विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
पान:आलेख.pdf/81
104
65241
155596
121219
2022-08-08T12:07:22Z
Sunita prakash gambhir
4297
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br>
<br>
<br>
<br>
<br>
{{gap}}हरिभाऊ हे यशस्वी ऐतिहासिक कादम्बरीकार म्हणून मान्यता पावले{{nop}}
आहेत. त्यांची ऐतिहासिक कादंबरी ही अद्भुतता आणि वास्तवता यांच्या{{nop}}
मधील दुवा साधणारी आहे. अद्भुत रम्यतेच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी ऐतिहासिक{{nop}}
कादंबरी लिहिली. त्यामुळे ती जास्त आकर्षक ठरली आहे. अत्यंत मर्यादित असे{{nop}}
ऐतिहासिक साधन असून सुद्धा त्यांना सुयश मिळाले; मात्र ऐतिहासिकतेला त्यांच्या{{nop}}
कादंबऱ्यात दुय्यम स्थान आहे.{{nop}}
{{gap}}त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीतील वातावरण निर्मितीची किमया अपूर्व आहे.{{nop}}
आपण प्रत्यक्ष त्या वातावरणातच वावरत आहोत. असा भास निर्माण होतो इतके{{nop}}
ते वातावरण यशस्वी आणि उठावदार करतात.{{nop}}
{{gap}}हरिभाऊंचे यश हे त्यांनी चित्रित केलेल्या तत्कालीन समाजाच्या विहंगम{{nop}}
दृष्यात आहे. त्यांचे या बाबतचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या काळांतील विचा-{{nop}}
रांच्या धाग्याचेच प्रतिपादन केलेले आहे. स्वतःच्या जीवनांतील केलेल्या प्रति-{{nop}}
पादनातच त्यांचे सामाजिक यश आहे. कलादृष्टी आणि सामाजिक दृष्टी यांचे{{nop}}
मनोज्ञ एकीकरण त्यांच्या कादंब-यात दृष्टोत्पत्तीस येते. ह्यामुळेच त्यांच्या कादं-{{nop}}
बऱ्या ह्या कला दृष्ट्या श्रेष्ठ दर्जाच्या ठरतात.{{nop}}
{{gap}}हरिभाऊंच्या कादंबऱ्या जुनाट वाटतात हेही त्यांच्या मोठेपणाचेच गमक{{nop}}
आहे. कारण त्यांचे चित्रण यशस्वी आहे जिवन्त आहे; म्हणून आज ते जुनाट वाटणे{{nop}}
सहाजिकच आहे.{{nop}}
<br>
<br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}x x x
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७४<noinclude></noinclude>
0it9xth3j1c0a7xqmuey62hoh7qro49
पान:आलेख.pdf/82
104
65242
155597
121220
2022-08-08T12:22:03Z
Sunita prakash gambhir
4297
/* तपासणी करायचे साहित्य */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
{{x-larger|'''तोन'''}}{{gap}}{{gap}}{{x-larger|'''टिपा अकरा'''}}{{nop}}
<br>
<br>
<br>
एक: मराठी साहित्यातील कर्ण{{nop}}
७५ प्रा. सुशीला पाटील यांनी २६ मे १९७३ ते १६ ऑक्टोंबर १९७३ या{{nop}}
कालावधीत 'औज' साप्ताहिकातून प्रकाशित केलेली महाभारतातील कर्ण विषयक{{nop}}
साहित्यावरील लेखमाला म्हणजे 'मराठी साहित्यातील कर्णं' हे पुस्तक होय. १९५१{{nop}}
पासून १९७१ या वीस वर्षाच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या कर्ण विषयक संशोध-{{nop}}
नात्मक, ललित गद्यात्मक, चरित्रपर, कादंबरी, नाटक, सामाजिक भौतिक दृष्टीतून{{nop}}
लिहिलेले, चिंतनपर अशा विविध स्वरूपी साहित्याचा विशिष्ट दृष्टिकोणातून{{nop}}
मूल्यमापनाचा प्रयत्न केला आहे. प्रा.सुशीला पाटील यांनी स्वीकारलेला दृष्टिकोण{{nop}}
हा परंपरागत शुद्ध महाभारतीय आहे असे म्हणता येईल.{{nop}}
७५ प्राचार्य अ. दा. आठवले, डॉ. रा. शं. वाळिंबे, बाळशास्त्री हरदास यांच्याशी{{nop}}
मिळताजुळताच लेखिकेचा दृष्टिकोण आहे. एकदा स्वीकारलेल्या गृहितांशी, दृष्टि{{nop}}
कोणाशी इमान राखून त्यांनी आपले मूल्यमापन सादर केले आहे हे लेखिकेचे{{nop}}
अभिनंदनीय यश आहे.{{nop}}
७५ पण त्यांनी स्वीकारलेला दृष्टिकोण हा कर्णविषयक सर्वच साहित्यकृतींना{{nop}}
एकाच मापाने मोजणारा असल्यामुळे त्यांचे गृहीत सर्व साहित्यकृतींना न्याय देऊ{{nop}}
शकले असे वाटत नाही.{{nop}}
७५ अललित किंवा वैचारिक चिंतनपर समीक्षणात्मक जन्माला आलेल्या साहि-{{nop}}
त्याचा- उदा० बाळशास्त्री हरदास यांचा व्याख्यान ग्रंथ, आनंद सांधले यांचा 'हा{{nop}}
<br>
<br>
आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७५<noinclude></noinclude>
71ylm5sof7fts8fk038lm5tzqywlfh0
155598
155597
2022-08-08T12:27:04Z
Sunita prakash gambhir
4297
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br>
<br>
<br>
<br>
<br>
<br>
{{x-larger|'''तोन'''}}{{gap}}{{gap}}{{x-larger|'''टिपा अकरा'''}}{{nop}}
<br>
<br>
<br>
'''एक:''' '''मराठी साहित्यातील कर्ण'''{{nop}}
<br>
{{gap}}प्रा. सुशीला पाटील यांनी २६ मे १९७३ ते १६ ऑक्टोंबर १९७३ या{{nop}}
कालावधीत 'औज' साप्ताहिकातून प्रकाशित केलेली महाभारतातील कर्ण विषयक{{nop}}
साहित्यावरील लेखमाला म्हणजे 'मराठी साहित्यातील कर्णं' हे पुस्तक होय. १९५१{{nop}}
पासून १९७१ या वीस वर्षाच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या कर्ण विषयक संशोध-{{nop}}
नात्मक, ललित गद्यात्मक, चरित्रपर, कादंबरी, नाटक, सामाजिक भौतिक दृष्टीतून{{nop}}
लिहिलेले, चिंतनपर अशा विविध स्वरूपी साहित्याचा विशिष्ट दृष्टिकोणातून{{nop}}
मूल्यमापनाचा प्रयत्न केला आहे. प्रा.सुशीला पाटील यांनी स्वीकारलेला दृष्टिकोण{{nop}}
हा परंपरागत शुद्ध महाभारतीय आहे असे म्हणता येईल.{{nop}}
{{gap}}प्राचार्य अ. दा. आठवले, डॉ. रा. शं. वाळिंबे, बाळशास्त्री हरदास यांच्याशी{{nop}}
मिळताजुळताच लेखिकेचा दृष्टिकोण आहे. एकदा स्वीकारलेल्या गृहितांशी, दृष्टि{{nop}}
कोणाशी इमान राखून त्यांनी आपले मूल्यमापन सादर केले आहे हे लेखिकेचे{{nop}}
अभिनंदनीय यश आहे.{{nop}}
{{gap}}पण त्यांनी स्वीकारलेला दृष्टिकोण हा कर्णविषयक सर्वच साहित्यकृतींना{{nop}}
एकाच मापाने मोजणारा असल्यामुळे त्यांचे गृहीत सर्व साहित्यकृतींना न्याय देऊ{{nop}}
शकले असे वाटत नाही.{{nop}}
{{gap}}अललित किंवा वैचारिक चिंतनपर समीक्षणात्मक जन्माला आलेल्या साहि-{{nop}}
त्याचा- उदा० बाळशास्त्री हरदास यांचा व्याख्यान ग्रंथ, आनंद सांधले यांचा 'हा{{nop}}
<br>
<br>
आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७५<noinclude></noinclude>
azqt4a5gqk8hnc3mgja7bkfw7t2wzp0
पान:आलेख.pdf/83
104
65243
155599
121221
2022-08-08T12:48:45Z
Sunita prakash gambhir
4297
/* तपासणी करायचे साहित्य */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br>
<br>
<br>
<br>
जय नावाचा इतिहास आहे', शं के पेंडसे यांचे 'महाभारतातील व्यक्तिदर्शन'{{nop}}
डॉ. रा. शं. वाळिंबे यांचे 'राधेय कर्ण' इत्यादी साहित्याचा त्याची प्रकृती लक्षात{{nop}}
घेऊन विचार व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे श्री. वि. वा. शिरवाडकरांचे 'कौंतेय',{{nop}}
दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व', गो. नी. दांडेकरांचे 'कर्णायन', इरावती कर्वे यांचे{{nop}}
'युगांत', शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय', आनंद साधले यांची 'महापुरुष' या{{nop}}
ललितकलाकृतींना, ललित कलाकृतीच्या प्रतिज्ञेतून अवतरलेल्या ललितकृती म्हणून{{nop}}
काही वेगळा न्याय देता येतो का हे पाहाणे आवश्यक होते. कारण प्रेमा कंटक यांचे{{nop}}
'महाभारता: एक मुक्त चिंतन' आणि प्राचार्य आठवले यांचे 'महाभारतातील वास्त-{{nop}}
वदर्शन' यांची आणि शिवाजीराव सावंतांच्या 'मृत्युंजया'ची प्रकृती मूलतः भिन्न{{nop}}
आहे. ललितलेखकाचे स्वातंत्र्य आणि ललितकृतीचे वेगळेपण लक्षात घेतले म्हणजे {{nop}}
त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेप घेता येणार नाहीत.{{nop}}
{{gap}}प्रा.सुशीला आठवले यांच्या विवेचनात १९७१ नंतरची कर्णविषयक साहित्य{{nop}}
संपदा नाही. त्यात म. रं. शिरवाडकर यांचे 'हस्तिनापूर' रणजित देसाई यांचे{{nop}}
'राधेय', विजय देशमुख यांचे 'सूर्यपुत्र', कै. मधु भोसले यांचे 'जीवनभास' या{{nop}}
लेखताचा समावेश होतो. त्यांच्या अभ्यास कक्षेत ती घेतलेली नसली तरी बाळ{{nop}}
शास्त्री हरदासांचे 'महारथी कर्ण' आणि कै. बा. सी. मर्ढेकर यांची 'कर्ण' ही संगी{{nop}}
तिका (नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका) यांचा समावेश आवर्जून व्हायला हरकत{{nop}}
नव्हनी.{{nop}}
{{gap}}महाभारताकडे पाहाण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण आहेत आणि ते अटळ अस{{nop}}
णारच असेच महाभारताचे स्वरूप आहे. पौराणिक ललित कृतींच्या निर्मितीमध्ये{{nop}}
पौराणिक वास्तवाला जिवंत करून मानवीमनाचे आणि जीवनाचेच दर्शन अभिप्रेत{{nop}}
आहे. तिथेही कर्णातील 'माणसा'चाच शोध घ्यायचा असतो. यादृष्टीने कर्ण विषयक{{nop}}
ललितकृतींवर आक्षेप न घेता ते स्वतंत्र भाष्यकार आहेत. कर्णच्या व्यक्तिरेखेच्या {{nop}}
निमित्ताने ते स्वानुभूती कलात्म पातळीवरून अभिव्यक्त करतात किंवा नाही हा{{nop}}
महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक कलावंताच्या मनात शिरते, त्याला प्रतीत होते{{nop}}
जाणवते, तीच त्याची व्यक्तिरेखा असते. रणजित देसाई 'राधेय'च्या प्रस्तावनेत{{nop}}
म्हणतात त्या प्रमाणेच 'प्रत्येकाच्या मनात एक कर्ण दडलेला असतो. त्यासाठी{{nop}}
महाभारताची पाने उलटण्याची आवश्यकता नाही आपल्या मनाची चार पाने उल-{{nop}}
टलीत तरी चालतील' वस्तुस्थिती असते. कथा, घटना-प्रसंग आणि त्यांतून मनात{{nop}}
शिल्लक राहाणारी व्यक्ती ही शेवटी रसनिर्मिती काव्यगत भावनिर्मितीची 'आलंबन'{{nop}}
च असते. कथा अभिनयनानेच विभावनानुकूल बनते. तेव्हा ललित कलाकृतींना{{nop}}
महाभारताला धरून आणि महाभारताला सोडून असे तपासण्याची ही एक रीत{{nop}}
आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७६<noinclude></noinclude>
m8uyh74xcpweu2773ks8v1bjg6a47tw
155600
155599
2022-08-08T12:49:29Z
Sunita prakash gambhir
4297
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Sunita prakash gambhir" /></noinclude><br>
<br>
<br>
<br>
जय नावाचा इतिहास आहे', शं के पेंडसे यांचे 'महाभारतातील व्यक्तिदर्शन'{{nop}}
डॉ. रा. शं. वाळिंबे यांचे 'राधेय कर्ण' इत्यादी साहित्याचा त्याची प्रकृती लक्षात{{nop}}
घेऊन विचार व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे श्री. वि. वा. शिरवाडकरांचे 'कौंतेय',{{nop}}
दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व', गो. नी. दांडेकरांचे 'कर्णायन', इरावती कर्वे यांचे{{nop}}
'युगांत', शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय', आनंद साधले यांची 'महापुरुष' या{{nop}}
ललितकलाकृतींना, ललित कलाकृतीच्या प्रतिज्ञेतून अवतरलेल्या ललितकृती म्हणून{{nop}}
काही वेगळा न्याय देता येतो का हे पाहाणे आवश्यक होते. कारण प्रेमा कंटक यांचे{{nop}}
'महाभारता: एक मुक्त चिंतन' आणि प्राचार्य आठवले यांचे 'महाभारतातील वास्त-{{nop}}
वदर्शन' यांची आणि शिवाजीराव सावंतांच्या 'मृत्युंजया'ची प्रकृती मूलतः भिन्न{{nop}}
आहे. ललितलेखकाचे स्वातंत्र्य आणि ललितकृतीचे वेगळेपण लक्षात घेतले म्हणजे {{nop}}
त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेप घेता येणार नाहीत.{{nop}}
{{gap}}प्रा.सुशीला आठवले यांच्या विवेचनात १९७१ नंतरची कर्णविषयक साहित्य{{nop}}
संपदा नाही. त्यात म. रं. शिरवाडकर यांचे 'हस्तिनापूर' रणजित देसाई यांचे{{nop}}
'राधेय', विजय देशमुख यांचे 'सूर्यपुत्र', कै. मधु भोसले यांचे 'जीवनभास' या{{nop}}
लेखताचा समावेश होतो. त्यांच्या अभ्यास कक्षेत ती घेतलेली नसली तरी बाळ{{nop}}
शास्त्री हरदासांचे 'महारथी कर्ण' आणि कै. बा. सी. मर्ढेकर यांची 'कर्ण' ही संगी{{nop}}
तिका (नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका) यांचा समावेश आवर्जून व्हायला हरकत{{nop}}
नव्हनी.{{nop}}
{{gap}}महाभारताकडे पाहाण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण आहेत आणि ते अटळ अस{{nop}}
णारच असेच महाभारताचे स्वरूप आहे. पौराणिक ललित कृतींच्या निर्मितीमध्ये{{nop}}
पौराणिक वास्तवाला जिवंत करून मानवीमनाचे आणि जीवनाचेच दर्शन अभिप्रेत{{nop}}
आहे. तिथेही कर्णातील 'माणसा'चाच शोध घ्यायचा असतो. यादृष्टीने कर्ण विषयक{{nop}}
ललितकृतींवर आक्षेप न घेता ते स्वतंत्र भाष्यकार आहेत. कर्णच्या व्यक्तिरेखेच्या {{nop}}
निमित्ताने ते स्वानुभूती कलात्म पातळीवरून अभिव्यक्त करतात किंवा नाही हा{{nop}}
महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक कलावंताच्या मनात शिरते, त्याला प्रतीत होते{{nop}}
जाणवते, तीच त्याची व्यक्तिरेखा असते. रणजित देसाई 'राधेय'च्या प्रस्तावनेत{{nop}}
म्हणतात त्या प्रमाणेच 'प्रत्येकाच्या मनात एक कर्ण दडलेला असतो. त्यासाठी{{nop}}
महाभारताची पाने उलटण्याची आवश्यकता नाही आपल्या मनाची चार पाने उल-{{nop}}
टलीत तरी चालतील' वस्तुस्थिती असते. कथा, घटना-प्रसंग आणि त्यांतून मनात{{nop}}
शिल्लक राहाणारी व्यक्ती ही शेवटी रसनिर्मिती काव्यगत भावनिर्मितीची 'आलंबन'{{nop}}
च असते. कथा अभिनयनानेच विभावनानुकूल बनते. तेव्हा ललित कलाकृतींना{{nop}}
महाभारताला धरून आणि महाभारताला सोडून असे तपासण्याची ही एक रीत{{nop}}
आलेख{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}७६<noinclude></noinclude>
o2ux6ev79sxbbft2h9oufjl7tl6hb2u
साचा:Username Change
10
70839
155601
2022-08-09T04:24:12Z
QueerEcofeminist
918
साचा
wikitext
text/x-wiki
<div style="display: flex; flex-wrap: wrap; justify-content: center; align-items: center; margin: 16px 0; border: 1px solid #aaaaaa;">
<div style="padding: 12px;">[[file:Global renamer-logo.svg|75px|link=[[m:Global rename policy]]]]</div>
<div style="flex: 1; padding: 12px; background-color: #dddddd; color: #555555;"> तुमचे सदस्यनाव विकिमिडीया मधील काही मुख्य(इंग्रजी विकिपिडीया, विकिकॉमन्स इ.) प्रकल्पांच्या धोरणात बसत नाही, विकिपीडियाचे सदस्यनाव वैश्विक असल्यामुळे तुम्हांला तुमचे नाव बदलण्याची विनंती केली जात आहे.
<div style="font-weight: bold; font-size: 150%; color: red; font-family: 'Comic Sans MS'"></div>
<div style="max-width: 700px">सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती [[विकिस्त्रोत:सदस्यनाव बदला]] येथे देण्यात आली आहे! या पानावरील माहिती लक्षात घेऊन येथे दिलेल्या दुव्यांवर जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. सदस्यनाव शक्यतो हलके फुलके व कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखावणारे किंवा गैर वाटेल असे नसावे. जाहिरातबाजी, अश्लिल, अपमानकारक, पदे/सत्ता दर्शवणारे असे कोणत्याही प्रकारचे नाव नसावे.
</div>
</div>
</div>
iogygjyk73vvg0lvfe7mbjwidiqjoyn
सदस्य चर्चा:Nitinskapare
3
70840
155602
2022-08-09T06:21:08Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Nitinskapare}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ११:५१, ९ ऑगस्ट २०२२ (IST)
cmsktalp4zjnmc49edvcl53vcxfg7k1
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१९
104
70841
155603
2022-08-09T06:41:58Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}जुने दिवस आठवीत श्रीनाथचा डोळा लागला होता.<br>{{gap}}एल.एल.बी. च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन आल्यावर बाई काकाजींनी त्याच्या विवाहाचा विषय छेडला. त्यावेळी त्याने स्वच्छ शब्दांत सांगून टाकले.<br>{{gap}}"काकाजी, मला लग्न करण्यात फारसा रस नाही. माझी वकिली अडल्यानडल्यांना न्याय मिळावा म्हणून असेल. मी इकडेच रहाणार आहे. सध्यातरी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाचे काम करायचे ठरवले आहे. माझ्या विचारांशी जिचे विचार जुळतात. जी माझी आर्थिक बाजूही थोडीफार सांभाळीत अशी मैत्रीण पत्नी म्हणून हवी आहे. अशी मुलगी मिळाली तर ठिक अन्यथा मी सडा फटींग राहीन...."<br>{{gap}}कान्तूदा, मला जमीन नको. आपल्या जमिनी नेहमीच तहानलेल्या.. भेगाळलेल्या तिची तहान कशी भागेल याचाच विचार माझ्या मनात सतत असतो. तुम्हीही जमिनीत खूप राबता. मला जमेल ती मदत जरून करीन मी.<br>{{gap}}... पण जमीन विकायला मात्र माझा विरोध राहील आणि हा विषय पुन्हा नका छेडू मनासारखी जोडीदार सापडली तर आपणहून तुम्हाला सांगीन.<br>{{gap}}त्यानंतर घरात हा विषय निघाला नाही.<br><br>{{gap}}अनू एम.ए. च्या शेवटच्या वर्षाला असताना वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. अनूच्या डोळ्यासमोर श्रीनाथहून वेगळी व्यक्ती जोडीदार म्हणून उभीच रहात नव्हती. अनूने आईजवळ मन मोकळे केले. अनूचे वडील नव्या वळणाचे. आर्थिक सुबत्तेत वाढलेली अनू या गावंढ्या परिसरात रमेल का, हा प्रश्न वडीलासमोर होता. लाडक्या अनूवर श्रीनाथ कोणतेच दडपण आणणार नाही ही एकच जमेची बाजू होती.<br>{{gap}}अनूचा निर्धार पाहून डॉक्टर साहेबांनी लेकीच्या लग्नाला संमती दिली. १९६७ च्या उन्हाळ्यात काही मित्रमंडळी, सेवादल, समाजवादी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांच्या साक्षीने अनुराधा पाठक आणि श्रीनाथ धानोरकर हे विवाहबध्द झाले. मोठा श्रीकांत त्याची पत्नी विमला, बाईने दिलेले गंठन आणि साडी घेऊन लग्नाला आले होते.<br>{{gap}}श्रीनाथने वकीलीचा मांड परळी सारख्या खेड्याचा चेहेरा असलेल्या गावात टाकला. परळी हे रेल्वेचे जंक्शन. इथून परभणी परळी मार्गे हैद्राबादला जाणारी ब्रॉडगेजवरून धावणारी मराठवाड्यातील एकमेव मोठी गाडी जाई. मनमाड-औरंगाबाद मार्गे परभणीहून निजामाबाद मार्गे हैद्राबादला जाणारी लहान गाडी असे. अर्थात ही<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / १९ </small>}}</noinclude>
675x7ce9tqgfevqt3g3q9b98oyx94m3
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२०
104
70842
155604
2022-08-09T06:45:49Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>निजामाची कृपा. परळीहून २२/२४ किलोमिटर्सवर असलेल्या डोंगरावर वसलेल्या आंब्याला निजामाच्या पदरी असलेल्या तैनाती फौजेचे ठाणे होते. योगेश्वरीचे पुरातन मंदिर तिथे आहे. जोगाईच्या आंब्याचे नाव निजामाने मोमिनाबाद असे ठेवले होते. जवळच्या धारूरला निजामाची टाकसाळ होती. तिथला किल्ला खूप जुना. त्यामुळेच परळीत रेल्वे आली. तेवढीच जमेची बाजू. त्यामुळे तिथे व्यापारही चांगला होता. भुईमुगाच्या शेंगाची मोठी बाजारपेठ होती. व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर. परळीत कोर्ट नसले तरी वकिलांची चलती होती. तेथील वकिल जवळच्या आंब्याला जात.<br>{{gap}}अनू प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली असल्याने आंब्याच्या विद्यानिकेतन महाविद्यालयात अध्यापिका म्हणून तात्काळ नोकरी मिळाली. मग परळी सोडून आंब्याला बिऱ्हाड मांडले. श्रीनाथ वकिली आणि विद्यार्थी संघटनात थोडा स्थिर झाला. मगच जनकचा जन्म झाला. अनू अध्यापन, भरपूर वाचन, लेखन, आल्या गेल्या कार्यकर्त्यांची आवभगत, जनक यात रमून गेला. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला एक वकिल म्हणून श्रीनाथचे नाव लोक घेत.<br>{{gap}}गेल्या तीन चार वर्षापासून पावसांच पंचांग बिघडलं होत. वेळेवर येण, जाण नाही, पाऊस आला तरी अपुरा. दुष्काळाच्या फेऱ्यामुळे खेड्यातला माणूस गांजलाय. हजारो माणसे हैद्राबाद, पुणे, मुंबई, सुरत या दूरदूरच्या भागात भाकरीसाठी पांगू लागली. त्यात व्यापारी, धान्य, तेल, डाळी, रॉकेल... यासारख्या रोजनरोज लागणाऱ्या वस्तू गायब करू लागले. चोरून.... मागच्या दाराने दाम-दुपटीने विकू लागले. भोवतालची खेडी ओस पडू लागली.<br>{{gap}}गेल्या काही वर्षात श्रीनाथच्या भोवती तरूणांचा चांगला गट तयार झाला होता. त्यात खेड्यातून कॉलेजमध्ये शिकायला आलेली मुल होती. नव्यान गावात आलेले काही अध्यापक, शिक्षक होते. त्यात एक मोहनसारखा उत्साही डॉक्टर होता. नव्यानेच पुण्यातील आयुर्वेद महाविद्यालयातून त्याने पदवी घेतली होती. त्याच्या आग्रहामुळे ही तरूण मुले आणि श्रीनाथ भाकऱ्या बांधून डोंगरात जात त्यातूनच दोन तीन खेड्यातील मुलांच्या आरोग्य तपासणीची कल्पना पुढे आली. दर रविवारी सर्वजण डोंगरातल्या खेड्यात जात. नारू सारख्या, पुस्तकातच सापडणाऱ्या रोगाचे रोगी तिथे भेटले. मोहनच्याच डोक्यातून लहान मुलांच्या आरोग्य तपासणीची कल्पना पुढे आली... तीन गावातील मुलांच्या तपासणीतून लक्षात आले की अनेक लहान<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २० </small>}}</noinclude>
dd43lor067vq498vwpqdnvbv7xh50jy
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२१
104
70843
155605
2022-08-09T06:59:11Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>मुलांना रात्री दिसत नाही. व्हिटॅमिन 'ए' ची कमतरता त्यांच्यात होती. डोंगरात गाजरं होत पण ती म्हशीला दूध वाढावं म्हणून घातली जात, पण मुलांना मात्र दिली जात नसे.<br>{{gap}}नव्या मित्रांमध्ये नव्या नव्या कामामध्ये श्रीनाथ बुडून गेला. घरात आला की अनूचा तनमन भरून सहवास. नवनव्या कादंबऱ्याचे कथानक, लेखकाच्या प्रतिभेची झेप अनू श्रीला सांगत असे. श्रीनाथ खेड्यातील लहान शेतकऱ्याची होणारी गुदमर पाहून हतबुध्द होई. बलुतेदारांपैकी अनेक जणांनी केव्हाच घराला कुलपे ठोकली होती. पाणी, सरपण, धान्य यासाठीही बायांना करावी लागणारी वणवण, बोडके होत जाणारे डोंगर...माळ. हे सारे अनुला सांगतांना त्याचे मन अस्वस्थ होई. पण तरीही आत... अगदी आत कुठे तरी वाटे की, अनूने खोलात जाऊन त्यांच्या बेसहारा जगण्याबद्दल विचारावे...<br>{{gap}}"... जनक, ये ना जवळ, मला ओळखलं नाहीस? पिल्लू... बेटा..." असं काही पुटपुटत अनूने कूस बदलली. तिला बहुदा जनकचे स्वप्न पडले असावे. ते झोपेतले अस्फुट शब्द ऐकून श्रीनाथ खूप अस्वस्थ झाला. अनूचा पीएच.डी.च्या अखेरच्या वळणावरचा अभ्यास, श्रीनाथच्या मागची धावपळ त्यामुळे दीड वर्षाच्या जनकला आई जळगावला घेऊन गेल्या होत्या. त्यालाही सहा महिने उलटून गेले होते. श्रीनाथचे डोळे भरून आले. त्याने अनूला अलगद जवळ ओढले. तिच्या माथ्यावर हळूवारपणे थोपटीत तो पुटपुटला...<br>{{gap}}अने, उद्याच जनकला भेटायला जाऊ आपण. आणि मीही येणार आहे तुझ्या बरोबर".... अनूला थोपटतांना मनाशी खूणगाठ बांधली. येणाऱ्या बाळाच्या नंतर कुटूंबवाढीला पूर्ण विराम. खरं तर पीएच.डी. नंतरच... पण होतात कधी कधी चुका माणसाच्या हातून. मनातल्या मनात हसत त्याने डोळे मिटून घेतले.<br>
{{Css image crop
|Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf
|Page = 21
|bSize = 369
|cWidth = 39
|cHeight = 29
|oTop = 444
|oLeft = 278
|Location = right
|Description =
}}<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २१ </small>}}</noinclude>
685j5jidbu6zufxrzzsw16nv6olc40w
155606
155605
2022-08-09T07:00:42Z
अश्विनीलेले
3813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>मुलांना रात्री दिसत नाही. व्हिटॅमिन 'ए' ची कमतरता त्यांच्यात होती. डोंगरात गाजरं होत पण ती म्हशीला दूध वाढावं म्हणून घातली जात, पण मुलांना मात्र दिली जात नसे.<br>{{gap}}नव्या मित्रांमध्ये नव्या नव्या कामामध्ये श्रीनाथ बुडून गेला. घरात आला की अनूचा तनमन भरून सहवास. नवनव्या कादंबऱ्याचे कथानक, लेखकाच्या प्रतिभेची झेप अनू श्रीला सांगत असे. श्रीनाथ खेड्यातील लहान शेतकऱ्याची होणारी गुदमर पाहून हतबुध्द होई. बलुतेदारांपैकी अनेक जणांनी केव्हाच घराला कुलपे ठोकली होती. पाणी, सरपण, धान्य यासाठीही बायांना करावी लागणारी वणवण, बोडके होत जाणारे डोंगर...माळ. हे सारे अनुला सांगतांना त्याचे मन अस्वस्थ होई. पण तरीही आत... अगदी आत कुठे तरी वाटे की, अनूने खोलात जाऊन त्यांच्या बेसहारा जगण्याबद्दल विचारावे...<br>{{gap}}"... जनक, ये ना जवळ, मला ओळखलं नाहीस? पिल्लू... बेटा..." असं काही पुटपुटत अनूने कूस बदलली. तिला बहुदा जनकचे स्वप्न पडले असावे. ते झोपेतले अस्फुट शब्द ऐकून श्रीनाथ खूप अस्वस्थ झाला. अनूचा पीएच.डी.च्या अखेरच्या वळणावरचा अभ्यास, श्रीनाथच्या मागची धावपळ त्यामुळे दीड वर्षाच्या जनकला आई जळगावला घेऊन गेल्या होत्या. त्यालाही सहा महिने उलटून गेले होते. श्रीनाथचे डोळे भरून आले. त्याने अनूला अलगद जवळ ओढले. तिच्या माथ्यावर हळूवारपणे थोपटीत तो पुटपुटला...<br>{{gap}}अने, उद्याच जनकला भेटायला जाऊ आपण. आणि मीही येणार आहे तुझ्या बरोबर".... अनूला थोपटतांना मनाशी खूणगाठ बांधली. येणाऱ्या बाळाच्या नंतर कुटूंबवाढीला पूर्ण विराम. खरं तर पीएच.डी. नंतरच... पण होतात कधी कधी चुका माणसाच्या हातून. मनातल्या मनात हसत त्याने डोळे मिटून घेतले.
{{Css image crop
|Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf
|Page = 21
|bSize = 369
|cWidth = 39
|cHeight = 29
|oTop = 444
|oLeft = 278
|Location = right
|Description =
}}<Br><noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २१ </small>}}</noinclude>
ft4lj926funcpn3v9qk4ufcj7fyzowp
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२२
104
70844
155607
2022-08-09T07:08:58Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|{{x-larger|'''२.'''}}}}<br>
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}<br>
{{gap}}गावाच्या उत्तरेला सातमाळाच्या बुटक्या डोंगराच्या काही रांगा सुन्नपणे एकाकी उभ्या. डोंगराच्या कपारीत मुकुंदराजाची समाधी आहे. वाणा नदीच्या अल्याड आहे. तिथे जायचे तर सव्वाशे ओबडधोबड पायरी उतरावी लागते. गेल्या चार वर्षात समाधीपाशी रोज दिवा लागतो की नाही ते स्वामीच जाणे. पायऱ्या सुरु होण्याआधी उमाठ्यावर विठोबा रखुमाईचे मंदिर आहे. समोर प्रशस्त बांधीव मंडप. मंदिराच्या तिनही बाजूने ओवऱ्या आहेत. मंदिराच्या बाहेर प्रशस्त जागा त्यालाही फरशी बसवली आहे. तिथेही बंदिस्त ओवऱ्या आहेत. अनेक वर्षापासून त्यांचा उपयोग धर्मशाळेसारखा होतो. चार बांधीव ऐसपैस खोल्यातून बुवांचे पखवाज वादनाचे गुरुकुल आहे. चार भांडीकुंडी बाडबिस्तरा बांधून हा परिसर सोडण्यापूर्वी अंकुशचे पाय समाधी आणि मंदिराकडे वळले, बुवांचे आणि एकतारी पहारा करणाऱ्या धामणेदादाचे दर्शन घेऊन तो दासोपंताच्या समाधीकडे जावू लागला. मनात विचाराचे भिरभिरं अवेळी सुटलेल्या वाऱ्यात जास्तच वेगानं फिरत होत. आता हा आपला परिसर कधी दृष्टीस पडणार, दासोपंतांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथल्या तिर्थावर तो टेकला. साखरे गुरुजींच्या जवळ डोंगरातली आठ दहा गावची शिकणारी पोर रहात. पहाटे पाचलाच उठावे लागे. उठायचे आणि तिर्थात अंघोळ करायला निघायचे. वाटेत लिंबाची नाहीतर बाभळीची कोवळी काडी चावून दात घासायचे. समाधीवरून रस्ता मुकुंदराजच्या समाधीकडे जातो. समोरच स्मशान आहे. तिथे गवऱ्याची राख असतेच गवरीचा आकार जळल्या राखेच्या रूपात शोधून खुणेने समाधी अल्याडच्या ओवरीतल्या कोनात ठेवायची. ती घेवून दात लख्खं घासायचे आणि तिर्थात उतरायचे. तिथले काळेशार कोमट पाणी त्यात डुंबताना मनही लख्ख होऊन जाई. पुन्हा<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २२ </small>}}</noinclude>
01a3hxek87mepk12gy6i3zi3pjduz2g
155608
155607
2022-08-09T07:09:39Z
अश्विनीलेले
3813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|{{x-larger|'''२.'''}}}}<br>
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}<br>
{{gap}}गावाच्या उत्तरेला सातमाळाच्या बुटक्या डोंगराच्या काही रांगा सुन्नपणे एकाकी उभ्या. डोंगराच्या कपारीत मुकुंदराजाची समाधी आहे. वाणा नदीच्या अल्याड आहे. तिथे जायचे तर सव्वाशे ओबडधोबड पायरी उतरावी लागते. गेल्या चार वर्षात समाधीपाशी रोज दिवा लागतो की नाही ते स्वामीच जाणे. पायऱ्या सुरु होण्याआधी उमाठ्यावर विठोबा रखुमाईचे मंदिर आहे. समोर प्रशस्त बांधीव मंडप. मंदिराच्या तिनही बाजूने ओवऱ्या आहेत. मंदिराच्या बाहेर प्रशस्त जागा त्यालाही फरशी बसवली आहे. तिथेही बंदिस्त ओवऱ्या आहेत. अनेक वर्षापासून त्यांचा उपयोग धर्मशाळेसारखा होतो. चार बांधीव ऐसपैस खोल्यातून बुवांचे पखवाज वादनाचे गुरुकुल आहे. चार भांडीकुंडी बाडबिस्तरा बांधून हा परिसर सोडण्यापूर्वी अंकुशचे पाय समाधी आणि मंदिराकडे वळले, बुवांचे आणि एकतारी पहारा करणाऱ्या धामणेदादाचे दर्शन घेऊन तो दासोपंताच्या समाधीकडे जावू लागला. मनात विचाराचे भिरभिरं अवेळी सुटलेल्या वाऱ्यात जास्तच वेगानं फिरत होत. आता हा आपला परिसर कधी दृष्टीस पडणार, दासोपंतांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथल्या तिर्थावर तो टेकला. साखरे गुरुजींच्या जवळ डोंगरातली आठ दहा गावची शिकणारी पोर रहात. पहाटे पाचलाच उठावे लागे. उठायचे आणि तिर्थात अंघोळ करायला निघायचे. वाटेत लिंबाची नाहीतर बाभळीची कोवळी काडी चावून दात घासायचे. समाधीवरून रस्ता मुकुंदराजच्या समाधीकडे जातो. समोरच स्मशान आहे. तिथे गवऱ्याची राख असतेच गवरीचा आकार जळल्या राखेच्या रूपात शोधून खुणेने समाधी अल्याडच्या ओवरीतल्या कोनात ठेवायची. ती घेवून दात लख्खं घासायचे आणि तिर्थात उतरायचे. तिथले काळेशार कोमट पाणी त्यात डुंबताना मनही लख्ख होऊन जाई. पुन्हा<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २२ </small>}}</noinclude>
r921wuyr3k07n9dei7ary32cxfb7p8l
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२३
104
70845
155609
2022-08-09T07:14:19Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>गुरुजींच्या वाड्यात येईस्तो उजाडलेले असे मग अभ्यास...<br>{{gap}}... अंकुशला सारे आठवत होते. जसेच्या तसे डोळ्यासमोर ते दिवस येत आणि आतल्या आत जीव गुदमरून जाई. डोळा कधी लागला ते कळलच नाही. मुंबईकडे धावणारी आगगाडी मात्र फुफाटत पुढे धावत होती.<br>{{gap}}"उठा उठा दादर मागे पडले. आवरा आत्ता ठेसन येईल. अंकुश आरे तुबी झोपलास का. उठ सहा वाजलेत." शिवादादा सगळ्यांना उठवत होते. "आवला... आवला. हुटा...हुटा. ठेसन जवळ आलंया. आन् बायांना गठुडी बांधाया सांगा आगुदर. त्यांचा लई कालवा असतो. आन गडी मानसाला बी घाई करा. लेकरांचे हात गच धराया सांगा, माईला त्यांच्या ही ममई हाये. लेकरू जरा का हातातून सुटलं... नजरेतून निसटल तर पुन्हा दिसायची खात्री न्हाई, ए संतुबाय, छगू आवला लवकर..." शिवादांदानी मानेवरचा गमछा नेहमीच्या सवयीने दोन्ही हातांनी मानेवर घसाघसा घासला आणि डोक्याला गुंडाळून त्याचे टोक शर्टात खोचीत ते सर्वांच्या अंगावर वसकू लागले. एक गचका देऊन आगीनगाडी स्टेशनवर थांबली.<br>{{gap}}'ये ठेसन आलं ग माय. आवला बिगी बिगी.' येसाक्काही सर्वांना घाई करू लागली.<br>{{gap}}चांगलच उजाडल होत. तरी ठेसनातल्या लाइटी भगभगत होत्या लांबलचक फलाट. गचागच् गर्दी. आंजा डोळे फाकुफाकू फलाटाकडे बघत होती. ती हलती झुलती गर्दी डोळ्यात मावत नव्हती.<br>{{gap}}'दम्मानं उतरा. हांगाश्शी ते गुठूड नीट धरा. आता गाडीला म्होरं पळायची घाई न्हाई. या ठेसनाला व्हीटी म्हंत्यात. अरी टाका की पेट्या.. गठ्ठडी खाली. मंग तुमी उतरा. असे काही म्हागामोलाचे डाग डागीने त्यात भरले हायेत?' शिवादादांनी बडबड सुरुच होती.<br>{{gap}}एक मोक्याची जागा हेरून दादांनी सगळ्या बायांना तिथे बसवले. सगळ्याचे सामान मधोमध जमा करून ठेवले. सामानावर नजर ठेवायला सांगून गडी माणसं चहा प्यायला आणि बायासाठी चहा आणायला गेली. छगू, संतू या लेकुरवाळ्या बायांनी निवांतपणी लेकर पदराखाली घेतली. बारक्या पोरांकडून शेजारच्या नळावरून पाणी आणलं. खळाळा गुळणी करून तिथंच फर्रर्र करून उडवली. बाजूने जाणारा एक माणूस रागाने पाहात निघून गेला.<Br><noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २३ </small>}}</noinclude>
021bxu2hm3n1vcz8bz6uo3jivuh12vf
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२४
104
70846
155610
2022-08-09T07:18:07Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"आत्ता माय, चुळ भरायची बी चोरी का या ममईत?" छबुच्या मनात आलं. त्यांनी ठेपा दिला होता त्याच्या शेजारीच भला मोठा चौकोन काळ्या चमकणाऱ्या गुळगुळीत दगडांनी बांधला होता. समोर पन्हाळ होती. त्या दगडातून तीन नळ बाहेर आले होते. त्याच नाक दाबल की खळाळा पाणी येई. ते पाणी पाहून सोनूला दूध पाजणाऱ्या आंजाचे डोळे लकाकले आणि शांतही झाले. एवढ पाणी पाहूनही डोळे गारवतात. तिला आठवली दगडवाडी. अंगाखांद्यावर लहान मोठे, मध्यम असे गुळगुळीत दगड गोटे घेऊन नांदणारी दगडवाडी. सोमठ्याहून चढाव सुरु होतो. तिथून वर पाहिलं तर नुस्ता दगडांचा गड दिसतो. वर चढून गेले की दगडवाडी. दगडवाडी उंचसखल भागात जमेल तशी वसली आहे. डोंगरापल्याडच्या उताराखालून निळाई नदी वाहते. निळाई कायम कोरडाईच. सूर्य उताराला लागला की डोंगर उतरून खाली यायचे. वाळू बाजूला सारून झिरपा लागेपर्यंत खड्डा करायचा. तिथे कायतरी खूण ठेवायची. दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत खड्डा पाण्याने भरून जाई. ते पाणी बिंदगीत, घागरीत भरून दरड चढून वर जायचे. चार पाच खेपा केल्या तर पिण्यापुरते पाणी मिळे. दगडवाडीतल्या बाया पाणी भरता भरता गळून जात. गावातली बुढी राणूमाय म्हणे, दगडवाडीत आडल्या नडल्याच्या लेकीच सुना म्हणून येणार. एक तर बापाच्या खिशात दमडा तरी नसणार किंवा पोरगी काळीबेंद्री तरी असणार. आंजाच्या मनात आले मी यापैकी कोणत्या वाणाची?... कोणत्या वाणाची?<br>{{gap}}दूध पिता पिता सोनू झोपून गेली होती. आंजानं शेजारीच पडलेल बाळूतं थोड झटकून खाली अंथरल आणि त्यावर सोनूला अलगद टाकलं. पातळ झटकित ती उभी राहिली आणि नळाकडे गेली. तोंडावर सपासपा गार पाण्याचे झपके मारले. कसं छान वाटलं. पौषातली गारेगार पहाट उजाडली की कसं वाटतं, तसंच. तिच्या माहेरच्या अंगणात बुचाचं उंच झाड होतं. त्या पांढऱ्या फुलांचा वास पौषातल्या सकाळला असायचा. तिचे लक्ष शेजारच्या मशिनकडे गेले. त्यालाही तीन नळ जोडलेले नळांना साखळीने बांधलेले इस्टीलचे ग्लास. त्या मशिनीतले पाणी तर खूपच गार होते. त्या मशिनवर लिहिलं होते 'पिण्याचे गार पाणी'.<br>{{gap}}कितीतरी दिवसानी अक्षरं वाचायला मिळत होती. भवतालच्या सगळ्या जाहीराती तिने वाचून काढल्या. एवढ्यात तिची नजर रंगीबेरंगी फुलांचा झगा घातलेल्या एका काळ्या ढुस्स बाईवर गेली. तिच्या झग्याला बाह्या नव्हता आणि झगाही जेमतेम<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २४ </small>}}</noinclude>
ai6p6tcpzxco3q1vdo6x2mbvz4raq4q
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२५
104
70847
155611
2022-08-09T07:26:40Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>मांड्यापर्यंत पोचेल असा. ओठाला लाल रंग फासलेला. आंजाला आठवीतला जगाची ओळख हा धडा आठवला. त्या आफ्रिकेत राहणाऱ्या निग्रो लोकांची माहिती होती. त्या आफ्रिकेत राहणाऱ्या निग्रो लोकांची माहिती होती. त्या बाईच्या उंचउंच बुडाच्या चपला. चाकं लावलेली लालपिवळी बॅग, ती बॅग बाईमागे घुरुधुरु पळत होती. आणि बरोबर एक गलेगठ्ठ गोरापान, लालबुंद पुरुष. कोण असेल ही बाई? आणि तिच्या मागून जाणारा सुटाबुटातला माणूस? तिला हसू आलं वाटलं त्या बाईसमोर ह्या आंजीला कुणीही गोरी म्हणेल!...<br>{{gap}}"आग अे ss आंजे, पोरगी रडाय लागली की, कुठं हाय ग तुजं ध्यान? घ्ये आगोदर तिला नि शांत कर. पाज जरा. आता मरेस्तो ममईच बघायची हाय!" शिवादादा आंजीवर वसकले. गमछा मानेवर खसाखसा घासून डोक्याला गुंडाळला आणि सांगू लागले... हये बघा बायानू हा च्या आनलाय, तो पिऊन टाका. ठेसनाच्या त्या टोकाला दोन दोन जनी जावा. तिथं नळ आहे. दोन दोन तांबे डोकीवर वतून घ्या. कापडबी तिथचं धून टाका. वाळत बी घाला तितंच. कुनी काई इचारलं तर सांगा पुढ जायचं हाय म्हणून. आमी गडी मानसं बाहीर जाऊन येताय. पोलिसवाला आला तर आंजे तु पुढे होऊन बोल. नववी पास हाईस नव्ह तू? त्याच्या म्होरं दाखिव तुंजी बालिस्टरकी. आमी काहितरी खायला घिऊन येतो. सामानाकडं ध्यान द्या. आमी येताव. असं बजावून शिवादादा आणि बरोबरचे पुरुष बाहेर गेले. त्यात सोनूचे पपा पण होते.<br>{{gap}}गावातल्या म्हाताऱ्या आयाबाया म्हणत. दगडवाडीत खात्यापित्या घरची लेक सून म्हणून आली तर ती एक काळुंद्रि तरी असणार नाहीतर नकटी, भानगडीची, आंबा रोडवरच्या होळाची, खात्यापित्या घरची पण सात पोरांच्या बापाची आधली मधली चौथी लेक. त्यातही काळीकुळकुळित. नववी पास झाल्या नंतरचा आषाढ आला. माय झाडं पूंजायला कधी नाहि ते खालकडच्या रानात गेली. तिथेच पेरणीला पण हात लावणार होती. पेरणीला मालकिणीचा हात लागला तर धान घमघमूक अंकुरत म्हणे. पेरणी होईतो यायला सांज झाली. पांदितून येताना पान लागलं. ढाण्या नाग असावा म्हाजे पाणी सुध्दा मागू दिल नाही. घरी आणले तर कुडीतून जीव कधीच उडून गेला होता.<br>{{gap}}घरातलं मोठ माणूस जात राहिल तर वरिसाच्या आत लग्नाळू पोरापोरीचे लगिन कराव लागते. नाही तर तीन साल घरात हाळद लावली जात नाही असा रिवाज आहे.<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २५ </small>}}</noinclude>
ctrswm0ji6jq1w0lub7alr2izy91qzq
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२६
104
70848
155612
2022-08-09T07:31:32Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>त्यानुसार तिच्या आन्नांनी आंजाची शाळा बंद केली. चांगल्या मार्कानी दहावीत गेलेल्या आंजनीचे लगीन दगडवाडीच्या अंकुश देशमुखाबरोबर लावून दिले. अंकुशा बारावीपसवर शिकलेला होता. तीन बहिणीतला एकटा भाऊ, मोप, धा एकर जमिनीचा मालक, पण जमीन दगडगोटयांनी भरलेल्या उतराची पावसाच पाणी दरा दरा वाहून गडप व्हायचं. तसल्या जमीनीत पीक तरी कोणतं येणार? पिवळी जवारी, थोडेफार उडिद, तीळ, आंजाला इतिहासातली पानं आठवली. त्यात लिहिलं आहे, मानवाने नदीचा काठ पाहून वसाहती केल्या. पाण्याला संस्कृत भाषेत 'जीवन' असे म्हणतात. ते आठवून हंसूही आलं. हे 'जीवन' पाणी दगडवाडीत होतं? कदाचीत फार फार पुर्वी निळाई दुथडी भरून वाहतही असेल पण आज?....<br>{{gap}}बरोबरच्या बाया दोन दोन तांब्यात न्हाऊन माघारी आल्या होत्या. लेकरांनाही पाणी ओतू ओतू खंगाळून घेतले होते.<br>{{gap}}"आंजे, आग जा की, मी बघती सोनू कडे. आत्ता येतील गडी माणसं माघारी. आणि हये बघ. सकाळच्या पारी आंगुळ करणाऱ्या बायाकडे बघाया येळ नसतो हितल्या गडीमाणसांना. उद्या मुक्कामावर गेल्यावर घोटभर पाण्यासाठी कसं तरसावं लागतं ते कळेल. करून घे आंगुळ. हितं लाज डोक्याले गुंडाळावी लागते. ममई आहे ही. जा." शिवादादाची मुंबईतली कारभारिण ठसक्यात सांगत होती. गडी माणसं बाहेर गेल्यावर ही इथं पोचली होती. तिला पाहून आंजाच्या डोक्यावरच ओझ उतरल. पोलिसमामानी हटकल तर ही मुंबईतली बालिस्टरिण घेईन बघून अंजाच्या मनात आलं.<br>{{gap}}शिवादादांची थोरली कारभरीण दगडवाडीत रहाते. ती जवळच्या आवशी गावाची. खात्यापित्या घरातली. पण तिरळ्या डोळयाची. बांगी. तिचा काका सरकारी नोकरीतला. खात्यापित्या घरी सणावाराला, पाहुण्यारावळ्याला पुरण पोळ्याचा गोड घास असे. फक्त तुपाच्या वाटी ऐवजी दुधाची वाटी शेजारी ठेवीत. भामावैनी अंगाने खूप थोराड होती. तिच्या काकानं दहा हजाराच्या नोटा शिवादादाच्या खिशात कोंबल्या नि पुतणी त्यांच्या उपरण्याला बांधली. शिवादादांना पाच एकर रान होत. ते ऐकटेच पैका हाती आल्यावर ते लातूरला जाऊन गवंडी काम शिकून आले आणि तिथल्याच ओळखीपाळखीवर दोन वर्षात थेट मुंबई गाठली. पण ते भामा वैनीला पैसे पाठवितात. सालातून एक दोनदा येऊन जातात.<br><noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २६ </small>}}</noinclude>
dk2afghuodqv1q2zh7yu1hdek2dj4t9
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२७
104
70849
155613
2022-08-09T07:36:09Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}मुंबईत रोजगार भरपूर मिळतो. त्यात शिवादादा पट्टीचे कारागिर. गवंडी काम छान करतात. पाच सहा वर्षात त्यांनी चांगले बस्तान बसवले. एका झोपडपट्टीत दोन खोल्या बांधल्या. पाच सात झोपड्या उभ्या केल्या आणि खायप्यायच्या सोईसाठी दुसरी बायको पण केली. मिनाबाई लातूरजवळच्या बुधवड्याची लहान असतानाच बापासोबत मुंबईला गेली. सुरुवातीला तिच्या बापाच्या हाताखाली शिवादादा काम करीत. मीनाबाई सात बुक शिकलेली मुंबईकरीण होती. मग लगिनही लावल बापानं तिचं शिवादादाशी. बाप्यानं दोन, तीन बायांशी लगीन वालं तरी चालतं. पन बाईशी एकादा माहेरचा दादाप्पा जरी दोन गोष्टी बोलला तरी बाईचाच सौंशय घेणार. तिलाच वाईट चालीची म्हणनार. काही नवरेतर बायकूला सौंशयावरून मारून टाकतात. अंकुश सारखा माणूसकीचा नवरा, जोडीदार म्हणून लाभला याचा अंजाला मनभरून अभिमान वाटला. त्याच्या आधारावर ती मुंबईच काय इंग्लंडात पण जायला राजी झाली असती.<br>{{gap}}... असल्या वेडगळ विचारांच अंजाला हसू आलं. एकदा तिने जिवाचा धडा करून, शिवादादांच्या पहिल्या बायकोला विचारले होते.<br>{{gap}}"भामा वयनी, ती मुंबईवाली लक्ष्म्या दिवाळीत हित येती. पांचवारी पातळ, दागिने घालून गावभर चहा पीत हिंडती. तुम्हाले वाईट नाही वाटत? लक्ष्म्या नायतर दिवाळीपूजेत ती शेजारी असतेच तुमी पण असता म्हना! पण, तिचा थाट वेगळाच? कस हो." विचारतांना खरतर आंजालाच कसनुस झाल होत पण भामा वहिनी मात्र लटक हसली आणि म्हणाली,<br>{{gap}}"आंजे, पावसानं झोडपल नि नवऱ्यानं मारल तर दाद कुनाजवळ मागायची? कारभारी मारित तर नाहीतच पण सोन्यावानी दोन लेकरं दिलीता. त्यांच्या शिक्षेनाचा, खायाप्याचा खर्चा देतेत. आले की हवं नको पहातेत. ती बाई ममईत हाय म्हणून दोन वेळला चांगल आन्न तरी मिळतंया त्यानला. तीबी तिथं कामधाम करती. बऱ्या जीवाची हाये. ती होती म्हणून तर आपरीसन झालं माझ. मैनाभर हित येऊन हायली होती. दिवाळी लक्ष्म्यांना येताना पोराना, मला कपडे आणते. बाईला आणखिन काय हव ग? आगं आपन भादव्यात लक्षुम्या मांडतो त्या दोन असतात की न्हाई? तशी मी थोरली तर ती धाकली. एक राम सोडले तर समद्या देवांना पन दोन दोन तीन तीन बायका. इठ्ठलावर रूसून रूकमाबाई दिंडीखनात गेली. चिंचच्या झाडाखाली ठाण<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २७ </small>}}</noinclude>
27pkettytdjndzr4yvegii5bpzr241m
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२८
104
70850
155614
2022-08-09T07:40:30Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>मांडल. तरी राही, राधा यांच्या सोबत तुळसही आलीच की शिरीकिस्ना मागं. जाऊ दे नग उगा डोक शिणवून घेऊस."<br>{{gap}}आंजाला ते सगळ आठवलं आणि सोनूच्या पप्पांनी जेव्हा शिवादादाबरोबर मुंबईला जाण्याचे नक्की ठरवले. तेव्हा मात्र मनात पक्के ठसवले कि तिने पन सोनूला घेऊन मुंबईला जायचे. तिचा हट्ट अंकुशाने मानला तिचे पाहून दुसऱ्या चौघीपांचजणी पण निघाल्या.<br>{{gap}}मीनाबाई तिच्या जवळ आली नि पुटपुटली, 'त्यो पोलिस मला ओळखतो. आंजे तू हो म्होरं, मी बाजूला जाते' आणि निघूनही गेली.<br>{{gap}}"ये ss बायांनो काय करता इथे? उठा... उठा हे स्टेशन आहे. गाड्या येतात जातात. आन् तिकिट कुठ आहेत. काढा.. दाखवा तिकिट. पुरुष माणसं नाहीत का सोबतीला उचला उचला तुमची ती बोचकी टाचकी." तो खाकी ड्रेसातला पोलिस ओरडू लागला. तशी, बाया घाबरल्या. मीनावैनीपण कुटे दिसेना. छगुला तर थरथरी सुटली ती येसाक्काच्या मागे जावून तिला गच्च धरून उभी राहिली. "आंजे, आग हो म्होरं बोल त्याच्याशी आमी अडानी बाया. मला तर थरथरी सुटली माय" औताड्याची मनूमाय कुजबुजली. उसन आवसान आणून आंजी पुढे झाली. "हवालदारदादा, आमी लातूर बिडाहून कामधंद्यासाठी हितं आलोत. रोडच्या कामावर घेतलंय आमच्या घरच्यांना. ते लेकरांना खायला आणण्यासाठी बाहेर गेलेत. त्यांचे पाशी तिकिटं आहेत. ते येईपर्यंत आमच्यावर मेहरबानी करा. गडीमानसं येईस्तो हित गुमान बसून रहातो आमी."<br>{{gap}}"मराठवाड्यातली माणसं दिसतात रे ही. तिथ लई मोठा दुस्काळ पडलाय. चार सालापासून पाणी बरसलाच नाही. रोजन रोज असे लोंढे येत्यात जाऊ देत. मंग करू आपली भोवनी." दुसरा हवालदार पहिल्याला बोलला आणि ते पुढे चालायला लागले आणि दगडवाडीकरणींना हायसे वाटले.<br>{{gap}}शिवादादा खायला वडापाव घेऊन आले. खाण झाल. आणि सगळी मंडळी त्यांच्यामागे चालू लागली. "हं चला माझ्या मागं पलिकडच्या फलाटावरून आपल्या मुक्कामाला जाणारी लोकल पकडायची. मिने तू सगळ्यांच्या मागे रहा समदे नग मोजून घ्ये. हितं ऱ्हाया नको कोणी. राहिलचं तर त्यांना घेऊन तू ये. चार दिवसात सगळे येतील रूळावर. मुंबईकर व्हायला कितीक वेळ लागणार ?" शिवादादा पुढे<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २८ </small>}}</noinclude>
61hyogm28jxjs7fu2wezicwy6qr7lyr
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२९
104
70851
155615
2022-08-09T07:44:43Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>चालू लागले. बाकीचे मागेमागे. अंकुशने पेटी डोक्यावर घेतली. गठूड उजव्या खांद्याला बांधून टाकलं. त्याच्या मागे सोनूला कडेवर घेऊन आंजीही चाचरत चालू लागली. ममईकरीन होण्यासाठी.<br>{{gap}}एका ठेसनावर शीव की काय नावाचं उतरून सगळे रूळाच्या कडेने चालू लागले रस्त्याच्या... रूळाच्या कडेनी माणसं, बाया, लेकरं रांगेने संडासला बसलेले. क्षणभर नजर फक्क झाली. आणि इकडे तिकडे न पाहता दगडवाडीकरणी खाली मान घालून रस्ता काटायला लागल्या. आंजा टुळूटुळू नजरेने चहूकडे पाहत होती. एकमेकांशी समांतर धावरणारे कितीतरी रूळ त्यावरून धावणाऱ्या आगीनगाड्या तिला गणितातल्या समांतर रेषा आठवल्या. या रेषा कधीच एकमेकीना मिळत नाहीत पण जोडीने धावत असतात. त्या रेषा जर एकमेकींच्या गळ्यात गळे घालू लागल्या तर पुढे काय होईल? अशा खुळचट विचारात रस्ता कसा कटला ते कळले नाही. बरच अंतर चालून गेल्यावर काटकोनात वळण घेऊन मंडळी पुढे चालू लागली. थोडे पुढे गेल्यावर त्यांचे ठिकाण आले. प्रचंड रूंद लांबच लांब पसरलेल्या नालीवर, गटारीवर सिमेंटची झाकण बसवली होती. त्याच्या पलिकडे अर्धवट विटांच्या, पत्र्यांच्या झोपड्या होत्या. खोक्यांच्या फळ्या, अर्धेमुर्धे पत्रे यांनी तयार केलेला आडोसा. जेमतेम चार माणस मावतील असा. त्यातल्या एका झोपडीत अंकुशाने बोचके टेकले. बाकीचेही आजूबाजूलाच टेकले होते. आंजाने झोपडीच्या बाहेर येऊन नजर टाकली. समोर रस्ता आणि मागे नजर जिथवर पोचेल तोवर झोपड्या मनात आले चार दगडवाडीतील सगळी घर नक्कीच या एका झोपडपट्टीत मावतील. शिवादादांच्या हातावर रस्त्याच मोठ कंत्राट होत. आणि दादरला बारा मजली इमारतीच्या बांधकामाच. अंकुशाला गवंडीकाम थोडफार येई. अंकुश शिवादादासोबत काम करणार होता. पुढच्या रांगेतल्या चार झोपड्यांच्या पलिकडे शिवादादाची पक्की झोपडी होती. स्लॅबची होती. वर एक माळाही होता. जायला शिडी होती. घर स्टीलच्या चकचकीत भांड्यानी भरलेले होते. मीनाबाईला एक मुलगा होता. तो शाळेत शिकत होता. मीनाबाई पहाटे चारलाच उठत असे. भायखळ्याला भाजी आणण्यासाठी जाई. तऱ्हेतऱ्हेच्या ताज्या भाज्या घेऊन परत येई. आल्यावर भाज्या निगुतीने निवडून त्यातील काही भाज्या सुरेखपैकी चिरून, शंभर शंभर ग्रॅमच्या पिशव्यात भरून ठेवी. मग त्या पिशव्या फ्रीजमध्ये जात. सायंकाळी रस्त्यावर भाजीचे दुकान थाटून मीनाबाई<noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / २९ </small>}}</noinclude>
rrmgcwmcav21l3tdrs9kk830qp3l39k
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३०
104
70852
155616
2022-08-09T07:50:19Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>
बसे. ऑफिसातून येणाऱ्या बाया किंवा बड्यांच्या बाया त्या नीटसपणे ठेवलेल्या भाज्या घेऊन जात. भायखळ्यात चार दोन रूपये किलोनी मिळालेली भाजी मीनाबाईच्या हातगुणामुळे, कष्टामुळे पंधरावीस रूपयापर्यंत विकली जाई. आंजाने तर इतक्या ताज्या नि तऱ्हेतऱ्हेच्या भाज्याच पाहिलेल्या नव्हत्या. आंज्याच्या घरी लक्ष्म्या येत तेव्हा त्यांना भाकरी आणि रानातली भाजी लागे. तेव्हा तांदुळ कुंजराची भाजी न्हाईतर चंदनबटवा शोधताना किती धांदल उडायची. इथल्या मार्केटात तर किती तऱ्हेतऱ्हेच्या पालेभाज्या असतात. तऱ्हेतऱ्हेच्या मिरच्या, वांगी, भेंड्या, शेंगाचे सतरा प्रकार, आणि भाजी विकणारेही लक्ष्म्यापुढे आरास मांडतात तशा त्या भाज्या निटुसपणे मांडून ठेवतात.<br>{{gap}}दिवस उलटत होते. मुंबईतली गर्दी आंजाला आता बोचेनाशी झाली. तिथला गोंगाट आणि झगमगाट याचीही सवय झाली. पण दोन गोष्टी मात्र अगदी नकोशा वाटत, आंघोळ... इराकतीला बसण्यासाठी आडोसा नाही आणि संडास म्हणजे उघड्यावर. ती पहाटे उठून आडोसा पाहून येई. घराच्या मागे तरंट लावून फरशी टाकून आंघोळीलाही आडोसा केला होता. घरा जवळच एक पाळणाघर होते. फी बरीक पंचवीस रूपये होती. पण सांभाळणारी बाई शिकलेली, नीटस होती. तिने सोनू झाली तेव्हाच पक्के ठरवून टाकले होते. सोनूला खूप खूप शिकवायचे. कितीही कष्ट करून चार पैसे साठवायची उमेद तिच्यात होती. मीनाबाईच्या ओळखीने जवळच्या इमारतीतल्या नोकरी करणाऱ्या बायांकडे कामही मिळाले. झाडू पोछा नि धुणी भांडी करण्यासाठी दिडशे रूपये मिळत. चार घरचे काम मिळाले होते. तिची टापटिप, झटपट पण नीट काम करण्याची पध्दत सर्वानाच आवडे, सोनूला आठ वाजता पाळणा घरात सोडून ती कामाला जाई. एक वाजता परत येतांना तिला घरी घेऊन येई. पहाता पहाता आंजा, अंकुश दोन महिन्यात मुंबईकर बनले. पण तरीही आंजाला गावाकडचे सण आठवत. ज्येष्ठ आषाढातली झाडाची पूजा, आषाढ तळणे, भाद्रपदातील लक्ष्म्यांची धांदल, पुसातले रविवार, दिवाळीतलं शेणाच गोकूळ मांडण... सार सार आठवे. अंकुशाच्या स्वप्नात भेगाळलेली जमीन... उदास रान येई ... लंगड्या काकांचे आशेने वाट पाहणारे डोळे येत.<br>
{{Css image crop
|Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf
|Page = 30
|bSize = 369
|cWidth = 38
|cHeight = 23
|oTop = 474
|oLeft = 314
|Location = right
|Description =
}}<Br><noinclude>{{rule}}{{center|<small>शोध अकराव्या दिशेचा / ३० </small>}}</noinclude>
puikpflwiyk6q1ipqa2l7e9mqcm2vgh