विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.22 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३८ 104 66803 155400 130998 2022-07-28T12:16:04Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.] आपणांपुढील कार्य .२३३ {{run}} तात्त्विक वाङ्मयाचा अभ्यास सुरू केला तर आरंभी त्याला तो कंटाळवाणा झाल्यावांचून राहणार नाही. अर्वाचीन वाङ्मयाप्रमाणे त्यांत चित्ताची गडबड उडविणारें विलक्षण उत्साहजनक अथवा विलक्षण क्रांतिकारक असें कांहींच त्याला आढळून यावयाचे नाही. वाचनास सुरवात केल्यावरोबर वाचकाचें चित्त एकदम आकर्षून जाऊन त्यांत मोठी खळबळ उडावी असे प्राचीन वाङ्मयांत कांहींच नाही. खिस्ती धर्माचा इतिहास पाहिला तर त्याच्या नांवा खाली केवढे प्रचंड उत्पात युरोपांत घडून आले याचा विचार करा. याशी तुलना करण्यास आमच्या धर्माच्या इतिहासांत तुम्हांस कांहींच सांपडावयाचे नाही. यामुळे त्या वाङ्मयाचे वाचन आरंभापासूनच चित्तांत खळबळ उडवून देते. पण हा उत्साह अगदी क्षणिक असतो. पुस्तक मिटले की, त्याबरोबरच वाचकाचे चित्त कोरे होऊन जाते. आपण काय वाचलें याचीहि शुद्धि त्याला रहात नाही. हिंदुस्थानांतील धार्मिक वाङ्मय याहून अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. ते शुद्ध शांततामय आणि अगदी थंड्या स्वभावाचे आहे. तुमच्या चित्तावर त्याचा पगडा तुम्हांस नकळत बसत असतो; पण तुमचा हा अभ्यास कांही काळ असाच चालू राहिला म्हणजे त्याचा पगडा तुमच्या चित्तावर इतका पक्का बसतो की, त्याचा मोह तुम्हांस अनिवार होतो. तुमच्या चित्तास बसलेली मिठी तुम्हांस सोडवत नाही. आमच्या वाङ्मयाच्या जाळ्यांत जो एकवार सांपडला त्याचे हातपाय त्यांत पक्के जखडले गेले ह्मणून समजावें.<br> {{gap}}रात्रीच्या प्रशांत समयीं दंव पडते, तेव्हा त्याचा आवाज कोणासहि ऐकू येत नाही अथवा ते कोणाच्या दृष्टिपथांतहि येत नाही. तथापि त्याच्या सिंचनाने अत्यंत परिमल युक्त अशी गुलाबाची फुलें हलतात हे मात्र खरें. जगाच्या विचारभांडारांत भरतभूमीने टाकलेली भर अशाच प्रकारची आहे. या विचारांचे आगमन ढोलांच्या आणि नगा-यांच्या दणदणाटाने आगाऊ सुचविले गेले नव्हते. ते जगांत संचार करीत आहेत इतकीहि जाणीव कोणास उत्प्नन्न झाली नाही; पण असे असतांहि त्यांचा परिणाम सा-या जगावर चिरस्थायी झाला आहे. जगाच्या विचारांत त्यांनी क्रांति करून सोडली आहे. पण मौजेची गोष्ट ही की, ही क्रांति केव्हां झाली हेही कोणाच्या लक्ष्यांत आले नाही. एका गृहस्थाने सहज बोलता बोलतां मला म्हटले 'एखाद्या विशिष्ट ग्रंथाचा कर्ता कोण याचा शोध हिंदुस्थानांत लागणे हे मोठे बिकट कर्म आहे.{{nop}}<noinclude></noinclude> az2t8klv64smuwgoizwlv59e7mas2ok 155401 155400 2022-07-28T12:17:23Z JayashreeVI 4058 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.] आपणांपुढील कार्य .२३३ {{run}} तात्त्विक वाङ्मयाचा अभ्यास सुरू केला तर आरंभी त्याला तो कंटाळवाणा झाल्यावांचून राहणार नाही. अर्वाचीन वाङ्मयाप्रमाणे त्यांत चित्ताची गडबड उडविणारें विलक्षण उत्साहजनक अथवा विलक्षण क्रांतिकारक असें कांहींच त्याला आढळून यावयाचे नाही. वाचनास सुरवात केल्यावरोबर वाचकाचें चित्त एकदम आकर्षून जाऊन त्यांत मोठी खळबळ उडावी असे प्राचीन वाङ्मयांत कांहींच नाही. खिस्ती धर्माचा इतिहास पाहिला तर त्याच्या नांवा खाली केवढे प्रचंड उत्पात युरोपांत घडून आले याचा विचार करा. याशी तुलना करण्यास आमच्या धर्माच्या इतिहासांत तुम्हांस कांहींच सांपडावयाचे नाही. यामुळे त्या वाङ्मयाचे वाचन आरंभापासूनच चित्तांत खळबळ उडवून देते. पण हा उत्साह अगदी क्षणिक असतो. पुस्तक मिटले की, त्याबरोबरच वाचकाचे चित्त कोरे होऊन जाते. आपण काय वाचलें याचीहि शुद्धि त्याला रहात नाही. हिंदुस्थानांतील धार्मिक वाङ्मय याहून अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. ते शुद्ध शांततामय आणि अगदी थंड्या स्वभावाचे आहे. तुमच्या चित्तावर त्याचा पगडा तुम्हांस नकळत बसत असतो; पण तुमचा हा अभ्यास कांही काळ असाच चालू राहिला म्हणजे त्याचा पगडा तुमच्या चित्तावर इतका पक्का बसतो की, त्याचा मोह तुम्हांस अनिवार होतो. तुमच्या चित्तास बसलेली मिठी तुम्हांस सोडवत नाही. आमच्या वाङ्मयाच्या जाळ्यांत जो एकवार सांपडला त्याचे हातपाय त्यांत पक्के जखडले गेले ह्मणून समजावें.<br> {{gap}}रात्रीच्या प्रशांत समयीं दंव पडते, तेव्हा त्याचा आवाज कोणासहि ऐकू येत नाही अथवा ते कोणाच्या दृष्टिपथांतहि येत नाही. तथापि त्याच्या सिंचनाने अत्यंत परिमल युक्त अशी गुलाबाची फुलें हलतात हे मात्र खरें. जगाच्या विचारभांडारांत भरतभूमीने टाकलेली भर अशाच प्रकारची आहे. या विचारांचे आगमन ढोलांच्या आणि नगा-यांच्या दणदणाटाने आगाऊ सुचविले गेले नव्हते. ते जगांत संचार करीत आहेत इतकीहि जाणीव कोणास उत्प्नन्न झाली नाही; पण असे असतांहि त्यांचा परिणाम सा-या जगावर चिरस्थायी झाला आहे. जगाच्या विचारांत त्यांनी क्रांति करून सोडली आहे. पण मौजेची गोष्ट ही की, ही क्रांति केव्हां झाली हेही कोणाच्या लक्ष्यांत आले नाही. एका गृहस्थाने सहज बोलता बोलतां मला म्हटले 'एखाद्या विशिष्टग्रंथाचा कर्ता कोण याचा शोध हिंदुस्थानांत लागणे हे मोठे बिकट कर्म आहे.'{{nop}}<noinclude></noinclude> gf7ywhrxhzikpxp4jdg90yflkh9c9yu 155402 155401 2022-07-28T12:18:20Z JayashreeVI 4058 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.] आपणांपुढील कार्य .२३३ {{run}} तात्त्विक वाङ्मयाचा अभ्यास सुरू केला तर आरंभी त्याला तो कंटाळवाणा झाल्यावांचून राहणार नाही. अर्वाचीन वाङ्मयाप्रमाणे त्यांत चित्ताची गडबड उडविणारें विलक्षण उत्साहजनक अथवा विलक्षण क्रांतिकारक असें कांहींच त्याला आढळून यावयाचे नाही. वाचनास सुरवात केल्यावरोबर वाचकाचें चित्त एकदम आकर्षून जाऊन त्यांत मोठी खळबळ उडावी असे प्राचीन वाङ्मयांत कांहींच नाही. खिस्ती धर्माचा इतिहास पाहिला तर त्याच्या नांवा खाली केवढे प्रचंड उत्पात युरोपांत घडून आले याचा विचार करा. याशी तुलना करण्यास आमच्या धर्माच्या इतिहासांत तुम्हांस कांहींच सांपडावयाचे नाही. यामुळे त्या वाङ्मयाचे वाचन आरंभापासूनच चित्तांत खळबळ उडवून देते. पण हा उत्साह अगदी क्षणिक असतो. पुस्तक मिटले की, त्याबरोबरच वाचकाचे चित्त कोरे होऊन जाते. आपण काय वाचलें याचीहि शुद्धि त्याला रहात नाही. हिंदुस्थानांतील धार्मिक वाङ्मय याहून अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. ते शुद्ध शांततामय आणि अगदी थंड्या स्वभावाचे आहे. तुमच्या चित्तावर त्याचा पगडा तुम्हांस नकळत बसत असतो; पण तुमचा हा अभ्यास कांही काळ असाच चालू राहिला म्हणजे त्याचा पगडा तुमच्या चित्तावर इतका पक्का बसतो की, त्याचा मोह तुम्हांस अनिवार होतो. तुमच्या चित्तास बसलेली मिठी तुम्हांस सोडवत नाही. आमच्या वाङ्मयाच्या जाळ्यांत जो एकवार सांपडला त्याचे हातपाय त्यांत पक्के जखडले गेले ह्मणून समजावें.<br> {{gap}}रात्रीच्या प्रशांत समयीं दंव पडते, तेव्हा त्याचा आवाज कोणासहि ऐकू येत नाही अथवा ते कोणाच्या दृष्टिपथांतहि येत नाही. तथापि त्याच्या सिंचनाने अत्यंत परिमल युक्त अशी गुलाबाची फुलें हलतात हे मात्र खरें. जगाच्या विचारभांडारांत भरतभूमीने टाकलेली भर अशाच प्रकारची आहे. या विचारांचे आगमन ढोलांच्या आणि नगा-यांच्या दणदणाटाने आगाऊ सुचविले गेले नव्हते. ते जगांत संचार करीत आहेत इतकीहि जाणीव कोणास उत्प्नन्न झाली नाही; पण असे असतांहि त्यांचा परिणाम सा-या जगावर चिरस्थायी झाला आहे. जगाच्या विचारांत त्यांनी क्रांति करून सोडली आहे. पण मौजेची गोष्ट ही की, ही क्रांति केव्हां झाली हेही कोणाच्या लक्ष्यांत आले नाही. एका गृहस्थाने सहज बोलता बोलतां मला म्हटले 'एखाद्या विशिष्ट ग्रंथाचा कर्ता कोण याचा शोध हिंदुस्थानांत लागणे हे मोठे बिकट कर्म आहे.'{{nop}}<noinclude></noinclude> omebgwo1n7f91kk4id08bkzd6sshy4i पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३९ 104 66804 155403 130999 2022-07-28T12:26:52Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२३४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम {{rule}} यावर मी त्याला उत्तर दिले, 'हिंदुस्थानाची रीत अशीच आहे. हिंदुस्थानांतील ग्रंथकारांची सारीच पद्धत अर्वाचीन लेखकांहून अगदी वेगळी आहे. अर्वा चीन पद्धतीच्या ग्रंथकाराच्या लेखांत शेकडा नव्वद कल्पना दुसऱ्यांच्या चोरलेल्या असल्याचे तुम्हांस आढळून येईल; आणि ज्या शेंकडा दहा त्यांच्या स्वतःच्या असतात, त्या अस्मादिकांच्या स्वतःच्या आहेत असें प्रस्तावनेंत नमूद करण्यास ते सहसा चुकत नाहीत. आमच्या प्राचीन ग्रंथकारांचा प्रकार याहून अगदी वेगळा. सान्या मानवजातीच्या हृदयांत विचारांची क्रांति ज्यांच्या लेखांनी झाली ते आपले ग्रंथ लिहून मोकळे झाले. त्यांनी आपल्या लेखांवर नांवें घालण्याइतकीही खबरदारी घेतली नाही. ते जन्मले कोठे आणि मेले केव्हां याचाहि पत्ता कोणास लागला नाही. आपल्या वंशजांकरितां आपला अपूर्व ठेवा मागे ठेवून कोणास नकळत त्यांनी देहविसर्जन केलें. हिंदुस्थानांत तात्त्विक वाङ्मयाचे केवढे तरी भांडार आहे, पण त्या सा-यांच्या लेखकांची नांवें कोणास माहीत आहेत ? आमची पुराणे कोणी लिहिली याचा शोध लागेना तेव्हां सारी व्यासांच्या गळ्यांत पडली. एखादा तात्त्विक ग्रंथाच्या कर्त्यांचा शोध लागला नाही ह्मणजे कपिल मुनींकडे खुशाल बोट दाखवावें. हे लेखक म्हणजे भगवान् श्रीकृष्णांचे अस्सल वंशज होत. गीतेची तत्त्वे त्यांनीच खरोखर पाळली. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या गीतावचनाचा अर्थ खरोखर त्यांनीच सांगितला.<br> {{gap}}अशा रीतीने हिंदुस्थानाचे कार्य साऱ्या जगांत चालू आहे; पण तें चालू राहण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता आहे. व्यापारी मालाची नेआण कर ण्यास ज्याप्रमाणे मनुष्याचे साहाय्य अवश्य आहे, त्याचप्रमाणे धर्मज्ञानाच्या प्र सारालाहि कोणातरी देहधा-याच्या आश्रयाची आवश्यकता असते. आधी मार्ग तयार असल्यावांचून विचारांचाहि प्रवास होऊ शकत नाही. पूर्वीहि असेच प्रकार घडून आले आहेत. एखादें जगज्जेतें राष्ट्र जन्मास आले म्हणजे आपल्या क्षात्रतेजाच्या बळावर जगांतील दूरदूरची राष्ट्रं तें एकत्र करिते. त्या राष्ट्रांचा परस्परांशी संबंध जडतो. अशा रीतीने विचारविनियमाचा मार्ग तयार झाला म्हणजे त्याच्या द्वारें हिंदुस्थानांतील विचारपरंपरा साऱ्या जगाचा प्रवास करूं लागते; आणि अशा रीतीने जगांतील सा-या मानवकुलांत तिचा प्रवेश होतो. बौद्ध धर्म जन्मास सुद्धां आला नव्हता तेव्हांहि हिंदु तत्त्वज्ञानाचा<noinclude></noinclude> 8yvkiuyd62k2y298ayjibzdmueywgw6 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४० 104 66805 155404 131000 2022-07-28T12:32:27Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.] आपणांपुढील कार्य. २३५. {{rule}} प्रवेश साऱ्या जगांत झाला असल्याचा पुरावा हल्ली निदर्शनास येत असून त्यांत आणखी नवी भर प्रत्यहीं पडत आहे. बौद्ध धर्माचा प्रवेश चिनांत होण्याच्या अगोदर वेदांत तत्त्वे तेथें शिरली होती. त्याचप्रमाणे इराण वगैरे देशांतहि त्यांचा प्रवेश झाला होता. पुढे ग्रीक साम्राज्याच्या वेळीहि असाच प्रकार घडून आला. त्यांच्या तरवारीच्या मागोमाग हिंदु तत्त्वज्ञान संचार करीत होते. ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानाचा केवढाहि गौरव तुम्हीं केला, आणि त्यामागो माग झालेल्या संस्कृतीची कितीहि स्तोत्रे तुम्हीं गाइली, तरी हिंदु तत्त्वग्रंथांत इतस्ततः विखुरलेल्या अनेक रत्नांपैकी एका अल्पांशापासूनच ख्रिस्ताची ही सारी सृष्टि निर्माण झाली आहे, हे लक्षात ठेवणे भाग आहे. हिंदु धर्मांतूनच बौद्ध धर्म निर्माण झाला. बौद्ध धर्म हे हिंदु धर्माचेंच एक बंडखोर बालक आहे; आणि ख्रिस्ती धर्म हे बौद्ध धर्माचें गोधडीवजा अनुकरण आहे. अशा रीतीनें प्रत्येक शकांतराच्या वेळी हिंदु धर्मज्ञानाची लाट जगावर पसरली आहे; आणि आताही हा शकांतराचा काळ पुनः प्राप्त झाला आहे. इंग्रजी साम्राज्याखाली जगांतील दूरदूरची स्थलें एकत्र झाली आहेत; आणि त्यांतहि विशेष हा की, रोमन साम्राज्याप्रमाणे इंग्रजी साम्राज्याचे मार्ग केवळ जमिनीवरच आंखलेले नसून महासागरांचा पृष्ठभागहि त्यांनी व्यापला आहे. एका महासागरांतून दुसऱ्या कोणत्याहि महासागराकडे या रस्त्याने सुखरूप जाता येते, आणि सध्यांच्या काळी पूर्वीच्या दळणवळणाच्या साधनांत विद्युच्छक्तीनेंहि आणखी एक नवीच भर घातली आहे. अशा स्थितीत आपल्या जीवन हेतूच्या पूर्तीस्तव भरतभूमीनेंहि जागे व्हावें हें रास्तच आहे. जगाच्या संस्कृतीला आपल्यापरी तिनेंहि हातभार लावावा हे इष्ट आहे. माझ्यासारख्या मनुष्याने उठून इंग्लं डचा आणि अमेरिकेचा प्रवास करावा आणि तेथें धर्मप्रचाराचे कार्य करावें ही गोष्ट काकतालीय न्यायाने घडली असून पूर्वपरंपरेप्रमाणे पाहतां ती सृष्टि क्रमाला अनुसरूनच घडली. हिंदुस्थानाच्या कार्याचा प्रसार जगभर होण्याची वेळ आतां आली आहे, ही गोष्ट आपणांपैकी प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. या कार्याच्या प्रसाराला अत्यंत अनुकूल असा सांप्रतचा काल आहे आणि या वेळी आपले जगज्जेत्याचे कार्य हिंदुस्थानाने पुनः केले पाहिजे. आपणांस केवळ आपल्याच देशाची उन्नति साधावयाची आहे असें नाही. आपल्या साऱ्या कार्यक्रमाचा तो लहानसा अंश मात्र आहे. कल्पनेच्या अत्यंत विस्तृ- .<noinclude></noinclude> imbf4yk59rsbt4pk1i29tuvv3p71rbr विकिस्त्रोत:सदस्यनाव बदला 0 70106 155405 155399 2022-07-28T17:03:35Z QueerEcofeminist 918 /* वैश्विक सदस्यनाव बदलाविषयीचे धोरण (मूळ धोरण) */ भर wikitext text/x-wiki तुमचे सदस्यनाव बदलण्यासाठी या पानावर दिलेल्या सुचनांचे पालन करा. तुमचे सदस्यनाव हे तुमच्या सोयीसाठी आहे, त्यामुळे तुम्ही ते कधीही बदलू शकता आणि त्यात आवश्यक बदलही करू शकता. फक्त विकिमिडीया प्रकल्पांवर सदस्यनावात बदल करण्यासाठी काही नियम आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पुर्वी सदस्यनाव बदलाची प्रक्रिया खूप जटील होती पण आता ती प्रक्रिया खूप सोपी झाली आहे त्यामुळे फक्त एक अर्ज भरून दिल्यास तुमच्या नावात योग्य तो बदल करता येतो. === वैश्विक सदस्यनाव बदलाविषयीचे धोरण ([[M:Global rename policy|मूळ धोरण]]) === सदस्यनाव बदल होण्यासाठी खालील सर्व अटींची पुर्तता होणे आवश्यक आहे. * नविन सदस्यनाव काळजीपूर्वक निवडलेले असावे, अनावश्यक, वारंवार केलेल्या आणि चुकीच्या नावाच्या विनंत्या नाकारल्या जातील. स्थानिक धोरणांविषयी वैश्विक सदस्यनाव बदल करणार्या रिनेमर/स्टीवर्ड यांना कल्पना असेलच असे नाही त्यामुळे तुमचे सदस्यनाव तुम्ही स्थानिक धोरणांविषयी तपासणी करावी. * तुमच्या जुन्या सदस्यनावाशी नवे सदस्यनाव जोडलेले असावे. तुमच्या सदस्यनावाशी/खात्याशी तुमच्या वाईट वागणूकीचा इतिहास तोडण्यासाठी नाव बदलून दिले जात नाही. * तुमचे नवीन नाव कुठल्याही विकि प्रकल्पावर आधीच वापरात नसावे, तरच तुम्हाला ते सदस्यनाव घेता येणार नाही. त्यामुळे [[Special:CentralAuth]] येथे तुम्हाला हवे असलेले सदस्यनाव भरून खात्री करून घ्या की ते कुणीही वापरत नाही. [[वर्ग:विकिस्रोत व्यवस्थापन]] phnwfz2j4fbw464cj6ttjmkw1392h7e