत आला आणि आरामखुर्चीवर सैलावून बसला. डोळे मिटले की वाहून गेलेली शेते, कुजलेली बाळपिके, पडक्या.. कोसळत्या भिंती आणि माणसाचे उध्वस्त... हरवलेले चेहेरे समोर येतात.<br>{{gap}}इकडेच पावसाचे सरासरी प्रमाण २२ ते २४ इंच पण यंदा १९८३ मध्ये जुलै पर्यंत मान्सूनने ओढ दिली. आणि नंतर जे कोसळणे सुरु झाले कधी नाही ते जयवंती<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३७ </small>}}</noinclude> c09v58xwvqh19ogwalga2ztcjjk7z9h पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३८ 104 70961 155746 2022-08-16T16:42:47Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>दुथडी भरून वाहायली ती वहायलीच, पण दोन्ही बाजूची घरे, झोपड्या गिळत बेतालपणे डोंगर उतरून, वैनगंगेच्या तांडवात सामील झाली. पाच सहा दिवस डोंगरातली माणसे पल्याड. मुकुंदराजाची समाधी हादरून गेली. डोंगरातले हजारो लिटर दूध नासून गेले. सुरवातीचे दोन दिवस लोकांनी दुधाचा खवा केला पण पाऊस हटण्याची लक्षणे दिसेनात. स्वयंपाकाला सुकी लाकडे लागणार. त्यांची साठवणूक संपली तर पुढे काय. घराबाहेर, गोठ्यात साठवलेली लाकडे भिजून गेली होती.<br>{{gap}}आठ दिवसांनंतर पूर ओसरला. देवठाणतून यल्डयाला जाणारा रस्ता मोकळा झाला. पंधरा दिवसांनी उन पडू लागले. आणि ऑगस्टातल्या ओल्या उन्हानेही मातीच्या भिंती फुगू लागल्या... कोसळू लागल्या, डोंगर उतारावर शेते बांधासकट वाहून गेली होती. धूळपेरणी केलेली तान्हुली पिके माना मोडून मातीत मिसळून गेली. रस्ता मोकळा झाल्यापासून रोज कुठल्या ना कुठल्या खेड्यातली माणसे श्रीनाथकडे येत. दोन तीन वर्षांपासून सुरु केलेल्या 'लोकार्थ' संस्थेने काही मदत करावी अशी सुप्त अपेक्षा त्यांच्या डोळयात असे.<br>{{gap}}पण या बेनामी पावसाने उडवलेल्या कहारात चेंगरलेल्या लोकांची शेतं नीट करणे, घरांची बांधबंदिस्ती करणे यासाठी हजारोंनी नव्हे लाखोंनी मदत गोळा करावी लागणार. ती कोण देणार?<br>{{gap}}समोरचा अंधार अधिकच गर्द होत चालला होता. एक मिणमिणता उजेड म्हणजे मधु सावंतचे वाक्य. पण त्या वाक्यापर्यंत पोहचण्यात येणारे, घेतलेल्या भूमिकेचे, आधारभूत विचारांचे अडथळे. श्रीनाथ हतबुध्द होऊन विचारात बुडालेला. त्याला कालची दुपार आठवली.<br>{{gap}}जीप वाणा-जयवंती संगमाच्या अलिकडे सोडून विजारी मांडीपर्यत वर घेउन पायातल्या चपला हातात घेऊन प्रकाश, डॉक्टर आणि श्री चिखलातून वाट काढीत अर्धा डोंगर चढून आले. डावीकडे थोड्या उतारावर कुरणवाडी होती. गावात असतील जेमतेम एकवीस घरं. गावाच्या डावीकडे खडा उतार आणि खालून निळाईचा खडकाळ पट्टा. निळाई नदीचा रूंद वाळूचा पटटा इथे थोडा अरूंद झालाय. फलांगभर पात्रात मोठमोठे काळेभोर कातळ वाळूच्या मध्येमध्ये उभे आहेत. दसरा जवळ आला की अख्खं कुरणवाडी गंगथडीला... गोदावरीच्या परिसरात शेतीकामासाठी जाई. आगातातल्या पिकांची कापणी, खळी करून मातरं साफ करण्याचं आणि रबीसाठी रानांची मशागत करून पेरणी करण्याचे काम आंब्या केजाचे काही मुकादम एकरी बोली लावून घेत. दसरा उलटला की डोंगरातल्या लोकांचे ताफे<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३८ </small>}}</noinclude> o5rkklnafb7qed3t35pwwr7hmim8hcy पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३९ 104 70962 155747 2022-08-16T16:50:24Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>घेऊन गंगथडीला जात. हा रिवाज गेली वर्षानुवर्षे सुरु आहे असे गावातली चिंगा म्हातारी सांगते.<br>{{gap}}...लोकार्थने सुरवातीला सर्वेक्षण केले तेव्हा अनू, लली, सुलू शनवार रविवारी तिकडे मदतीला जात. दसऱ्यानंतर एकपण माणूस गावात राहत नाही यावर विश्वास कसा बसावा ललीने एका पोटुशा माहेरवाशिणीला विचारले होते.<br>{{gap}}'तू तर बाळातपणाला म्हायरी आलीयस ना मग दसरा तर जवळ आलाय. तुजी माय, काकी, म्हातारी आजी, बाप, भाऊ, काका यापैकी तुज्याजवळ एकांदा पुरूष अन् बाई ऱ्हातील की!'<br>{{gap}}ताई हितं कुन्नीसुध्दा ऱ्हात न्हाई. अवं हे दिसदोन पैसे कमवायचे... मागे टाकायचे मग कायमचा उन्हाळा. माजं सासर परळी जवळच्या लुणगावात हाय. सातवा लागून पंधरा दिस झाले नि मला हितं मायनं आनलं. ढवाळजेवनावर हजार रूपये, सासू सासऱ्याला कापडं, यानले डिरेस, मला साडीचोळी, बुंदीचे लाडू असा साजाबाजा घिऊन लुणगावात आले. चार दिसांनी नेऊन घालतील मला. शिवाय हजार रूपये बाळतंपणासाठी सासऱ्या समूर ठिवावे लागतील. म्हायेरी कुठलं आलं माय बाळातपण? आन माय च्या हातचा शिरा नि पथपानी?" मला लुणगावला सोडलं की माय बी जाईल पुण्याला इमारतीच्या बांधकामाला. बोलतांना तिचे डोळे भरून आले होते. बाजूलाच उभे राहून ऐकणाऱ्या पक्याच्या अंगावर काटा आला. श्रीने त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला दुसरीकडे नेले. गावातून कळले की म्हातारी माणसं सपाटीवर बसलेल्या वडजाईला एखाद्या घरात नायतर नातलगाकडे ठेवतीत. त्यांच्या खाण्यासाठी जवारी नायतर पिवळे भरून ठेवतात. चिंगा म्हातारी अैंशीचा पार चढून आलीय. पण पोरा नातवडासोबत सुगीसाठी गंगथडीला जात असते भाकऱ्या भाजायला. तिनेच ही माहिती दिली.<br>{{gap}}... श्रीनाथ प्रकाश आधी कुरणवाडीकडे वळले. दगडी कातळांनी वेढलेल्या जमीनीवर कुरणवाडी खडी आहे. श्रीनाथला पाहताच कुरणे, गोजरे मंडळी पुढे आली.<br>{{gap}}"भैय्या वाईच गुळपानी घ्या अन मग निळाईकडं जाऊ... बघा काय केलंय या कालच्या पावसानं." गोजम्याचा सोमनाथ पाण्याचा तांब्या नि गुळ समोर ठेवीत बोलला.<br>{{gap}}'...सातपदरी कापडानं गाळलय पानी. तरी किती गढून हाय बघा. उतारावरच्या भिंगाऱ्याच्या कोरड्या हिरीत पावसाच पाणी साठलय. अशा पावसात कोसावरच्या वडजाईला तरी कशा जातील बाया पानी आनाया? द्येवाचं नाव घ्या नि प्या पोटभर पानी!'<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १३९ </small>}}</noinclude> mgilv8doczk29t54u9sofx2whbna0em पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१४० 104 70963 155748 2022-08-16T16:55:30Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}श्रीनाथने शबनम मधून उकळलेल्या पाण्याची मोठी बाटली काढून त्यातल घोटभर घशात ओतल आणि बाटली तिथेच ठेवली. हे पानी घरातल्या तान्ह्या लेकराला पाजा. असे सांगून ते निळाईच्या पहाडाकडे गेले. निळाई चिखलाने भरून वाहत होती. कुणी सांगाव असाच पाऊस कोसळत राहिला तर निळाई चिखलाई होऊन जाईल. पक्याच्या मनात विचार आला.<br>{{gap}}'भैय्या, समदा विस्कोट झालाय बघा डोंगरात. देवठाण, सोमठाण, यल्डा, साकूड... डोंगरातली समदी गावं भकास झालीत. आंदी पाऊ न्हाई म्हणून आणि यंदा पावसाने हाबाडा दावला म्हणून... काय बी करा.. घरागणिक जेमतेम एकर दोन एकर रान हाये. ते कष्टानं पेरलं होतं पन बी रूजून वर डोकावतंय तोच वाहून बी ग्येलं. बाळपिक खर्चली हो.. काय तरी बघ आमच्याकडं...' सोमनाथ सांगत होता. वडजाई, साकूड, सोमठाण... सगळया डोंगर गांवातल्या कहाण्या त्याच. आधीच बोडखे असणाऱ्या डोंगरावरची थोडीफार मातीही वाहून गेली होती. ते आणखीच केविलवाणे दिसत होते..<br>{{gap}}अनू जागी झाली. शेजारी श्री नव्हता. श्रीनाथ विमनस्कपणे व्हरांड्यात उभा असल्याचे लक्षात येऊन तीही त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली.<br>{{gap}}'श्री, गेल्या सात आठ दिवसांपासून अस्वस्थ आहेस तू. मोकळेपणी बोलत नाही. सांग ना काय प्राब्लेम आहे आता?' अनूने विचारले.<br>{{gap}}'अने कस सांगू? गेल्या शंभर वर्षात कोसळला नव्हता असा पाऊस कोसळलाय आणि डोंगरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. पिकं गढून गेली. डोंगरातले लोक मोठ्या आशे अपेक्षेने लोकार्थ च्या कार्यकर्त्यांना साकडं घालतात. पाच दहा हजार एका शेतकऱ्याला पुरणे मुश्किल. पाच गांवच्या लोकांना काय सांगायचं आपण? तशीतर आत्तापर्यंत बारा पंधरा खेडयातली माणस येऊन गेलीत.<br>{{gap}}तुला मधू सांवत आवठतो ना? ऑक्सफॉम चा तो मला नेहमी टोकतो परदेशी पैसा हा परदेशी म्हणून का झिडकारायचा? पैसा हा पैसा असतो त्याचा उपयोग तुम्ही कसा करता, कोणासाठी करता आणि कोणत्या उद्देशाने करता ते महत्वाचे. परवा भेटला होता ऑक्सफॉम लोकार्थला दोन लाख रूपये मदत देईल. पांच गावातल्या गरजूपर्यंत ते जाऊ द्या. त्यांच्या हातामनात बळ येईल. ते कोणाला द्यायचे. किती द्यायचे त्याचे हिशेब व्यवस्थीत लिहून ऑडिट करणे हे काम तुमचे तुमच्या गटावर विश्वास म्हणून पैसे द्यायला तयार आहोत. अैऱ्यागैऱ्याला कसे देऊ आम्ही?<br>{{gap}}अने परदेशी पैसा अपवित्र मानणारे आपण मधू म्हणत होता पूर्व ख्रिश्चन लोक<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १४० </small>}}</noinclude> glmcsgsimvnxwnnb8pirkwnrnzeo5ku पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१४५ 104 70964 155749 2022-08-16T16:59:00Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf |Page = 145 |bSize = 386 |cWidth = 374 |cHeight = 596 |oTop = 2 |oLeft = 3 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> 4z60aez0lkq6bk3n6pdzbivytqng60h पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१४१ 104 70965 155750 2022-08-17T06:14:10Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वर्षाच्या मिळकतीचा दहवा नाहीतर आठवा हिस्सा चर्चला देत. पण चर्च तो पैसा गरजूंना निरपेक्ष भावनेने मदत करण्याऐवजी धर्मांतर, धार्मिक बडेजाव वाढविण्यासाठी गरीब देशातील लोकांना मदत करत असे. आज डाव्या ... मानवतावादी विचारांचा प्रभाव स्कॅडेनेव्हियन देशात पडू लागलाय. त्यामुळे ॲक्शन ओड, ऑक्सफाम, तेरे देस होम्य या सारख्या आर्थिक कदत करणाऱ्या संस्था योग्य स्वयंसेवी वा अशा सक्रिय संस्थाच्या शोधत असतात. मुस्लिमही वर्षभराच्या मिळकतीचा सहावा हिस्सा गरीबांना कपडे, धान्याच्या रूपाने ईदच्या निमिताने वाटतात. आणि आपण..... हिंदू? धर्माने भेद शिकवले. दान फक्त जन्माने ब्राम्हण असलेल्याणांच का? असे का? गरीबाला का नाही हिंदुनीही .... सर्व जातीजमातीच्या हिंदूनी नव बौधांनी, भारतात रहाणाऱ्या प्रत्येक खाऊन पिऊन बऱ्या असणाऱ्या भारतीयांने मिळतीचा १२ वा हिस्सा जरी एकत्र केला तरी इतर देशांकडे भीक मागावी लागणार नाही.<br>{{gap}}..अनू मी, अशोक, प्रकाश, अण्णा, अमन, डॉक्टर या सगळ्यांशी बोललो, सगळ्यांना सारं पटतंय पण...<br>{{gap}}'श्री आता झोप आधी. कधी कधी झोपेतच हरवलेल्या वाटा सापडत असतात. चल घरात उद्या विचार करू.'<br>{{gap}}झोपेतही दोघे नवी वाट... दिशा शोधत होते. श्रीनाथच्या डोळ्यासमोर गेल्या पाच सहा वर्षातल्या घटना, प्रसंग उभे रहात होते.<br>{{gap}}... आणीबाणीच्या अखेरीस श्रीनाथनी व काही बिनीच्या समाजावादी नेत्यांनी आपली मत निर्भिडपणे लिहून कळवली होती. आणि तसेच झाले.<br>{{gap}}संघप्रणित जनसंघ आणि समाजवादी यांचे समरस-मनोमिलन शब्दांतच राहिले. दोन वर्षात इंदिराबाई परत निवडून आल्या. समाजवादी नेत्यांची लक्तरं सजवून वेशीला टांगली गेली. ह्यात जनसंघ आणि काँग्रेस दोघेही पुढे होते. द्विसदस्यत्वाच्या वादावरून वर्षभरातच कुरबूरी सुरु झाल्या. जनसंघातून जनता दलात आलेल्या प्रत्येक सदस्याने संघाचे सदस्यत्व स्वीकारायचेच असा अंतर्गत दबाव आणणे सुरु झाले. जनसंघाला कडकडून गळा मिठी मारून नवे समरसतेचे राजकारण जन्माला घालून राजकारणाची दिशा बदलण्याचे स्वप्न पहाणऱ्या समाजवाद्यांना याचा प्रत्यय येऊ लागला. दुहेरी निष्ठेचा वाद वाढत होता. जनता दलाच्या दहा लाकडी ओंडक्याच्या पडावाचे दोर ढिले पडू लागले अखेर. अणि आवळ्या कोहळयाच गाठोडं सुटलं. मग पुन्हा निवडणूका. भरपूर संख्येने काँग्रेस सरकार सत्तेत आले. संघ, हिंदुमहासभा, वगैरे उजवे पक्ष एकत्र राहिले. भारतीय जनता दल अस्तित्वात आले. समाजवाद्यांची<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १४१ </small>}}</noinclude> 1i3hqsnwo1fjquejjz4krl84lhghenl पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१४२ 104 70966 155751 2022-08-17T06:18:59Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>मात्र अनेक शकले झाली. चंद्रशेखर, दंडवते याची फळी जनतादल म्हणून एकत्र राहिली पण फर्नाडीस, लालूप्रसाद, मुलायमसिंग यादव यांचे वेगवेगळे प्रांतवार आखाडे उभे राहिले पिछडेवाल्यांच्या वेगवेगळ्या आघाड्या वेगळ्याच....<br>{{gap}}श्रीनाथ सारख्या स्वप्निल संघर्षाची तरूणाई पार करून चाळीशीत झुकलेल्या प्रौढ तरूणाचे मन राजकारणात रमेना. त्यातही डॉ. मोहनच्या नगराध्यक्षाच्या निवडणूकीतला अनुभव. त्यातून आलेली निराशा... राजकीय भ्रष्टाचाराचा, विश्वासघाताचा विदारक प्रत्यय. बन्सीला जिल्हा परिषदेसाठी कुंबेफळ विभागातून उभे केले होते. पंचायत समितीसाठी दूिन रेड्डी आणि लखू जाधव. या पूर्ण सर्कलची जबाबदारी श्रीनाथवर टाकली होती. त्यानं अत्यंत नेमकी आखणी करून प्रचारात आणले. अनूही केवळ श्रीसाठी खेड्यातून हिंडली. बन्सी, दिनू, लखू निवडून आले आणि अनूने दहाटे चप्पले मार्ट मध्ये जाऊन श्रीनाथसाठी नव्या कोल्हापूरी वहाना खरेदी केल्या. आधीच्या अक्षरशः झिजल्या होत्या चपला.<br>{{gap}}पुढच्याच वर्षी नगराध्यपदाची निवडणूक होती. मतदान संपूर्ण गावातील मतदारांनी थेट करायचे होते. मोहन जाधव जनता पक्षातर्फे उभा होता. काँग्रेस तर्फे सदानंद गायकवाड आणि अपक्ष म्हणून काँग्रेसमध्येच आजवर असलेला मुजीबोद्दीन बुहारी उभा होता. सर्वानाच एकशे एक टक्के खात्री होती. डॉ.मोहन नगराध्यक्ष होणार बीडचा उपेन्द्र श्रीनाथच्या खास मदतीसाठी गेले चार दिवस अब्यात ठाण मांडून बसला होता. शेवटची सभा बन्सीधर, बापू, भैय्या हजारी यांनी घेतली. पण आदल्या रात्री उपेन्द्रने रिपोर्ट आणला मोहन निवडून येत नाही. भट गल्ली, कुलकर्णी गल्ली शनिवार पेठ पूर्ण फुटली. इथे दुहेरी निष्ठावाल्यांनी सुरु केलेल्या भारतीय संस्कृती विश्वभारतीय शैक्षणिक संस्थेसाठी पन्नास हजाराची देणगी देऊन मते काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतला होता. सत्तेत मुजीबोद्दीन तर नकोच होता. पण समाजवादी तर त्याहून नको, अशी अगदी आतल्या खास केडरनी भूमिका घेतली. उपेन्द्रने आदल्यारात्री कल्पना दिल्याने श्रीनाथ मतमोजणीच्या वेळी सतत मोहन बरोबर होता. मोहन चार हजार आठरा मतांनी पडला. उजव्यांच्या या अघोरी फसवणूकीमुळे श्रीनाथ, मोहन, बप्पा सर्वाच्याच मनाला सुरकुती पडली. पण त्याचक्षणी खऱ्या अर्थाने हातांना आणि मनाला बळ देणार आगळ वेगळ राजकारण शोधण्याचा ध्यास सर्वानी घेतला. लोकासाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी लोकसहभागातून रचनेसाठी संघर्ष करण्याची भूमिका घेणारी लोकज्ञानाचा शोध घेऊन त्या .. त्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांच्या उपयोगातून नवनिर्माणाची दिशा शोभणारी<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १४२ </small>}}</noinclude> 33rzikbtoxq1dozmzaiqtb5ppnbls8p पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१४३ 104 70967 155752 2022-08-17T06:24:04Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>'लोकार्थ' ही संस्था आकाराला आली नि आता हा जीवघेणा पाऊस....<br>{{gap}}.... अनू छान घोरत होती. स्वप्नांचे अवकाश रंगीबेरंगी आठवणीनी झगमगून गेले होते. त्या विदर्भातल्या जनतादलाच्या मंत्रिणबाई अंब्याला भेट देणार होत्या. भेट अचानक ठरली. रात्री राजाभाऊ देशकरांचा फोन आला की सुरेखा वहिनी घाटपांडे रात्रीची सेलूची सभा आटोपून डाकबंगल्यावर उशीरा पोचतील. अनूने सकाळी जाऊन त्यांचे स्वागत करावे. न्याहारी घेऊन त्या रेणापुराकडे जातील. रात्रीची सभा परळीत ठरली होती. अनू ठीक आठला सरकारी विश्रामधामावर पोचली. पंधरा मिनीटांनी सुरेखा वहिनी तयार होऊन बाहेर आल्या. अनूने स्वतःची जुजबी ओळख करून दिली.<br>{{gap}}'हं. मग आपले मेंबर्स भरपूर वाढवा. महिला सदस्य आहेत की नाही? समितीची शाखा भरत असेल ना इथे?...' सुरेखा वहिनी बातचीत करीत होत्या. अनूची टयूब थोडी उशीराच पेटली.<br>{{gap}}'हो हो महिला सदस्या आहेत ना? आज काल शाखा कुठे भरताहेत?' वगैरे वगैरे बोलून वेळ मारून नेत असतांनाच राजाभाऊ धापा टाकीत आत आले. "आज चतुर्थी. वहिनीना चतुर्थी असेलच. हिने फ्रुटसॅलड आणि साबुदाण्याची उसळ करून दिलीय. म्हणून उशीर झाला. हं. वहिनीसाहेब रात्री झोप वगैरे निवांत झाली ना? या अनुराधा श्रीनाथ माहेश्वरी म्हणजे धानोरकर, आडनाव न लावण्याची सध्याची टूम. या राष्ट्र सेवा दल.. युक्रान्दच्या कार्यकर्त्या. आता जनता दल प्राध्यापिका आहेत इथल्या महाविद्यालयात." राजाभाऊ सांगत असतांना सुरेखा वहिनींनी एक तीक्ष्ण नजर अनूवरून फिरविली. अनूनेही ओठातल्या ओठात हसून उत्तर दिले होते...<br>{{gap}}स्वप्नातही अनू हसत होती. एवढ्यात पाण्याचा भला मोठा लोंढा अंगावरून वाहत गेला. नाकातोंडात पाणी.... जीवाची गुदमर. त्यातून जरा सावरतेय तोवर तो लोंढा पार नजरेआड. मग उन्हाच्या बोचऱ्या काट्यांचे घनदाट जंगल. कितीही अंगचोरून चुकवायचे म्हटले तरी टोचणारे घायाळी काटे न सापडणारी वाट... मग पुन्हा तोच पाण्याचा लोंढा माघारी फिरून अंगावर आलेला...<br>{{gap}}नाकातोंडात शिरलेले गढूळ पाणी. श्वास घेता येईना...<br>{{gap}}आणि अनूला जाग आली. श्रीनाथ तिला गदगदा हलवून उठवीत होता. "अने उठ. माझ्या ओंजळीत एक चिमुकला निळापक्षी येऊन बसला होता. भोर निळे पंख आणि आरपार जाणारी तीक्ष्ण पण रेशमी नजर..."<br>{{gap}}'अने, मी ठरवलंय. ते ऑक्सफासचे पैसे येताहेत ना? घेऊ या. पडलेली घरे,<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १४३ </small>}}</noinclude> 4zjcqidpnhszvacuf14d38e758asgzh पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१४४ 104 70968 155753 2022-08-17T06:31:32Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वाहून गेलेली शेते तर दुरुस्त होतील? त्यांना गरजेनुसार इन काईंडस् प्रत्यक्ष वस्तूच्या स्वरूपात मदत करू म्हणजे सिमेंटची पोती... विटा...ट्रॅक्टरचे भाडे वगैरे. मात्र एक अट घालायची. केवळ मजूर लावून बंदिस्ती करायची नाय, तर घरातील लोकानीही पतीपत्नी, मोठी मुले यांनीही काम करायचं. शिवाय सल्ला देण्यासाठी आपले कार्यकर्ते आहेतच. मन्या शेतीचा डिप्लोमावाला आहे. तर मनीचा नवरा बांधकामाची कॉन्ट्रक्टस घेतो... काय? बोल ना! आणि दुसरी अट... आता जर दहा हजाराची मदत दिली असेल तर वर्षभरात ते पैसे परत फेडायचे. व्यवस्थापन खर्च म्हणून पाचशे रूपये घ्यायचे. पण एक महिना उशीर झाला तरी महिन्याला शेकडा दोन रूपये दंड... काय? शिवाय ज्यांची शेत वाहून गेली त्यांना दगडांची पौळ... बांध बंदिस्तीसाठी बी-बियाणे, खते यासाठी मदत, म्हणजे उत्तम बियाणे व खतच द्यायचे. आपल्या मित्र मंडळीत ॲग्रोचे पदवीधरही आहेत. त्यांची मदत घेऊ काय? ऐकते आहेस ना तू?<br>{{gap}}'अने, तू बघच. पहात पहाता उसनवारीने दिलेला पैसा परत आल्यावर हा परत केलेल्या रकमेचा आकडा एवढा वर जाईल की कोणाकडे पैशांची मदत मागायचीही गरज पडणार नाही. या रिव्हाल्हींग फंडातून फिरत्या रकमेतून आगाताच्या आणि रबीच्यासाठी लहान शेतकऱ्यांला खतबियाणांची मदत करता येईल. लोहार... सुतार... कुंभार... चांभाराला त्यांचा व्यवसाय करण्यासाठी उसनवार देता येईल....'<br>{{gap}}आजवर केवढं प्रेम केलं.. किती विश्वास टाकला डोंगरातल्या माणसांनी! त्यांच्या कोरडवाहू जमिनीला पाणी, हातांना काम... हिरवा डोंगर....<br>...... <br>{{gap}}अने तुला आठवतं, वसंतराव नाईकांनी सामुदायिक विहिरीचं स्वप्न महाराष्ट्रात पेरण्याचा प्रयत्न केला. पण शासनाचे कागदी घोडेच नाचले नि योजनेचा कचरा झाला. एक नि दीड एकरवाल्याची जमीन भिजायची. तर तेच स्वप्न आपण नव्या उमेदिने शेतकऱ्यांच्या सहभागातून पुन्हा पेरू या... ते नक्कीच जोमाने ... उगवेल. त्याला स्वार्थाची, भ्रष्टाचाराची कीड लागेल. सगळेच कार्यकर्ते लोकसेवक असतील. अल्पशा गरजेनुसार मानधन घेणार....'<br>{{gap}}अने, ऐकते आहेस ना तू?" श्रीनाथ धूनमध्ये बोलत होता. स्वप्नात हरवलेल्या श्रीला अनू शोधत होती. हालवून हालवून हाक मारीत होती. पण तो खूप दूर नव्या अकराव्या दिशेने वेगाने वाहून जात होता... {{Css image crop |Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf |Page = 144 |bSize = 399 |cWidth = 36 |cHeight = 20 |oTop = 528 |oLeft = 314 |Location = right |Description = }}<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १४४ </small>}}</noinclude> eec9gda310d1oc7268p5waq9hb8h4ho शोध अकराव्या दिशेचा 0 70969 155755 2022-08-17T06:40:31Z अश्विनीलेले 3813 नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = शोध अकराव्या दिशेचा | साहित्यिक = शैला लोहिया | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = [[शोध अकराव्या दिशेचा/प्रकरण १|प्रकरण १]] | वर्ष = २०१३ | टिपण = | वर्ग = | द..." wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = शोध अकराव्या दिशेचा | साहित्यिक = शैला लोहिया | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = [[शोध अकराव्या दिशेचा/प्रकरण १|प्रकरण १]] | वर्ष = २०१३ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="शोध अकराव्या दिशेचा.pdf" from=1 to=8 /> bvxh1zf8uk7cb56moid6vso40ssvov7 शोध अकराव्या दिशेचा/प्रकरण १ 0 70970 155756 2022-08-17T06:42:26Z अश्विनीलेले 3813 नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = शोध अकराव्या दिशेचा | साहित्यिक = शैला लोहिया | अनुवादक = | विभाग = | मागील = [[शोध अकराव्या दिशेचा/प्रकरण १|प्रकरण १]] | पुढील = शोध अकराव्या दिशेचा/मलपृष्ठ|मलप..." wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = शोध अकराव्या दिशेचा | साहित्यिक = शैला लोहिया | अनुवादक = | विभाग = | मागील = [[शोध अकराव्या दिशेचा/प्रकरण १|प्रकरण १]] | पुढील = [[शोध अकराव्या दिशेचा/मलपृष्ठ|मलपृष्ठ]] | वर्ष = २०१३ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="शोध अकराव्या दिशेचा.pdf" from=9 to=144 /> dhpkfppbrh5wabntjlguml8jlj3okk2 शोध अकराव्या दिशेचा/मलपृष्ठ 0 70971 155757 2022-08-17T06:44:58Z अश्विनीलेले 3813 नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = शोध अकराव्या दिशेचा | साहित्यिक = शैला लोहिया | अनुवादक = | विभाग = | मागील = [[शोध अकराव्या दिशेचा/प्रकरण १|प्रकरण १]] | पुढील = | वर्ष = २०१३ | टिपण = | वर्ग = | द..." wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = शोध अकराव्या दिशेचा | साहित्यिक = शैला लोहिया | अनुवादक = | विभाग = | मागील = [[शोध अकराव्या दिशेचा/प्रकरण १|प्रकरण १]] | पुढील = | वर्ष = २०१३ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="शोध अकराव्या दिशेचा.pdf" from=145 to=145 /> ovsrx5dyhibqrdz23vh0n7gvg2w5gjp पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१ 104 70972 155758 2022-08-17T06:47:59Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 1 |bSize = 384 |cWidth = 384 |cHeight = 597 |oTop = 0 |oLeft = -1 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> o1sgtoxh3q1aptmen6irufkm4y56pw7 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/२ 104 70973 155759 2022-08-17T06:50:45Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|{{xxxx-larger|'''रुणझुणत्या पाखरा'''}}<br><br><br>{{xx-larger|'''लेखिका<br>डॉ. शैला लोहिया'''}}}}<noinclude></noinclude> 6cmwov8u2ihfgdsff36e8h3xtug4ll6 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३ 104 70974 155762 2022-08-17T07:11:23Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> * '''रुणझुणत्या पाखरा'''<br>(Runzunatya Pakhara)<br> * '''लेखिका'''<br>डॉ.शैला व्दारकादास लोहिया.<br>संगीतविशारद (गांधर्व विद्यालय)<br>पता - ३२, किनारा, विद्याकुंज वसाहत,<br>अंबाजोगाई, जि, बीड - ४३१५१७<br>दुरध्वनी क्रमांक -घर - (०२४४६) २४७०१६<br> * '''प्रकाशक'''<br>दिशा पब्लिकेशन्स,<br>पुणे-३०<br> * '''अक्षरजुळणी'''<br>विवेक साळुंखे<br> * '''मुखपृष्ठ'''<br>प्राची पानसे<br> * प्रथम आवृत्ती: एप्रिल २००९<br> * '''मुद्रक'''<br>दिशा ऑफसेट, राष्ट्र सेवा दल बिल्डिंग,<br>दांडेकर पूल, पुणे-३० फोन:०२०-६०७०११४२<br> * '''मुल्य'''<br>रुपये एकशे साठ मात्र<br> © सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन<br><noinclude>दोन / रुणझुणत्या पाखरा</noinclude> 8u9xyfdemgid1r3w5vwa4zpouy1gyb8 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४ 104 70975 155763 2022-08-17T07:14:55Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{xx-larger|'''मनोगत'''}}}} {{gap}}डिसेंबर २००६ च्या सुरुवातीचे दिवस. दैनिक लोकसत्ताच्या कार्यालयातून मुकुंद सांगोराम यांचा दूरध्वनी आला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून जाणाऱ्या अंकातील 'संवाद' या सदरात लिहिण्याची अपूर्व संधी दै. लोकसत्ता परिवाराने मला दिली होती. माझ्यातल्या लेखिकेचा हात पुन्हा एकदा 'लिहिता' झाला, दै. लोकसत्ता परिवार, संपादक श्री. कुमार केतकर, निवासी संपादक मुकुंद संगोराम आणि लेख मिळाल्याची मी चौकशी करताच 'हं बोला शैला भाबी' अशा मधुर शब्दात संवाद साधणारे श्री. प्रमोद माने, माझे जीवनसाथी डॉ. द्वारकादास लोहिया, डी.टी.पी. करणारे श्री. बिभीषण घाडगे, श्री. अशोक केदार, अंजली इंगळे, धावपळ करणारी अंजू कोदरकर आणि अनेक अनेक...<br>{{gap}}...प्रस्तावना लिहिण्याची विनंती करताच तात्काळ होकार देणारे माझे छोटे स्नेही, प्रा. विश्वास वसेकर त्यांची पत्नी सौ. शैला हे सगळे, ज्यांनी 'संवाद' सुफळ समृद्ध केला त्या सर्वांची मी ऋणी आहे.<br> {{Right|'''-शैला लोहिया'''}}<noinclude>{{Right|रुणझुणत्या पाखरा/ तीन}}</noinclude> oylxjm327dhy16d0snax2pt0wwhwbv3 155764 155763 2022-08-17T07:15:28Z अश्विनीलेले 3813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{xx-larger|'''मनोगत'''}}}} {{gap}}डिसेंबर २००६ च्या सुरुवातीचे दिवस. दैनिक लोकसत्ताच्या कार्यालयातून मुकुंद सांगोराम यांचा दूरध्वनी आला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून जाणाऱ्या अंकातील 'संवाद' या सदरात लिहिण्याची अपूर्व संधी दै. लोकसत्ता परिवाराने मला दिली होती. माझ्यातल्या लेखिकेचा हात पुन्हा एकदा 'लिहिता' झाला, दै. लोकसत्ता परिवार, संपादक श्री. कुमार केतकर, निवासी संपादक मुकुंद संगोराम आणि लेख मिळाल्याची मी चौकशी करताच 'हं बोला शैला भाबी' अशा मधुर शब्दात संवाद साधणारे श्री. प्रमोद माने, माझे जीवनसाथी डॉ. द्वारकादास लोहिया, डी.टी.पी. करणारे श्री. बिभीषण घाडगे, श्री. अशोक केदार, अंजली इंगळे, धावपळ करणारी अंजू कोदरकर आणि अनेक अनेक...<br>{{gap}}...प्रस्तावना लिहिण्याची विनंती करताच तात्काळ होकार देणारे माझे छोटे स्नेही, प्रा. विश्वास वसेकर त्यांची पत्नी सौ. शैला हे सगळे, ज्यांनी 'संवाद' सुफळ समृद्ध केला त्या सर्वांची मी ऋणी आहे.<br> {{Right|'''{{x-larger|-शैला लोहिया}}'''}}<noinclude>{{Right|रुणझुणत्या पाखरा/ तीन}}</noinclude> 9jr6u4om6vp610jh2reoh0wo0485jzi 155765 155764 2022-08-17T07:16:09Z अश्विनीलेले 3813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{xx-larger|'''मनोगत'''}}}} {{gap}}डिसेंबर २००६ च्या सुरुवातीचे दिवस. दैनिक लोकसत्ताच्या कार्यालयातून मुकुंद सांगोराम यांचा दूरध्वनी आला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून जाणाऱ्या अंकातील 'संवाद' या सदरात लिहिण्याची अपूर्व संधी दै. लोकसत्ता परिवाराने मला दिली होती. माझ्यातल्या लेखिकेचा हात पुन्हा एकदा 'लिहिता' झाला, दै. लोकसत्ता परिवार, संपादक श्री. कुमार केतकर, निवासी संपादक मुकुंद संगोराम आणि लेख मिळाल्याची मी चौकशी करताच 'हं बोला शैला भाबी' अशा मधुर शब्दात संवाद साधणारे श्री. प्रमोद माने, माझे जीवनसाथी डॉ. द्वारकादास लोहिया, डी.टी.पी. करणारे श्री. बिभीषण घाडगे, श्री. अशोक केदार, अंजली इंगळे, धावपळ करणारी अंजू कोदरकर आणि अनेक अनेक...<br>{{gap}}...प्रस्तावना लिहिण्याची विनंती करताच तात्काळ होकार देणारे माझे छोटे स्नेही, प्रा. विश्वास वसेकर त्यांची पत्नी सौ. शैला हे सगळे, ज्यांनी 'संवाद' सुफळ समृद्ध केला त्या सर्वांची मी ऋणी आहे.<br> {{Right|'''-शैला लोहिया'''}}<noinclude>{{Right|रुणझुणत्या पाखरा/ तीन}}</noinclude> oylxjm327dhy16d0snax2pt0wwhwbv3 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५ 104 70976 155767 2022-08-17T07:20:00Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{xx-larger|'''प्रस्तावना'''}}}} {{gap}}कथा व कविता हे आरंभापासून वाङ्मयाचे मूलभूत प्रकार दिसून येतात. प्राचीन व मध्ययुगीन वाङ्मयात त्यांचीही सरमिसळ झालेली दिसते. ऋग्वेदात कथात्मता आणि काव्यात्मता यांचे एकजीव व अनेकदा मोठ्या विलोभनीय स्वरूपात प्रत्ययाला येते. कथा आणि कवितेचा जन्म जरी एका वेळी झालेला असला तरी कथात्मक वाङ्मयाचा विकास अधिक झालेला दिसून येतो. मुद्रण कलेमुळे अठराव्या शतकानंतर वाङ्मयप्रकारांना निश्चित आणि नवीन अशी रुपे प्राप्त व्हायला लागली. प्रत्येक सजीवत्वाला काही अवस्थांमधून जाणे श्रम प्राप्रच असते. हे लक्षात घेऊन 'फॉर्म' ची 'फॉर्म' म्हणून जी वाटचाल आहे ती सांगणे महत्त्वाचे असते. वाङ्मयेतिहास लिहिणारांकडून नेमकी इथेच चूक होते. ते प्रायः अशा याची वाटचाल सांगताना दिसतात; 'फॉर्म' ची नाही. ही चूक आपल्याला टाळता आली पाहिजे.<br>{{gap}}आणखी एक चूक संभाव्य असते. कथा आणि कादंबरी, एकांकिका आणि नाटक यांच्यातला फरक हा संख्यात्मक असतो; गुणात्मक नाही. जी. ए. कुळकर्णी किंवा आसाराम लोमटे यांच्या कथांना अनेकदा लघुकादंबरी म्हणता येईल. 'सावित्री' आणि 'मानव' मधील लेखनाची तपासणी करताना अशा प्रकारच्या फोल चर्चेचे घोळ घालता येतील. अनेकत्वातून एकख सूचित करणे हो सर्वच ललित कलांचा धर्म आहे. लघुकथेतील अनेकत्व हे कादंबरीच्या मानाने कमी असते असे म्हणावे हाच न्याय एकांकिका आणि नाटक यांना लावता येईल.<br>{{gap}}मुद्रणकलेमुळे जसे वाङ्मयप्रकारांना निश्चित आणि नवीन स्वरूप येऊ लागले तसे काळाच्या आणि उत्क्रांतीच्या ओघात नाट्यछटेसारखा एखादा वाङ्मय प्रकार नष्ट<noinclude>चार / रुणझुणत्या पाखरा</noinclude> hb4em6lnzy2r1h2hrshhgzd5nrt410z 155768 155767 2022-08-17T07:21:21Z अश्विनीलेले 3813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{xx-larger|'''प्रस्तावना'''}}}} {{gap}}कथा व कविता हे आरंभापासून वाङ्मयाचे मूलभूत प्रकार दिसून येतात. प्राचीन व मध्ययुगीन वाङ्मयात त्यांचीही सरमिसळ झालेली दिसते. ऋग्वेदात कथात्मता आणि काव्यात्मता यांचे एकजीव व अनेकदा मोठ्या विलोभनीय स्वरूपात प्रत्ययाला येते. कथा आणि कवितेचा जन्म जरी एका वेळी झालेला असला तरी कथात्मक वाङ्मयाचा विकास अधिक झालेला दिसून येतो. मुद्रण कलेमुळे अठराव्या शतकानंतर वाङ्मयप्रकारांना निश्चित आणि नवीन अशी रुपे प्राप्त व्हायला लागली. प्रत्येक सजीवत्वाला काही अवस्थांमधून जाणे श्रम प्राप्रच असते. हे लक्षात घेऊन 'फॉर्म' ची 'फॉर्म' म्हणून जी वाटचाल आहे ती सांगणे महत्त्वाचे असते. वाङ्मयेतिहास लिहिणारांकडून नेमकी इथेच चूक होते. ते प्रायः अशा याची वाटचाल सांगताना दिसतात; 'फॉर्म' ची नाही. ही चूक आपल्याला टाळता आली पाहिजे.<br>{{gap}}आणखी एक चूक संभाव्य असते. कथा आणि कादंबरी, एकांकिका आणि नाटक यांच्यातला फरक हा संख्यात्मक असतो; गुणात्मक नाही. जी. ए. कुळकर्णी किंवा आसाराम लोमटे यांच्या कथांना अनेकदा लघुकादंबरी म्हणता येईल. 'सावित्री' आणि 'मानव' मधील लेखनाची तपासणी करताना अशा प्रकारच्या फोल चर्चेचे घोळ घालता येतील. अनेकत्वातून एकख सूचित करणे हो सर्वच ललित कलांचा धर्म आहे. लघुकथेतील अनेकत्व हे कादंबरीच्या मानाने कमी असते असे म्हणावे हाच न्याय एकांकिका आणि नाटक यांना लावता येईल.<br>{{gap}}मुद्रणकलेमुळे जसे वाङ्मयप्रकारांना निश्चित आणि नवीन स्वरूप येऊ लागले तसे काळाच्या आणि उत्क्रांतीच्या ओघात नाट्यछटेसारखा एखादा वाङ्मय प्रकार नष्ट<noinclude>{{rh|चार / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 7ngpvpmmhpdbq7e08g4yrn8a9eofpph पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६ 104 70977 155769 2022-08-17T07:26:02Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>ही होऊ शकतो. लघु निबंधातून सर्वस्वी नवीन असा ललित गद्य जन्माला येतो हेही लक्षात घेतले पाहिजे.<br>{{gap}}ललित गद्य हा एक उभयलिंगी वाङ्मयप्रकार आहे. त्यात कवितेची कमनीयता, स्त्रीसुलभता आणि वैचारिक आणि पौरुष यांचा सुंदर संयोग झालेला असतो.<br>{{gap}}डॉ. सुधीर रसाळ यांनी 'अनुभवाचे असे आकार जे कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक या प्रकारातून व्यक्त होऊ शकत नाहीत, त्याला ललित गद्य म्हणावे अशी नास्तिपक्ष मांडणारी व्याख्या केली आहे. आठवणी प्रवासवर्णन, निसर्गवर्णन, विनोद, व्यक्तिचित्र अशा सगळ्यांना सामावून घेणारे ललित गद्य हे 'महापोर्ट' आहे असंही म्हटलं जातं.<br>{{gap}}वरील तिन्ही विचारांत ललित गद्याची निरनिराळी वैशिष्ट्य आणि लक्षणं सूचित होतात.<br>{{gap}}आजचे ललितगद्य हे पूर्वीच्या लघुनिबंधाचे उत्क्रांत रूप आहे. लघुनिबंधाला वैचारिक निबंधापेक्षा वेगळा मानून एक ललितकलेत समाविष्ट होणारा असा वाङ्मयप्रकार म्हणून इ.स.१५८० च्या आसपास प्रथम फ्रेंच लेखक माँर्तन यांनी रूढ केले असे मानले जाते. प्रा. नरहर कुरुंदकरांनी आल्फा ऑफ प्लो पासून लघुनिबंधाची सुरुवात मानली आहे. मराठीत ना. सी. फडके यांनी गुजगोष्ट म्हणून आणि वि. स. खांडेकरांनी लघुनिबंध म्हणून जो चार्ल्स लॅम्बना लिहिला तो या 'पर्सनल एस्से' ला मराठीत आणण्याच्या भूमिकेतून अनंत काणेकर, म. ना. अदवंत, हेही याच माळेचे मणी. इंग्रजी साहित्यात ज्याला 'एसे' किंवा निबंध म्हणतात त्यात विचारांची वस्तुनिष्ठ मांडणी असते. अनुभवाचे किंवा 'मी' चे निवेदन करणे हा त्याचा हेतू नसतो. तिथे अनुभव हे साध्य मुळीच असत नाही. त्या उलट लघुनिबंधाचे १ लघु निबंधात अनुभव आणि तदनुषंगिक विचारांचा विमुक्त असा आविष्कार असतो.<br>{{gap}}मराठी समीक्षेत ललित वाङ्मयाचा एक प्रकार म्हणून चर्चा करताना त्याची तुलना ललित वाङ्मयाच्या इतर प्रकारांशी करण्याची पद्धत रूढ झाली आहे. कथा कादंबरी- एकांकिका- नाटक यांच्याशी त्याची तुलना करणे निरर्थक आहे. त्यातून डॉ. सुधीर रसाळांनी केली तशी अभावात्मक व्याख्याच संभवते. मग वेद जसे देवाचं वर्णन अमुक म्हणजे तो नाही, तमुक म्हणजे तो नाही. असं 'नेति नेति'च्या भाषेत करतात तसा प्रकार एक वाङ्मयप्रकार म्हणून ललित गद्याच्या बाबतीत होतो. आणि मग<noinclude>{{Right|रुणझुणत्या पाखरा / पाच}}</noinclude> przbxhhneo1rzm51vmkayu8pc9jylvk पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७ 104 70978 155771 2022-08-17T07:30:43Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>लघुनिबंधात विचार डोकावणे त्याच्या प्रकृतीला कसे बाधक आहे वगैरे बाळकळ मुद्दे मांडले जातात. उदा. 'एखाद्याने सहजच भेटीसाठी आलो अशी सुरुवात करून इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्या व सहज ओघात 'यंदा कर्तव्य आहे काय' असे विचारावे म्हणजे जसे वाटते, तसा प्रत्यय फडके- खांडेकरांचा निबंध वाचताना मला पुनः पुनः येतो. एका क्षणात भेटीसाठी येण्याचा हेतू कळला म्हणजे गप्पांतील स्वाभाविकपणा हा अभिनय हा लघुनिबंधात जाणवतो. शेवटी मतेच मांडायची म्हटल्यावर सगळा खेळकरपणा, सगळे चिंतनाचे प्रयोग, अभिनय ठरतात. विचार सजवून मांडण्याचा प्रयत्न करणारी धडपड ठरतात.<br>{{gap}}एका प्रख्यात समीक्षकाचे हे विचार वाचून असे वाटते की जण 'विचार' या घटकाची ललितगद्याला ॲलर्जीच आहे की काय! 'विचार' प्रविष्ट झाला की ललित निबंध संपला!<br>{{gap}}बाकीच्या वाङ्मयप्रकारामध्ये कितीही मोठी परिवर्तने झाली तरी याचे नाव बदलले नाही. हरिनारायण आपटे यांची ही कादंबरी आणि भालचंद्र नेमाडे यांची सुद्धा कादंबरीच; ना. सी. फडके यांची लघुकथा आणि जी. ए. कुळकर्णी यांची देखील लघुकथाच. गोविंद बल्लाळ देवल यांचे ते नाटक आणि महेश एलकुंचवार यांचे ते नाटकच! असे असताना मराठी लघुनिबंधाच्या बाबतीतच असे का व्हावे? त्याचे नाव टाकून देऊन त्याला ललितगद्य हे नवे नाव द्यावे लागावे?<br>{{gap}}प्राचीन साहित्यात सगळे वाङ्मयप्रकार पद्यमय राहण्याच्या धडपडीत होते. मुद्रणकलेचा जेव्हा शोध लागलेला नव्हता तेव्हा लेखन जपण्याचा सगळा भार स्मरणशक्तीवर पडायचा तेव्हा गद्यरचना क्वचितच केली जायची. स्मरणसुलभता हे पद्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत न येणाऱ्या कित्येकांना गीतेचा पंधरावा अध्याय, रामरक्षा पाठ असते याचे कारण हे ग्रंथ पद्यात आहेत. वेदांचे जतन त्यांच्या या स्मरणसुलभतेमुळेच करणे शक्य झाले.<br>{{gap}}प्राचीन साहित्यातला दासबोध हा वैचारिक गद्याचा ग्रंथ आहे (कविता नव्हे) तर ज्ञानेश्वरी हे ललित गद्य आहे (कविता नव्हे) असा विचार कधी कुणी का केला नाही याचे नवल वाटते. दासबोधात गद्याचे पौरुष फक्त आहे, करुणाष्टकात कवितेचे स्त्रीत्व फक्त आहे. पण ज्ञानेश्वरीत कवितेच्या ललित्याशी वैचारिकतेचा सुंदर संयोग झाला आहे. ज्ञानेश्वरी हा थेट माधव आचवट, दुर्गा भागवत इरावती कर्वे, गो. वि. करंदीकर, विजय तेंडुलकरांच्या प्रखर वैचारिकतेशी नाते सांगणारा प्राचीन काळातला सुंदरतम ललितगद्याचा ग्रंथ आहे.<br><noinclude>{{rh|सहा / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 2ue5uirg52jiifzli926fb8kex07efx पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८ 104 70979 155772 2022-08-17T07:35:34Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}आता मी ही व्याख्या पुन्हा सांगतो की ललितगद्य हा उभयलिंगी वाङ्मयप्रकार आहे. वैचारिक निबंध आणि कवितेचा त्यात अप्रतिम 'अर्धनटनारीश्वर' झालेला दिसून येतो.<br>{{gap}}प्रवासवर्णन, व्यक्तिचित्र, विनोदी लेख आणि निसर्गावर ललितगद्यात सर्वात महत्त्वाची ठरते ती लेखकाच्या संवेदनस्वभावाचा अपरिहार्य घटक असले व त्याची वैचारिकता त्याचे अलोकतारतम्य ही वैचारिकता एवढी तरह, सुक्ष्म, प्रखर आणि उत्कट असते की कवितेखेरीज कोणीच तिला पेलू शकत नाही. अशा वेळी भावुक होऊन वाचऊ म्हणतात की हे साक्षात् 'गद्यकाव्य'च आहे!<br>{{gap}}कवीनं लिहिलेलं ललितगद्य हा माझ्यासाठी नेहमीच भुवया उंचवायला लावणारा, विलक्षण कौतुकाचा आणि स्वागताई प्रकार असतो.<br>{{gap}}विंदा करंदीकर, आरती प्रभु, ग्रेस यांनी ललितगद्य लिहिले नसते तर?<br>{{gap}}पाडगावकरांनी आपली सगळी शक्ती कवितेतच पणाला लावली आणि खर्चुन टाकली. या कवीने 'निंबोणीच्या झाडामागे' लिहून काय उपयोग? पु. ल. देशपांडे या कवीने अजिबात कविता न लिहिता सगळी शक्ती ललित गद्यावर पणाला लावली. मराठीचे सर्वश्रेष्ठ ललितगद्यकार तर ते आहेतच पण प्रवासवर्णन, व्यक्तिचित्र, विनोद आदी सर्व शक्यतांना कवेत घेणारी महान अशी त्यांची प्रतिभा होती. आणि पु. लं. एवढे कवितेवर कुणी प्रेम केले आहे काय?<br>{{gap}}प्रखर तरीही तरल वैचारिकता आणि काव्यप्रतिभा या दोन गोष्टी एकाच संवेदनस्वभावात असणाराच श्रेष्ठ दर्जाचं ललितगद्य लिहू शकतो. प्रवासवर्णनात ते प्रवासस्थल निमित्त मात्र असते; व्यक्तिचित्रात ती व्यक्ती काय आहे या पेक्षा चित्रण करणाराला काय भावले हे महत्त्वाचे असते आणि परम कारुणिक असल्याशिवाय परिहासात्मक, सदअभिरुचीसंपन्न विनोद संभवत नाही. चि. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, माधव आवचट, मधुकर केचे, ग्रेस, गो. वि. करंदीकर, चि. त्र्यं. खानोलकर यांच्या प्रतिभेत ललितगद्याच्या सुंदर शक्यतांचा प्रदेश कवेत घेण्याची ताकद होती. मंगेश पाडगावकर, कुठे तरी कमी पडले. रमेश मंत्री, महेश एलकुंचवार, यांच्या संवेदनस्वभावात कणभर कविश्व नव्हते. म्हणून त्यांचे ललितगद्य यशस्वी होऊ शकले नाही.<br>{{gap}}महान ललित गद्य लिहिले जाण्याची उपरोक्त सर्वच्या सर्व कारणे डॉ. शैला लोहिया यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वात आणि संवेदनस्वभावात उपस्थित आहेत.त्यांच्या<noinclude>{{Right|रुणझुणत्या पाखरा / सात}}</noinclude> fs8evinp1c58qz1nchbq06tz1foqgus पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९ 104 70980 155773 2022-08-17T07:40:07Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>सामाजिक कार्याची विशेषतः 'मानवलोक' या सेवाभावी संस्थेच्या द्वारा त्यांनी केलेल्या समाजसेवेची कीर्ती जगभर पसरली आहे. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार पचवलेल्या त्या कर्त्या सुधारक आहेत. याला जोडून त्या प्रकृतीने ललित लेखिका आहेत. लोकसाहित्याच्या गाढ्या व्यासंगाने त्यांच्या सगळ्याच लेखनाला एक लोकतत्त्वीय परिमाण प्राप्त झालेले आहे. मुख्यम्हणजे त्या भारीच्या कवयित्री आहेत. 'सिटीझन आर्टिस्ट' ही महान आणि समाजसन्मुख प्रतिभावंतासाठी वापरली जाणारी संज्ञा ही खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठीच योजिता येईल. प्रखर वैचारिकता हे त्यांच्या लेखनात सर्वत्र जाणवणारे सूत्र आहे. त्यामुळे विचार आणि कवितेच्या संयोगातून आलेले 'रुणझुणत्या पाखरा' या संग्रहातील ललित गद्य, ललित गद्याच्या सर्व महान आणि सुंदर शक्यतांचा प्रदेश कवेत घेऊनच आपल्या समोर ठाकले आहे.<br>{{gap}}'संक्रांत... प्रकाशपर्व' या लेखात बालपणीची संक्रांत उमटते. समाजवादी घर, देवघर, देवपूजा वा कर्मकांड नाही. पण सणानिमित्त गोडधोड खायला मिळे संक्रांतीचे साखरतीळ ऊर्फ हलवा करण्याच्या घरोघरच्या पद्धती, फसलेल्या काटे न आलेल्या साखरतीळांची चेष्टा, कुचेष्टा. तेराव्या वर्षापर्यंत नवरात्र आपटे आजी कुमारिका म्हणून सन्मान करायच्या. मग याच वर्षी का नाही बोलवलं हा बालसुलभ प्रश्न प्रौढांना अर्थ सुचवून जातो. समाजजीवनाचा धांडोळा असा प्रत्येक लेखात स्वाभाविकपणे घेतला जातो. 'अक्षरांना अर्थ देऊन' मध्ये तेजस्वी 'महा-तारे' प्रेरणा देऊन जातात. 'हे स्वरांनो गंध व्हा रे' मध्ये बालकामगारांचे प्रश्रोपनिषद कासावीस बनवते, अस्वस्थ करून टाकते.<br>{{gap}}कविवर्य भा. रा. तांब्यांनी तरुणपणी उत्कट प्रेम कविता तर लिहिलीच; पण वृद्धपणीदेखील प्रेमाविषयी त्यांना वाटणारे कौतुक, अप्रुप संपले नाही. डॉ. शैला लोहियांनी क्रांतिकारी असा प्रेमविवाह केला (याही अर्थाने त्या कर्त्यासुधारक) पण आज साठीनंतरही त्या प्रेमाचा, प्रेम विवाहाचा किती उत्साहाने पुरस्कार करतात आणि त्या मागची वैचारिक भूमिका सूचीत करतात ते 'प्रेम, धर्म, बांधीलकी', 'तू ऐल राधा,' 'थंडी, थंडी... थंडी,' किंवा 'आषाढाचा पहिला दिवस' या लेखांतून वाचण्यासारखे आहे. एकदा राधेला कुतूहलाने म्हणा, मत्सराने म्हणा रुक्मिणी सत्यभामांनी घरी बोलावलं. तिथे पाय धुवून, त्यावर चंदन कुंकुम रेखून, वस्त्र देऊन पाठवले. मात्र पाणी उकळते वापरले. राधेला काही फरक पडला नाही. परंतु त्या रात्री कृष्ण घरी परतला तो लंगडत लंगडतच त्याच्या पायावर पोळल्यामुळे मोठे फोड आले होते. ही सुंदर कथा मी<noinclude>{{rh|आठ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 70fmyue24us1t0vidvyeahp5c4jd80z पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१० 104 70981 155774 2022-08-17T07:45:01Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>या ललितगद्यातच प्रथम वाचली आणि विलक्षण प्रभावित झालो. असे प्रभावित करणारे, झपाटून टाकणारे अधूनमधून सारखे या लेखांतून भेटेल.<br>{{gap}}ट्रंकेच्या बुडाशी एखादी अत्तराची कुपी जपून ठेवावी तशा डॉ. शैला लोहियांनी माहेरच्या आठवणींना जोपासले आहे. राष्ट्रीय भावनेने ओथंबलेले माहेर सूत कातणारे, खादी वापरणारे आईवडील. साने गुरुजी, एस. एम. जोशी, डॉ. राम मनोहर लोहिया, बॅ. नाथ पै, जयप्रकाश यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या लेखिकेचा खरंच हेवा वाटावा. त्यांची समृद्ध वैचारिक जडणघडण झाली ती या सर्वांच्या चर्चा ऐकून. ही वैचारिकताच त्यांच्या संवेदनस्वभावाचा अविभाज्य घटक झाली आहे. इतकेच नाही तर गेल्या तीस पस्तीस वर्षांच्या सगळ्या महान चळवळीत आणि आंदोलनात लेखिकेने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. त्यांचे पडघम या लेखांतून अनुभवता येतात. बंगलोर येथे २८ जानेवारी १९९५ रोजी झालेल्या 'जनसुनवाई' बहुएका 'जखमी झाडांच्या साक्षी ऐकताना' हा ललितलेख शीर्षकापासून अंतरंगापर्यंत वेधक आहे. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या, विलक्षण अस्वस्थ करून टाकणाऱ्या अनुभवकथनांचा समारोप करताना त्या लिहितात, जनसुनवाईचा कार्यक्रम संपला होता. आता प्रत्येकीच्या देहात 'मनसुनबाई' सुरू होती. भूमिकन्या भवरीबाई, हा लेख तर विलक्षण जीवन, थरारक अनुभव अनोखे व्यक्तित्व लाभलेले भंवरीबाई हा लेख वाचणारे जन्मभर विसरू शकणार नाहीत. सेवा दलाचे 'महाराष्ट्र दर्शन' असेच प्रेरणादायी, चैतन्यमय अनुभूती देणारे. 'इंद्रदिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना' या श्रेणीमधले लेखिकेने अनुभवलेले असे अनेक मंतरलेले दिवस विलक्षण प्रत्ययकारित्वासह या संग्रहात अवतीर्ण झाले आहेत.<br>{{gap}}या संग्रहात काही भावोरकट व्यक्तिचित्रंही आहेत. बाबा आमटे (त्र्याण्णव वर्षाच्या तरुणाकडून ऊर्जा चेतवून घेताना), वसंत बापट (हारवलेला वसंत), भास्कर चंदनशिव (फुलता मळा सतत बहरत राहो), साने गुरुजी (जून महिना आला की...), अनंत भालेराव (माहेरचा खोपा), महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सर्वांना माहीत असणारी ही नाव असली तरी त्यांचे वस्तुनिष्ठ चित्रण करण्याचा इथे प्रश्नच येत नाही. या व्यक्तिरेखा लेखिकेच्या अनुभवांगाचा भाग म्हणूनच साकारताना दिसतात. निवेदक 'मी' चा त्यांना झालेला अनुभव स्पर्श या व्यक्तिरेखांना वेगळी परिमाणे प्राप्त करून तर देतोच. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे असते ते त्यांतून सूचित होणारा लेखिकेचा जीवन विषयक दृष्टिकोन अनुभवणे विचारांचे एक सुंदर अस्तर याही, पटाला असतेच.<br><noinclude>{{Right|रुणझुणत्या पाखरा/ नऊ}}</noinclude> 9zk6lt4pyr0n884povxw8jsdaz5s2gv पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/११ 104 70982 155775 2022-08-17T07:50:35Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}ज्या कारणासाठी आपण डॉ. शैला लोहियांना 'सिटिझन आर्टिस्ट' म्हणून गौरविले तो सामाजिक कार्यकर्तीचा त्यांचा पिंड या पुस्तकात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा असा ललितलेखांचा विभाग होऊन येतो. शैला लोहिया ग्रामीण, दलित, परित्याक्ता, अन्यायपीडित महिलांसाठी कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कार्यकर्त्या आहेत. त्याच्यातला पीर पराई जाणणारा वैष्णवजन हे स्वतंत्र वहिरवातं नसून लेखक, कवी म्हणून असणाऱ्या संवेदनस्वभावाचा तो एक अविभाज्य घटक आहे. 'आला श्वास, गेला श्वास... एक भास' 'धोबीका कुत्ता', 'आमच्यातलं माणूसपण कमी होतय का?', 'हे विठुराया', 'आपणच लिहूया नवी कहाणी', 'सुफळ गोष्टी', 'सुभगा सावित्री,' 'आम्ही बाया', किती तरी अशा राणी' हे लेख वाचताना तीव्रतेने जाणवले की अशा स्वरूपाचं लेखन हे हजार वर्षाच्या मराठी साहित्याच्या परंपरेने कुणीही केलं नाही. हे लेख वाचल्याच्या रात्री तुम्हांला झोप येणार नाही. विलक्षण अस्वस्थ करून टाकण्याचं सामर्थ्य या लेखांत आहे. सौंदर्य माणसाला अस्वस्थ करतं आणि श्रेष्ठ दर्जाच्या सौंदर्यात माणसाला अस्वस्थ करतं आणि श्रेष्ठ दर्जाच्या सौंदर्यात माणसाला अधिकच अस्वस्थ करण्याचं सामर्थ्य असतं असं गुरुवर्य वा. ल. कुळकर्णी म्हणायचे. ते असं का म्हणायचे याच प्रत्यंतर देणारे असे हे लेख आहेत. कारण ते एका महान सिटीझन आर्टिस्टच्या लेखणीतून उतरले आहेत. कळवळ्याची ही महान जाती आपल्पाएरा जीवनाचे जे दर्शन घडवते ते खरोखर अस्वस्थ करून टाकणारे असते.<br>{{gap}}डॉ. शैला लोहिया हे अत्यंत संपन्न, विदग्ध असं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे या लेखांचा सर्वांगांनी आस्वाद घ्यायला आपली रसिकताही चोखंदळ आणि विभिन्ननुगामी असावी लागते. ते एकेरी असेल तर हत्ती आणि दहा अंधळ्यांच्या गोष्टीला एखादा आंधळा व्हायची वेळ आपल्यावर यायची! हे लेख कळायला तुम्हांला प्राचीन, आधुनिक आणि लोकसाहित्याचे सूक्ष्म वाचन असावे लागते, समकालीन सामाजिक वास्तवाचे प्रखर भान असावे लागते, स्त्रीवाद आणि स्त्रियांच्या प्रश्नांची गुंतागुंत ज्ञात असावी लागते, बदलते आणि अजूनही न बदललेले खेडे माहिती असावे लागते. अनवट गाणाराला साथ करताना वादळांची भंबेरी उडावी तसे काहीसे सामान्य आणि एक पेडी वाचकांचे हे लेख वाचताना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.<br>{{gap}}प्रस्तुत संग्रहात प्रवासवर्णनपर लेखांचाही एक मोठा विभाग आहे. 'भरदुपारी घनगर्द रानात', 'बीजिंगने दिलेला मंत्र रुजतोय का समाजवादी 'समुद्र आणि समूह',<noinclude>{{rh|दहा / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> d654w2mh7i6lzaky33bk5fdxmim6uj6 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२ 104 70983 155776 2022-08-17T07:54:13Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>'सात बहिणींच्या तनामनापर्यंत', कविताच ती...' 'कुलाई खोरे: देवभूमी,' 'अनाघ्रात समुद्रानुभव' या आणि अशा स्वरूपाच्या प्रवासवर्णनांत आपण त्या त्या स्थलप्रदेशांची नवी माहिती किंवा तिथला इतिहास समजून घ्यायचा नसतो. तर त्या त्या स्थलप्रदेशाचे व्यक्तिमत्त्व आणि त्याला भेट देणाऱ्या डॉ. शैला लोहियांचे व्यक्तिमत्त्व यांच्यातील अद्वैत साधणारी अनुभवविशिष्टतां अनुभवायची असते. या प्रकारच्या ललितगद्यांत प्रवासकालीन अनुभवांचा स्मृतिरुप संस्कार जागवून स्थलप्रदेशाचे भावचित्र आकाराला येते तेव्हा स्वाभाविकपणे डॉ. शैला लोहियांच्या अनुभूतीला त्या त्या स्थलप्रदेशाच्या वस्तुनिष्ठ वर्णनापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होते. डॉ. शैला लोहियांनी आपल्या प्रवासवर्णनपर लेखांचे स्वतंत्र पुस्तक केले पाहिजे इतके ते पृथगात्म आणि महत्त्वाचे आहेत एवढेच सुचवून ठेवतो.<br>{{gap}}उर्दूत गझल मधील सर्वात आवडलेल्या शेराला हासिले गझल शेर म्हणतात. 'पुनव... पौर्णिमा', 'विधिव्रतांतली सामूहिकता', 'हिंदू जीवनदृष्टी', 'भादवाः कृषी समृद्धीचा', 'राखी: एक बंधन', 'आई म्हणोनी कोणी', 'पापड कुरुड्यांचे दिवस', 'दीपोत्सव', 'भूमिकन्या', 'दशम्या धपाट्याच्या चवींची वेळा आवस', 'रंगवल्ली... रांगोळी', 'घट' हे या संग्रहातले हासिले गझल शेर आहेत. अक्षरशः नादावून टाकले त्यांनी मला. पण त्याच बरोबर हेही जाणवले की त्यांचा आनंद कसा घ्यायचा हे समजून सांगायला दुर्गा भागवत किंवा द. ग. गोडसे हवे होते. किंवा आत्ताच्या आता हे लेख घेऊन डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. तारा भवाळकर किंवा डॉ. तारा परांजप्यांकडे जावे आणि या लेखांचे कौतुक त्यांच्या कडून ऐकावे.<br>{{gap}}संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला ताजमहाल पाहून आल्यासारखे होते. यातल्या व्यक्ती, स्थळ, विचार, लोकसाहित्य धूसरपणे आठवत राहते पण आपल्या मनात वेगळंच चांदणे पडलेले असते. ते असते डॉ. शैला लोहियांच्या संवेदनशीलतेचे, त्यांच्या विचारांचे, त्यांच्या काव्यात्म प्रतिभेचे. आपल्या नकळत आपल्यावरचा ताबा या लेखांनी काढून घेतलेला असतो. उत्कृष्ट कलाकृतीकडून आणखी कोणती अपेक्षा करायची असते?<br> {{Right|'''- प्रा. विश्वास वसेकर'''}}<noinclude>{{Right|रुणझुणत्या पाखरा /अकरा}}</noinclude> n26w2o0mqg0f8ljxxrybtdnhdz4ms7t